Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, September 14, 2014

वेडा पाउस


वेडा पाउस चिंब भिजून गेला
नकळतच काही आठवणी देऊन गेला 
आठवणी एकत्र खेळलेल्या 
आठवणी एकत्र रुळलेल्या

कधी त्या दप्तरातून शाळेत गेलेल्या
शाळेच्या खिडकीतून पावसात भिजलेला
बाईंच्या खडूत ठळक उमठ्लेल्या
मित्रांच्या डब्यात पोठ भरून वाटलेल्या

मैदानाच्या मातीत धुंद दरवळलेल्या
कँटीनच्या खाउत मनसोक्त रमलेल्या
मधल्या सुट्टीत कल्लोळ मांडलेल्या
ऑफ तासात भेंड्या खेळलेल्या

कधी हसून टपली मारलेल्या
डोळे पुसून समजूत काढलेल्या
खिश्यातल्या चिंचा लपुन खालेल्या
गृहपाठाच्या वह्या उतरून काढलेल्या

शाबासकी मधून हवेत उढलेल्या
बाईंच्या आशीर्वादात प्रगती गाठलेल्या
रिझल्टच्या दिवशी धडधडून उठलेल्या
मित्रांच्या आठवणीत भरभरून जगलेल्या



                    चैताली कदम 

Tuesday, June 11, 2013

परी स्वप्नातली


थंडीच्या त्या धुक्यात मला शोधणारी ती 
मी दिसता क्षणी मला बिलगणारी ती 
धुंद पावसात चिंब भिजणारी ती 
सर होऊन भिजवणारी ती 

फुलांच्या गंधात दरवळणारी ती 
पाखरांच्या रंगात मिसळणारी ती 
इंद्रधनुषातील रंग उधळणारी ती 
दव होऊन चमकणारी ती 

रात्रीच रुपेरी चांदण ती 
पाण्यातील चंद्राच प्रतिबिंब ती 
वसंत ऋतूचा मोहक मोहर ती 
पालवीचा सुंदर बहर ती  

पावसातील हवेचा गारवा ती 
अंगावर येणारा शहर ती 
माझ्यातला मी पणा जपणारी ती 
तासान तास माझ्यात रुळणारी ती 

ती असावी परी माझ्या स्वप्नातली 
बेधुंद होऊन गाणारी 
मनसोक्त नाचणारी 
खळखळून हसणारी 
रिमझिम बरसणारी 

आणि मी 
तिच्यातच विसावणारा बेभान सा वारा 






चैताली कदम 


Thursday, June 7, 2012

पहिला पावूस.........


आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............

अंगावर येणाऱ्या थंड  शहाऱ्यांची ............... 

श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............

रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................


आठवण................गवतावरील  दवांची................

सकाळच्या ओलसर धुक्यांची..................

दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............

गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................


आठवण................वाट पहणाऱ्या  अतुर मोराची.................

तहानलेल्या चातक पक्षाची..............

भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................


आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............

आठवण.................पहिल्या पावसाची.............



चैताली कदम 

Thursday, March 15, 2012

स्पर्श........



स्पर्श असावा आसवां सारखा
ओघळताना जाणवणारा
कधी आनंद कधी दुखं
मनसोक्त वाहणारा .............


कधी असावा पावसा सारखा
हवे मध्ये मिसळणारा
गारव्याचा एक श्वास
मना मध्ये जपणारा...............


कधी असावा फुलासारखा
बेधुंद दरवळणारा
निसर्गात स्वतःची अशी
एक जागा बनवणारा ..............


कधी असावा नदी सारखा
खळखळून हसणारा
स्वरांच्या दुनियेत एक
नवीन सूर भरणारा ....................


कधी असावा पाण्या सारखा
नितळ शांत असणारा
पाहिलं  जरी मनात
स्पष्ट पणे दिसणारा ..............


कधी असावा शब्दानं सारखा
मना पर्यंत पोहोचणारा
उमलून हसू ओठांवरती
सार काही बोलणारा .................


कधी असावा नजरे सारखा
सजवून सांगणारा
निरागस पणे मिथुन डोळे
मन स्थिती मांडणारा .................


कधी असावा श्वासांन सारखा
नेहमी सोबत असणारा
पापण्यांन सम  निमिष भर मिठून
नवीन आस बांधणारा .................





चैताली कदम

Monday, February 27, 2012

विरह.........

तुझ्या साठी थोडी
जागा शिल्लक होती
मला काय माहित तिची
शोभा त्यातच होती


मला खूप वाटल  
तू ती भरून काढावीस  
ती जागा भरायला
नवीन आठवण आणावीस 


आठवणी तू आणल्यास 
डोळे ओले करणाऱ्या 
मनातल्या  त्या  जागेला
तसच  अपुरं ठेवणाऱ्या 



  


चैताली कदम


Tuesday, December 27, 2011

काही प्रश्न............





वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
हसू कधी रडता रडता का आढळतं ?
मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
सारं काही नजरेतूनच  कस समजतं ?


भास होऊन तिचा तो का हसतो ?
नाही केला फोन म्हणून का रुसतो ?
रात्र भर तिच्या साठी का जागतो ?
चालता चालता रस्त्यात का वळतो ?


ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?
पण दुरावताना  पापण्या का भिजतात ?
आठवणी ने पण सहज ती का लाजते ?
लिहिता लिहिता कधी ती मागे वळते ?


फक्त पाहण्या साठी फेरया तो का मारतो ?
दिसली नाही ती तर का शोधतो ?
सर्वात आधी समोर तीच का दिसावी ?
हवीशी वाटते तेंव्हाच  ती का नसावी ?


पाहता क्षणी त्याला धडधड का होते ?
आपोआप पण नजर  का झुकते  ?
गालावरती हसू का उमलतं ?
आठवणींनी त्याच्या मन का बहरतं ?



चैताली कदम








Tuesday, December 20, 2011

डोळ्या मध्ये पाणी का बर यावे..........



जगताना मी जीवनातला
आनंद जगुन घ्यावे
हसतं जगावे जीवन सारे
दुःख  न समजु यावे




खंत नसावी कशाची मज
रहीले काय असावे
निभावली सारी नाती गोती
उरले काय असावे




मरताना मज चेहे-यावरचे
दुःख  न कोणा दिसावे
त्रुप्त दिसावे जातान आन
कोनास न काही उमजावे




घडविले ज्यांनी जगण्या करता
उपकार कसे फेडावे 
 हसतं जगावे आयुष्य आन
दुःख न वाटी यावे




संपले सारे जीवन आता
सुखात मी निजावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.


                                       चैतली कदम