Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Thursday, October 2, 2014

कातरवेळ

                    सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ .दिवे लागणीच्या वेळेस कातरवेळ म्हणण्याची जुनी पद्धत आपल्या कडे आहे .एक अशी वेळेची कातर ज्यात दिवस आणि रात्र एकमेकांना दुभागतात आणि त्याचा मध्य गाठणारी वेळ म्हणजेच कातर वेळ . त्याचा अर्थ आणि अनुभव प्रत्येकाला माहित असतो , पण काहींना कळतो काहींना कळात नाही . कारण माणूस किती हि हुशार विद्वान असला तरी सायंकाळ हि कोणाचीच चुकचुकल्या शिवाय सरत नाही . एक अशी घटका ज्या घटकेत कोणाची तरी ओढ लागते ,जीव कासावीस होतो , उदास वाटू लागतं किंव्हा क्वचित लाजरस हसू येतं . त्यात पावसाची भर हा उत्तम प्रकार आहे . अशा संध्याकाळी ओल्या हवेत श्वास घेताना अंगावर येणाऱ्या त्या शहाऱ्याची भावना आजवर कोणी स्पष्ट केली नाही ,किंबहुना ती करू हि शकणार नाही . गारवा , हवेतला ओलावा सहज अंगाला स्पर्श करून जातो आणि मनाला थोडा विसावा देऊन जातो . मला खूप आवडते हि पावसातली कातरवेळ . थंड ओली आणि अंगावर रोमांच फुलवणारी हि कातरवेळ सगळ्यांनाच आवडेल पण ती उपभोगायला तसं मन हवं नं…… 
                     प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा अनुभव सुधा असु शाकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं . निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
तो सुबक शांत लखं चमकत होता . त्याची ती स्थिरावलेली जोत सर्वत्र कोवळा प्रकाश पसरवत होती आणि मन प्रसंन करत होती . बाहेर बऱ्यापैकी गारवा होता . मी ओट्यावर बसून काहीतरी विचार करत होते . दिव्याच्या बाजूने अगदी सरळ काळी रांग पुसटशी दिसली . मी ते काय आहे पाहण्या साठी जवळ गेले  तर काळ्या मुंग्या अगदी तालात सरळ दिशेने पुढे पुढे जात होत्या .त्या प्रकाशात सरळ जात तर होत्याच पण अंधारात हि रस्ता न भरकटत चालत होत्या . कुठे तरी पुस्तकात वाचलं होत . मुंगी चालताना तिच्या शरीरातून एक प्रकारच द्रव सोडते ज्याला फेरोमोन असे म्हणतात . त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क कारण सहज सोप होत . तसेच आपल्या मागचे साथीदार रस्ता भरकटू नयेत आणि आपल्या सोबतच राहावेत  हि भावनाही तितकीच तीव्र असते . तितक्यात एक मुंगी इकडे तिकडे भरकटलेली मला जाणवली . पाहिल तर ती पाण्याच्या थेंबा जवळून गेली होती म्हणून रस्ता भरकटली . कारण ते फेरोमोन पाण्याने विरघळल होत . ती घाबरून सैरबैर पळत होती . मी हळूच हात पुढे केला तर ती माझ्या हातावर चढली आणि मी तिला त्या रांगे जवळ सोडल . 
 तर ……………. तर  ती मिसळली त्या रांगेत जणू  कधी ती दुरावलीच नवती अचनक त्यांचा एक भाग झाली होती . 
माणसाच हि असच काही होत असेल का .………? 
तोही कोणा न कोणा च्या मनात आठवण  नावाच फेरोमोन पेरत असेलच  न………?
 ती व्यक्ती रस्ता भरकटू नये आपल्या सोबतच राहावी अशी माणसाची हि तीव्र भावना असून हि ती व्यक्ती का टिकत नाही .…………….?  
 ती दुरावलेली व्यक्ती परत अशी आपल्यात मिसळत असेल का ………….?
तितक्याच सहज आपल्या आयुष्याचा भाग होत असेल का .…………?
ती व्यक्ती पहिल्यांदा जेंव्हा भेटेल तेंव्हा कशी वागत असेल .………….?
मी बेचेन होऊन माझ्या खोलीत जाऊन कपाटातील एक बरेच दिवस बंद असलेला डबा उघडला .

 त्यात होत माज गुपित खूप वर्ष जीवाशी साठवून ठेवलेलं जपून ठेवलेलं .ते विरघळलेल पिंपळ पान आणि एक दगड ज्याला कोरीव काम करून हृदयाचा आकार दिला होता . त्यात होते काही मोती धाग्यात पिरून त्याने माझ्या गळ्यात बांधलेले .
आणि माझे डोळे पाणावले त्याचा आठवणीने . मी तुटून निराश होऊन एकटीच पुटपुटले  
कुठे दुरावलास तू ……………?  
वाट पाहते मी तुझी .……!
खूप…………….. खूप आठवण येते रे तुझी आज .……… ! 
आणि मी कोसळले खाली …………. सगळ अस्ता व्यस्त पसरलं . बरेच वर्ष ठेऊन धागा कच्चा झाला होता आमच्या नात्या सारखा आणि त्यातले ते मोती खोली भर झाले होते विखुरले होते  अगदी माझ्या मनासारखे . माझे अश्रूही आता न थांबता वाहू लागले . मी कासावीस होऊन खचून रडू लागले . कशी होईल भेट आपली ……! 
का दुरावलास इतका माझ्या पासून तू …….? 
 मला हवा आहेस तू शेवट पर्यंत …………?
 मला आठवण पडली होती त्याची शाळेतल्या त्या एकमेकाना लपून छपून पाहणाऱ्या प्रेमाची .शिकवणीच्या तासाला माझ्या काडे लापून छपून पाहण्याऱ्या त्या डोळ्यांची . शाळा सुटल्यावर आम्ही त्या तळया काठच्या झाडा जवळ भेटायचो .एकदा त्याने माझ्या साठी काही मोती आणले होते स्वत ओउन माळ  करून . त्याच तळया काठी माझ्या गळ्यात घातले होते . आठवण म्हणून दिलं होत पिंपळ पान . आणि तळ्यात भेटलेला दगड झिजून दिलं होत मला एक रेखीव हृदय . खूप आवडायचं मला त्याच अस असण . माझ्यासाठी सतत काही तरी नवीन कारण . आम्ही खूप गप्पा मारायचो .तासान तास एकमेकात रमायचो . खूप प्रेम होत आमच एकमेकांवर. मला आज हि आठवत तो दिवस . सगळे आता चिडवु  लागले होते  काही गोष्टी घरी हि कळल्या होत्या . अल्लड वय म्हणून घरातल्यांचा  खूप आक्रोष हि सहन करावा लागला . अर्धवट शाळा कशी बंद करणार म्हणून दादा आता सोडायला आणायला येऊ लागला होता .मला काही त्रास होऊ नये आणि  आमचं अस वागण सगळ्यांच्या नजरेत येत आहे हे पाहून माझ्याकडे त्याने  बघण बोलण टाकल होत . फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढाच काळात होत . काही दिवस झाले मी आजारी होते म्हणून सुट्ट्या घेतल्या . वाटल एखादा तरी निरोप येईल मैत्रिणी कडे त्याचा पण तस काही झालं नवतं . उलट कळलं कि तो खूप आजारी आहे . नंतर बरं वाटल्यावर रोजनिशी सुरु झाली अजून अशक्त पणा होताच  पण दहावीच वर्ष त्यात परीक्षा जवळ आल्या मुळे शाळेत जाण गरजेच होत . तो दोन दिवस आलाच नाही . जीव कासावीस झाला खूप काळजी वाटू लागली . आणि तिसऱ्या दिवशी कंटाळत शाळेत गेले तर तो आला होता . पण खूप अशक्त . माझे डोळे पाणावले होते त्याला पाहून आणि त्याचे हि . मग नंतर नंतर आमच बोलणच व्हायचं नाही . असेच काही दिवस गेले आणि शाळेचा निरोप समारंभ जवळ आला . आम्ही खुश होतो . थोड बोलायला मिळेल पण आता परीक्षेसाठी सुट्ट्या मिळणार होत्या म्हणून थोड नाराज ही . आम्ही सगळे सजून निरोप समारंभां साठी आलो . थोड  बोलणं झाल मन शांत झाल . गाण्यांच्या भेंड्या खेळलो , खाऊ खाला , वेळ झाली ती खरच निरोप घ्यायची आणि मला तिथून निघावासच वाटेना .आज दादा आणायला येणार नवता कारण  मैत्रिणीनी घरी येउन मला न्यायचं आणि सोडायचं मान्य केलं होत . मी त्यांना सांगून थोडा वेळ त्याला भेटायला गेले त्या रोजच्या ठिकाणी  खूप रडले मी त्याला बिलगून आणि तो हि . आज आम्ही काही बोलोच  नाही आमच्या डोळ्यातून फक्त पाणी ओघळत होत .थोडावेळ थांबून मी निघाले मैत्रिणी सोबत .नंतर काही दिवसानी परीक्षा हि सुरु झाल्या . दहावीचा अभ्यास म्हणून सगळे अभ्यासात मग्न झाले होते .काही दिवसांनी परीक्षा संपली . कसे बसे २ महिने गेले . आणि वेळ आली रिजटची . आम्ही सगळे जमलो एकत्र . वर्गात सगळे पास झाले होते . तो हि आणि मी हि . आम्ही खूप आनंदात होतो . शाळे नंतर आम्ही त्या तळया जवळ भेटलो . आमच्याकडे आजही बोलायला काही नवता फक्त रडून हाल झाले होते . त्याने मला सावरल 
डोळे पुसून मला शांत केलं .
 मला आता तुला भेटता नाही येणार ………. मी … मी बाहेर चालोय शिक्षणा साठी .……!
पण ……… पण मी येईन नक्की मला तुझ्या सोबत राहायचं आहे . …………. !
मी हे एकूण संपले होते . पण त्याने मला दिलासा दिला होता . कि तो परत येईल . 

******************************

                            पण ……… पण ………… तो आलाच नाही .मी बरीच वर्ष वाट पहिली त्याची ……तो कुठेतरी दूर निघून गेला होता माझा विचार न करता . मला न सांगता . पण मग माझी हि काही कर्तव्य होती आणि मग माझ माझ्या आई वडिलांना लग्ना साठी नाही म्हणनं कठीण झाल होत .त्यांनी माझ लग्न लाऊन दिलं . स्वसोईने सुशिक्षित , श्रीमंत ,उच्च घराण सगळ्या सुखसोई सवाईने पडताळून दिल्या होत्या . मी खूप खुश आहे तो खूप छान आहे . एक व्यक्ती म्हणून , मित्र म्हणून , प्रियकर म्हणून आणि नवरा म्हणून हि . मला तो खूप खुश ठेवतो .पण आज तुझी आठवण आली . कारण कुठे तरी मी पोखरली गेलीये तुझ्या मुळे . तुझ्या वरच प्रेम मला या कातरवेळी सतत आठवत राहत आणि मला रीत करत जात . रोज दिवेलागणीच्या वेळी मला ओढ लागते ती त्या तळ्याकाठच्या भेटीची 
वाटतं……………वाटतं  आज हि तू माझी तिथेच वाट पाहत अशील  पण हा माझा निवळ गैर समाज आहे . पण आता मला भूतकाळात आणि वर्तमानकाळात गल्लत नाही करायची . माझा नवरा मला खूप जपतो त्याची पत्नी म्हणून मला खूप मान मिळतो . आणि त्याच्या बद्दल माझी हि काही कर्तव्य आहेत  . माला सगळ मागे ठेऊन त्याच्या सोबत पुढे जावच लागणार . आणि मला ते आवढेल . माझी करतवेळ जरी तुझ्या साठी चुकचुकली तरी  कधी ना कधी ती गोड आठवण होऊन माझ्या नवऱ्या साठी हि चुकचुकेल .
आता ………. आता या गोष्टीला पूर्ण विराम लावला पाहिजे . आणि मी ठामपणे तो डबा बंद केला . 


चैताली कदम 

Sunday, September 14, 2014

वेडा पाउस


वेडा पाउस चिंब भिजून गेला
नकळतच काही आठवणी देऊन गेला 
आठवणी एकत्र खेळलेल्या 
आठवणी एकत्र रुळलेल्या

कधी त्या दप्तरातून शाळेत गेलेल्या
शाळेच्या खिडकीतून पावसात भिजलेला
बाईंच्या खडूत ठळक उमठ्लेल्या
मित्रांच्या डब्यात पोठ भरून वाटलेल्या

मैदानाच्या मातीत धुंद दरवळलेल्या
कँटीनच्या खाउत मनसोक्त रमलेल्या
मधल्या सुट्टीत कल्लोळ मांडलेल्या
ऑफ तासात भेंड्या खेळलेल्या

कधी हसून टपली मारलेल्या
डोळे पुसून समजूत काढलेल्या
खिश्यातल्या चिंचा लपुन खालेल्या
गृहपाठाच्या वह्या उतरून काढलेल्या

शाबासकी मधून हवेत उढलेल्या
बाईंच्या आशीर्वादात प्रगती गाठलेल्या
रिझल्टच्या दिवशी धडधडून उठलेल्या
मित्रांच्या आठवणीत भरभरून जगलेल्या



                    चैताली कदम 

Tuesday, June 11, 2013

परी स्वप्नातली


थंडीच्या त्या धुक्यात मला शोधणारी ती 
मी दिसता क्षणी मला बिलगणारी ती 
धुंद पावसात चिंब भिजणारी ती 
सर होऊन भिजवणारी ती 

फुलांच्या गंधात दरवळणारी ती 
पाखरांच्या रंगात मिसळणारी ती 
इंद्रधनुषातील रंग उधळणारी ती 
दव होऊन चमकणारी ती 

रात्रीच रुपेरी चांदण ती 
पाण्यातील चंद्राच प्रतिबिंब ती 
वसंत ऋतूचा मोहक मोहर ती 
पालवीचा सुंदर बहर ती  

पावसातील हवेचा गारवा ती 
अंगावर येणारा शहर ती 
माझ्यातला मी पणा जपणारी ती 
तासान तास माझ्यात रुळणारी ती 

ती असावी परी माझ्या स्वप्नातली 
बेधुंद होऊन गाणारी 
मनसोक्त नाचणारी 
खळखळून हसणारी 
रिमझिम बरसणारी 

आणि मी 
तिच्यातच विसावणारा बेभान सा वारा 






चैताली कदम 


Thursday, March 28, 2013

आठवण येणार नाही


नं तुझे राहिले काही 
नं माझे राहिले
तुटले माझे हृदय होते 
पण पाणी डोळ्यातून वाहिले 

त्या क्षणाची आठवण म्हणून
कोवळीशी फुंकर घाल येउन
या तुटलेल्या हृदयाला हातात घे
आणि जाळ कुठेतरी  नेउन

म्हणजे तुझी आठवण येणार नाही


चैताली कदम 



Monday, November 12, 2012

दर्वळ


हंतरुणावर कोणाला तरी चाचपत ती उठली.बार्थ्रूम मध्ये बादली भरून धो......धो......वाहत होती.अंथरुणातच बसून पाठीवरचा सैल झालेला अंबाडा सोडून तिने परत घट्ट गुंडाळून बांधला.पाण्याचा आवाज ऐकून कपाळाला आट्या आणून तोंडातून "चक्क...."असा आवाज काढत ती बाजूला झोपलेल्या आपल्या मुलांकडे पाहू लागली.डाव्या बाजूला कोपऱ्यात तिची गोंडस निरागस मुलगी आणि उजव्या बाजूला ३मुलगे अशी ४ मुलं आहेत तिला.तरी सुद्धा देखणी,लांब काळ्या भोर केसांची होती. आपल्या मुलांकडे ती पाहत हसली.त्यातला सर्वात लहान मुलगा तिच्या कुशीतून गडबड लोळत तिच्या पाया पर्यंत पोहोचला होता.त्याला त्याच्या जागी निट ठेवत ती उठली.थंडीचे दिवस होते.त्यांच्या अंगावरची सरकलेली चादर तिने नीट केली.आणि सकाळची कामं आटपायला सुरवात केली.साडीच्या निऱ्या खोचत वाहून चालेली बादली सरकवून दुसरी बादली नळाला लावली.कामं आटपून अंघोळी नंतर तयार होऊन चहा घ्यावा म्हणून कंटाळलेल्या अवस्थेत ती किचन जवळ गेली.खोली तशी छोटीच होती.मुलांच्या शिक्षणा खातर मुंबईत येवून राहिलेली हि जनी. आधी कुठल्या तरी पडक्या चाळीत राहत होती.चाळ मोडीत गेल्या मुळे मुलांच्या हट्टा खातर एका ५ मजली इमारतीत दुसऱ्या माळ्यावर भाड्याने राहत आहे.जनीला स्वच्छता फार प्रिय.तिच घर नेहमी स्वच्छ आणि घरात मोगऱ्याचा एक मंद सुहास दर्वळत असे.बरीच वर्ष मुंबईत राहिल्या मुळे तुटक-मुटक इंग्रजी शब्द येत होते.पण भाषेवर काही प्रभुत्व मिळवता आल नाही अजूनही.किती झालं तरी माणूस आपली बोलण्याची पद्धत नाही बदलू शकत.हे तिच्या आणि तिच्या मुलांच्या भाषेतून बोलण्यातून जाणवत असे.पण तिची मुलं या भाषेचा उपयोग जनिशीच करत असत शाळेतील किंव्हा इतर लोकांशी व्यवस्तीत अशी मराठी शुद्ध भाषा वापरात असत.काही वर्षां आधीच तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलांना निराधार आणि पोरखं करून गेला.तेव्हा पासून जनीच मुलांची आई आणि बाबा झाली.राब राब राबून धुनी भाडी करून मुलांना वाढवू लागली.

जनी :- "हुश...!!........आई ......आई गं !......." लई पाठ दुखू लागलीया.कामाला जातानि मेडिकल मधून दवा घीन " 

ती स्वतःशीच पुटपुटली.चहा साठी ठेवलेल्या पाण्यात चहा पावडर टाकून साखरेचा डबा उघडला तर रिकामी.कमरेकडे खोचून ठेवलेली चिल्लर मोजू लागली नेमके पाचच रुपये होते.आता तिला हायसं वाटू लागलं 

"रव्या ?........ए...!...रव्या?  बघ की रं.....साखर संपलिया ! 
आंतूस का जरा दुकानातून?कामाला जायचं हाय!" 

ए ....पोर...!..ऐकतूस का रं ! 
"उठकी बाबा बग कि दिस उजाडला बी!कवा पतुर असं गडबाड लोळणार हाईस "

रवी:- "ए आय..!....नग ना गं तरास दिवूस. झोपुदे कि ग मला........."
रव्या आता जाणार नाही हे तिला कळालं.

तिने अगदी चेहेरा गरीब करून तिच्या मुलीला हाक मारली .
"मुग्धे जा कि ग माय तू तरी......."लई तलप लागलिया बग "ए! मुग्धे............."

मुग्धे :- "अं! ............."ए आय !एक दिस जा की अशीच.मला कटाळा आलाय गं !.....लई झोप आली बग "

आता मात्र जनीने तोंड वाईट केलं.कोणी उठायला तयारचं नवतं.आगीने चहा उकळून अर्धवट झालेलं पाणी तिने कस कस गिळल...........आणि निघाली कामाला.लांब सडक केस अगदी घट्ट गुंडाळून बांधलेले.बोट भर टिकली लावलेली थोडी गोरी मघ्यम बांद्याची काटकिळी.साडी एका बाजूने खोचून पदरही कमरेला खोचला होता.पायाला अपुरी पडणारी दोन ठिकाणी शिवलेली ती चप्पल रेमटवट ती चालत राहिली .मधेच तिचं लक्ष एका मेडिकल कडे गेलं.हातातली ती ५ रुपयांची चिल्लर पाहून ती म्हणाली .
"मयो..!....बर झालं साखर न्हाई आणली ते.दवा कशी घीणार व्हती म्या .!...........पण माझी लेकरं.?..ती तरी बिन साखरेचा चहा कसा पिणार हाईत. ताई कड मागते थोड पैस."
जनी मन मिळवू असल्याने ज्या घरी काम करायची त्यांना ताई म्हणून हाक मारत असे.मेडिकल जवळ जावून ती नुसतीच उभी राहिली खूप गर्दी होती.मेडिकल मधल्या मुलाने विचारलं 
"काय पाहिजे मावशी..........."

जनी:-"अंग फार दुखायल रे लेकरा कोणती तरी गोळी दि कि !.........जरा बर वाटन अशी....."

त्याने आतून एखादी पेनकिलर दिली असेल बहुतेक आणि ती हसून गोळी घेत तिथून निघाली . न थांबता चालत चालत कामात पोहोचली.शिड्या चढून दम टाकत दारावरची बेल वाजवली.एक १२/१३ वर्षाची चिमुकली दार उघडत जनीला आत घेत म्हणाली .

"काय झालं मावशी ? एवढ्या जोरात श्वास का घेताय? दम का लागला तुम्हांला  ?" 

जनी:-"काय नाय गं माय उशीर झाला म्हणून पटापटा शिड्या चढून आलेना.
"पण चिऊ घरी कशी आज तू सुट्टी हाय व्हय !"

चिऊ :- "हो......मावशी आज दसरा आहे न. विसरलात कि काय ? "
"बर थांबा तुम्ही बसा जरा.मी पाणी आणते तुमच्या साठी.फार लांबून येता न तुम्ही ? "

जनी :- (तिच्या कडे २ मिनिट बघून  विचार करू लागली चिऊ पाणी आनते म्हणली आणि मला सकाळची आठवण झाली.माई लेकरं मया साठी साखर आणून देवू नाही शकत.पण हि जिच्या घरी मी मोलकरीण आहे ती माझं दुखं जाणून पाणी आणत होती.

"नगं म्या घेती आपसूकच ........तुला नगं तरास बळे माझ्या मुळ."

कमरेचा पदर काढून तोंड पुसत म्हणाली 


पुढे जाता जाता पुटपुटली," आज दसरा हाय म्हणून आपली पोर अशी आबड धोबड लोळत व्हती आणि काल मुग्धी माझ्या ब्लाउज ला हात शिलाई मारीत व्हती.आज घालायची आसन तिला मई साडी."

डोक्याला हात लावत ती म्हणली "मयो सनसूद बी कळत न्हाई मला . अशी कशी इसरले म्या दसरा "कामाच्या आणि घरातल्या दगदगीत संन बी इसरले म्या !"

बोलता बोलता  किचन कडे वळली "ताई म्या आले बर का !" 
"आज काय बनवायचं जेवणला?"

ताई :"आज आपण पुरण पोळी बनवूया.पण त्या आधी जरा चहा नाश्ता बनवून सगळ्यांना दे आणि स्वतः पण घे कामात वेळ कसा जाईल कळणार नाही."

जनी चहा नाश्ता घेऊन चिऊच्या आजी कडे गेली "आजी ! ओ आजी! चाय आणली बगा . दार उघडतान का आज तुम्ही? " जनी हसऱ्या स्वरात म्हणाली 

"जनी !बाळा थांब गं! आलेच मी"आजीनि बेडरूमचा दरवाजा उघडला जनी ने ते ताट टेबलावर ठेवलं आणि निघाली 

आजी :-(आजी तिच्या कडे पाहू लागल्या )"जनी तबेत ठीक नाही का गं तुझी "  
जनी :-"न्हाही आजी म्या ठीक हाय "
आजी :- "नाही ग तोंड अगदी उतरलं आहे.बस बघू माझ्या जवळ "
जनी :- "नाही आजी काम पडल्याती. म्या जाते (नजर चोरत ती म्हणली तिला ठाऊक होतं आजी काळजाला हात घालतील आणि तसाच झालं )
जनी :- "न्हाई आजी मई पाठ अगदी भरून आल्यागत झालय बगा पण....पण म्या दवा खाल्ली हाय . तस आता जरा बर वाटू लागलं "
आजी :- "अग एवढी ३/४ कामं कशाला करतेस लागोपाठ शरीराला थोडा आराम मिळाला पाहिजे "
जनी :- "व्हय आजी आता कोण हाय करायला.संध मालच करायला लागतं.घरी बी आणि बाहेर बी कुठं कुठं लक्ष द्यायचं.तशी माई पोरगी करते घरचं काम पण तिला बी शाळेत जायचं असतना तरी बी ती जमन तीवढ काम करती "
आजी :-"किती मुलं तुला "
जनी :- "चार हाईत पण चारी बी चार परीची हाईत बगा....एक मुलगी तीन मुलगे 
"ठिवून गेलाय त्यो मया साठी माग.मला बी घेऊन गेला असता तर बर झालं असतं "
आजी :- "अगं ..!अस का बोलतेस "
जनी :- "व्हय आजी म्या खरच बोलती पार थकून गेलीया पोरात "जाउद्या म्या जाते मला काम करायची हाईत येते म्या . तुम्ही खावून घ्या पटा पटा  "
आजी :-"बर ठीक आहे पण काळजी घे "
जनी :-"व्हय! व्हय!...." म्हणत ती आजीच्या खोलीतून बाहेर पडली 
चहा नाश्ता सगळ्यांना देऊन उरले-सूरलेला स्वतः केला.आता जरा पोटाला बऱ्या पैकी आधार झाला होता.मग तिने खोचून ठेवलेली ती गोळी घेतली .
जनी ने जेवणाची सगळी कामं आटपली पण पुरणपोळी करताना तिचे डोळे भरून आले.तिच्या नवऱ्याला पुरणपोळ्या खूप आवडत.त्याच्या आठवणीने तीच मन जरा मावळालं होत. पण आपलं दुख कोणाला कळू नये म्हणून ती वरवर हसतचं होती.ते आटपून आता कपडे भांडी करण्यासाठी निघाली ते आवरे पर्यंत दुपारचे २ वाजले होते.सकाळच्या ९ चा नाश्ता होऊन बराच वेळ झाला होता. आता मात्र पोटात कावरी भरून जनी भुकेने आतुर झाली.कामं आटपली होती.पदराने हात पुसत
 "ताई !......ताई !.....निघाले म्या" 
"थांब जरा जनी...."डब्याच झाकण लावत त्या तिच्या जवळ आल्या "हे.. घे...घेवून जा तुझ्या मुलां साठी "आणि हे घे (हातात ५०० रुपयांची नोट टेकवत म्हणाल्या ) बराच वेळ झाला नं जेवणा मुळे "
जनी ने हसत तो डबा पिशवीत टाकला आणि "चला निघते "म्हणून निघाली .आज ती थेट घरी जाणार होती . बाकीच्या कामावरून सुट्टी मिळाली होती.थकलेल्या अवस्थेत ती इकडे तिकडे पाहत चालत राहिली ते घर येई पर्यंत.धापा टाकत दोन माळे चढून दार उघडून आत आली तर घरात पसारा पुढ्यात मुलगा गडबड लोळत अजून हंतरुणात पडला होता.मुलगी किचन जवळ काही तरी खटपट करत होती.आणि लहान दोघं दंगा करून.त्या झोपलेल्या भावाला अजून का नाही उठत म्हणून त्रास देत होती.
"रव्या! ए रव्या !" अजून लोळतोस व्हय " उठ की रं आता. बग की साडे तीन झाले " हातातली पिशवी पुढ्यात आलेल्या मुलांच्या हातात दिली "घी खा थोडं थोडं ताईनं पुरणपोळ्या दिल्या हाईत "लहान मुलाने हसत हातातली पिशवी उघडत एक घास तोडला.

जनी :-"माय पाणी दितीस का गं "
आपल्या मुलीला ती म्हणत भिंतीला टेकून बसली 

मुग्धा :-"ए आय घी कि काम करायले म्या "

जनी :-(रागाने)"लई चालावं लागतं.आल्यावर हातात पाण्याचा गलास पण दिऊ शकत नाही का दिस भराचा तुम्ही.फकस्त खायचं तीवढ कसं जमतंय तुम्हासनी "

मोठा मुलगा तिची बडबड ऐकून बिछान्यातून उठून बार्थरूम कडे वळला.पण पसारा तसाच ती चिडलेली पण काही न बोलता निमूट पणे हंतरुणाची घडी घालत स्वतःशीच पुटपुटली.तितक्यात लहान मुलगा येवून तिला बिलगला
"ए आय आपल्याला बी कर ना गं पुरणपोळी लई खावीशी वाटायली"
जनी:-"व्हय रं लेकरा करती म्या.तस पण आज दसरा हाय ना मग करू कि 
"रव्या ! रव्या ! जा जरा भाऊला घिऊन बाजारात आणि गूळ घिऊन ये "

रवी :-" म्या न्हाही जाणार.आताच उठलोय लगीच कुठं जाऊ "आणि लहान भावाला टपली मारत "पुरणपोळी खायची म्हनतुय ढवाळं लागल्यात का?"अस काहीस पुटपुटला 

जनी:-"अय! काय मारतूस त्याला.राहुदी कि एवढ्या आवडीन मागायल पोर "

रवी:-"मग पाठव कि त्याया  बा ला "

जनी :- (हात उगारून त्याच्या कड दोन पावल टाकत म्हणाली ) "कोणाचा बा काढतुस रं तुआ न्हाई का त्यो "

रवी :-(जनीचा हात धरत तिला हिसकावत तो म्हणाला) "अय म्हतरे का म्हुण माराया लागलीस सामान अंतू म्हणतोय नं "
जनी खाली कोसळली आणि रडू लागली तिची मुलं तिच्या भोवती गोळा झाली कोणी डोळे पुसत होतं कोणी केसांवरून हात फिरवत होतं.कोणी बिलगून नुकतच रडत होतं .

जनी :- "आपल्या बा वाणीच निघालास मुडद्या !"पण एवडं खर त्यो असता तर असं दारोदरी भटकाया नसतं लागलं मला "
(त्याच्या कडे हात दाखवत )ह्या भाडखाऊ च्या अश्या शिव्या आणि मार नसता खावा लागला मला "त्यो बी मारायचा.पण जवळ बी घ्यायचा .लई मार खालाय म्या त्याचा.भाऊच्या वेळी गरवार असतानी मला खूप मारलं व्हत त्यांन.मला चांगलच आठवतय.घरात लय भांडण झाल व्हतं तव्हा.तुया बा लई दारू पिऊन अला व्हता.कुणाशी तरी झगडे बी जाले व्हतं . इवढा उशीर का केलात म्हणले तर रागारागात दोन थोबाडीत मारून लात मारून खाली पाडलं आणि डाव्या बाजूला पोटात घपदिशी चाकू घुसवला .म्या खूप कळवले काही सुचेच ना हाताला रगत आणि डोळ्याला पाणी.संध अंग सुन्न झालं व्हतं आणि म्या बेसुध झाले डोळे उघडले ते दवाखान्यातचं.मला झाग आली तर हा माया वाजूला बसलेला जणू ह्याला माई लई काळजी.त्याच्या डोळ्यात माझ्या साठीच पिरेम मला अगदी येगळी असल्याची जाणीव करून द्यायचं.पण अस व्हतं तर मारलं कशाला.माझं नशीब म्हणून तो चाकू टीचभर आत गेला.माझ्या भाऊला काही नाही झालं. मार बी तेवडाचं आणि पिरेम बी  तेवडाचं
"भिंतीला टेकून गुढग्यावर डोक टेकत ती म्हणली.आणि मुलं एखादी गोष्ट सांगतात तशी आ करून ऐकत होती.

रव्या :-(भिंतीला टेकून उभा होता )"झालं का कीर्तन गाऊन.अय बये! दि कि पैक उगा टाइमं खोटी नग करू.दि आता लवकर "

जनी :-(रागारागात कंबरेला खोचलेले पैसे काढत फेकत म्हणाली ) "धर ऐ मुडद्या घी घी "

रवी :-(हसत)"मयो ! पगार झाला वाटतं म्हतारीचा पैक वाली झाली "दि कि ग मला बी थोड पैक
तो निर्लजा सारखा हसत म्हणाला जणू काही झालंच नाही.आपल्या आईला इतका त्रास झाला ती रडली याचा त्याच्या चेहेरऱ्यावर काहीही परिणाम दिसत नवता.

जनी :-"हाय का लाज मुडद्या.भाजून खाल्ली का लाज तव्यावर"तरी बी हसतंय कस बेन "
रागाने बाजुची चप्पल फेकून मारत ती म्हणाली "सांग त्याला डाळ आणि गुळ आणाया" 

तो हसतं टिंगल करत चपल्ल घालत निघून गेला.मग ती त्या मुलांना जवळ घेत डोळे पुसत गप्प करू लागली "जा काही तरी आन खायला भूक लागली आसन पोरांना.काई खाल्ल व्हतं का ?"

मुग्धा :- "न्हाई आय कुनी बी काय बी खाल्लं न्हाई.हे दोघ आताच थोड्या येळा आधी उठलेत. आंगोळी झाली पण खानंपाणी काय बी नाही.आज सुट्टी हाय ना "आणि त्यो गड बड लोळत पडला व्हता. कवा पासून हाका मारायले म्या.पण जरा सुधिक हल्ला न्हाई "

तिच्या गालावर हात फिरवून म्हणली "जावूदी तू जाय काही तरी आन जेवायला.मला बी भूक लागली "आता मुग्धाला हि कळाल आपल्या आईला भूक लागली.पण ती एवढी शी पोर तिला काय आणि कितपत येत असेल जेवण.कसंबसं तिने आपल्याला जमणारा डाळ भात आणि बटाट्याची भाजी तेवढी केली होती. तिघांनी हि जेवून घेतलं आणि एका जुन्या कामात बक्षीस म्हणून मिळाली खोपट्यात ठेवलेली ती टीव्ही लावली आणि जे दिसेल ते मुकाट पने पाहू लागले.तेवढ्यात खालून हाक ऐकू आली भाऊ !ऐ भाऊ! आणि भाऊ खिडकी पाशी येवून उभा राहिला खाली पाहिलं तर रवी सामान घेऊन उभा होता भाऊ वरून खिडकीतूनच ओरडला "काय दादा" 
रवी :-"खाली ई लवकर माया हातातलं समान घिवून जाय."

भाऊ :-"वर ई दादा आई बोलवती"

रवी :-"न्हाई तुचं ई मी भाईर जातुय "

तितक्यात जनी भाऊच्या मागे खिडकीत आली.
जनी :- "आरं रेड्या वरी ई कि ! "कवाचा आरडायलं लेकरु.तरी बी समजत न्हाई का?"

                 आता रवी चिडून धावत वर आला पण तो खूप चिडलेला असल्याने घरात येताच जनी कडे पाहत हातातलं तिला शिवी घातली समान आणि पैसे फेकले सामानाची पिशवी भिंतीला जावून आदळली सर्व डाळ आणि गुळ घर भर पसरलं.आता मात्र जनी खूप चिडली होती.ती धावत त्याच्या कडे गेली.त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला रागाने गदागदा हलवत विचारू लागली
"इवडा राग इयाला रेड्या तुला.लई मोठा झालास व्हय रं ! माज आलाय तुला.पैक गेलना पाण्यात आता कुठून आणू म्या.कस करून घालू मया पोरांना " आणि तिने रागात त्याच्या गालावर एक चापट ओढली.त्या मुळे तो आणखी चिडला आणि कॉलर वरचा तिचा हात झटकत तिला हिसकावलं आणि शिव्या देत तिच्या पाठीत जोरात फटका मारला  "मला मारतीस"  
जनी ला काही सुचेच ना.आपल्या मुलाने आपल्यावर हात उघरला.या झटक्याने ती कळवळत रडत तिथेच पडून राहिली.तो तावातावाने तिथून निघून गेला.आता सगळं शांत झालं.दमल्या मुळे डोळ्यातून ओघळणार पाणी सुखायच्या आतंच ती झोपून गेली होती.तोड्या वेळाने हळू हळू डोळे लुकलुकत ती उठली घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे पाच संव्हा पाच झाले होते.घर अगदी स्वच्छ लखलखीत चमकत होतं.मुलं बाहेर खेळायला गेली होती.शांतता पसरलेली तिची मुलगी मुग्धा तिच्या जवळ आली तिला माहित होतं आईच्या डोळ्यालं पाणी काठावरच आहे.मी काही बोलले तर आई खूप रडेल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली "जा तोंड धुवून घी म्या चाय दिती तुला " 

                  थोडं झोपल्यामुळे आता जनीला तसं बंर वाटत होतं भिंतीचा आधार घेत ती उठली तोंड हातपाय धुवून बाहेर येवून बसली."चहा हाय का ?"
मुग्धा :- "हाय आय" 
जनी :-"साखर आणायची आसन ना?"
मुग्धा :-न्हाई म्या माझ्या साठवलेल्या पैशान आणली कि साकार सकाळी "
चहा पिता पिताच तीने आशेने विचारलं "डाळ आन गुळ कुठंय गं " त्यावर खांद्यावर हात ठेवत मुग्धा म्हणाली "मी पसारा आवरून ठीवलाय डाळ बी साफ करून ठिवली आणि गुळ बी तसाच हाय फकस्त दोन तुकडं झाल्यात" जनीला हायसं वाटलं आणि ती मनापासून हसली चहा झाल्यावर कप उचलत ती म्हणली "चला बाई पुरणपोळ्या करायच्या हाईत डाळ शिजवायची हाय.तुया बा ला लई आवडायच्या पुरणपोळ्या.मला परतेक सनाला कराया लावायचा अन आवडीन खायचा .पुरणपोळ्या म्हनलं ना कि त्याई आठवण व्हती मला.सकाळी बी आली त्याई आठवण आन डोळ भरलं पर कामात कस बस रडू आटपलं.कुणाला सांगू म्या दुख.ह्यो लेक तर हयो असा.जावुदि उगा कशाला तरस करून घिऊ.आता कामाला लागते." तिने सगळं विसरून खुप आवडीने पुरणपोळ्या बनवायला सुरवात केली.पुरणपोळी होता होता मुलं हि घरी परतली होती. 
"मला दि ना ग पुरणपोळी "म्हणत तिच्या भोवती घोळका घालून बसली. 
"थांबा पोरानो जरा.आधी हात पाय धुवून घ्या बगु .तोवर म्या देवाला निवद दावती अन मग खायला बसा सगळे "



सगळं आवरून तिने घरातला केर-कचरा काढून हात पाय धुतले. देवाला नैवद्याच ताट पुढ्यात ठेऊन साकडं घालू लागली "देवा माझ्या घरात सुख शांती नांदू दे.का अस दारोदरी भटक्या लावतूस." 
तीतक्यात शेजारच्या मुली नट्टा-पट्टा करून दसऱ्याच सोन द्यायला आल्या 
"काकू!काकू!"सोन घ्या " करत तिच्या हातात अपट्याची पान कोंबत तिच्या पाया पडू लागल्या 
"बस ! बस ! नगा मया पाया पडू .राहुदि खूप शिका आणि मोठ्या व्हा "वाकत असलेल्या प्रत्येक पोरीला ती म्हणत होती.मुलांना हा सन खूप आवत असावा.या आपट्याच्या पानांचा सोनं म्हणून वाटप म्हणजे गंमत वाटत असावी.हातात आपट्याची पानं टेकवत पायाला हात लावत हा गंमतीशीर प्रोग्राम चालत असे सगळ्यांचे कैतुकाचे बोल ऐकून मुलं खुश होत असत आणि मुली हि "छान दिसतेस"असं म्हणतातच मुलीच्या गालावारीची कळी खुलत असे.अशा रीतीने हि मुलं मोठ्यांचा आशीर्वाद आणि मज्या करत असत. 

"मुग्धा ! तू का नाही तयार झालीस अजून"चाल लवकर तयार हो " तिच्या मैत्रिणी तिला आग्रह करू लागल्या 
"बर ! तुम्ही व्हा पुढे मी येते तयारी करून " मुग्धा ने आधीच आईची पेटीतील साडी काढून ब्लाउजला टाके मारून आपल्या मापाचा करून ठेवला होता.सगळी तयारी करून ठेवली होती पण भांडणा मुले तशीच राहून गेली. 

जनी:-"मुग्धे ! जा कि ग ! म्हणलीस न त्यांना मग व्हय कि तयर आणि जाय त्यांच्या बरोबर " काढ पेटी म्या काढून दिती साडी तुला " 

मुग्धा :-"नग आई म्या काढून ठिवली हाय पर मला न्हाई जायचं आता.राहुदी "

जनी :-(तिला पोटाशी कवटाळून म्हणाली ) "जा बाळे म्या निसवती साडी तुला तू नग मन नाराज करूस जाय बिगी बिगी " 

आणि मुग्धा तिथून निघून गेली.फ्रेश होऊन "आय मला हि साडी निसव " म्हणत आतल्या खोलीतली साडी आणून तिने जनीच्या हातात दिली.आणि काही तरी आणायला म्हणून आत गेली .हातातली ती साडी पाहून क्षणभर ती स्थिरावली आणि डोळे भरून आले.पण तिने ते पाणी डोळ्यातच सुखु दिलं . तितक्यात मुग्धा आली

"आई ! आई ! नेसवतेस ना साडी " 
"हो गं ! निसवती बाय "
तिला साडी नेसवून तिचे केस विंचरून दिले.मुग्धा नटूनथटून आईला दाखवायला आली 
आई!...बघ....
"मयो छान दिसायलीस गं !"असं म्हणत तिच्या कानामागे जनीने काळ तिठ लावलं 
"तुया बा असताना आता तर डोळ भरून पाहिलं असतं त्यानं.कशी गोजिरवाणी दिसायली माझी मुग्धा म्हणत डोळ पाणावल असतं आता पतूर त्याच "आणि जनीचे डोळे पाणावले 

तिच्या मैत्रिणीनी तिला हाक मारली "मुग्धा ! झाली का तयारी तुझी.बाहेर जायचं आहे चलं " 
आय ! म्या जाती ग! मला पैस दि ना.आम्ही फोटू काढाया जाणार हाईत"जनी कमरेला खोचलेले पैसे चाचपत म्हणाली "मगाशी राव्यान रागान फेकलेल पैस कुठ ठीवलास"
"हा त्या गलासा खालीच ठीवलत बग " जनीने फळी वरचं ग्लास उचलून पाहिलं तर ५५ रुपये होते त्यातले ५०रुपये काढत तिच्या हातावर टेकवले
 "लवकर घरी ई बाई.इथ तिथ उंडगु नगं " म्हणत ५ रुपये तिने कमरे जवळ खोचले.
मुग्धा मान डोलवत हसत साडी चाचपत तिथून निघून गेली.
आता घरी कोणी नवत सारं काही शांत चाळीतीली मुलं जिकडे तिकडे आपट्याची पान वाटायला फरार झाली होती.आता मात्र जनी शांत झाली.घरात कोणीही नवतं बाजूच्या घरातल्या गाण्याचा मंद आवाज फक्त ती आणि देवा पुढे लावलेल्या त्या उदबत्तीचा दर्वळ अगदी कोना कोनात पसरला होता जनी त्या भिंतीला टेकून शांत बसली होती.तिच्या नवऱ्याच्या फोटो कडे एकटक पाहत राहिली . आज तिला बहुतेक त्याची जास्तच आठवण येत होती.
*******************************
"जने म्या जातुय गं!जरा उशिरानच ईन.काम हाय फोन बिन नग करूस "
"आव पण आता रातीचं १० वाजल्याती.आता कंच काम हाय "
"अग नग पाटी कटकट लाउस चल म्या निगालो "म्हणत तिचा नवरा घराच्या बाहेर पडला.मुलांच आणि स्वतःच जेवण आटपून साफसफाई करून दमल्या मुळे हंतरुणावर पडताच तिला छान झोप लागली.सकाळी सकाळी धाड धाड कोणी तरी दरवाजा वाजवू लागलं तशी ती तडफडत जागी झाली मुलं हि जागी झाली आणि चिडून जनी म्हणाली "आला असन दारू पिऊन "उठून तिने दार उघडलं चाळीत बाहेच्या टोकावर दुकाना जवळ राहणारी दोन मुलं घाबरून धापा टाकत उभी होती.
जनी घाबरली काय झालं त्यावर ती मुलं फक्त "दुकाना जवळ मामा !मामा ! मामला" म्हणत अडकली जनीला वाटलं भांडण झालं तिच्या नवऱ्याच कोणाबरोबर ती मोकाट धावत सुटली थेट दुकाना जवळ तिच्या पाठी तिची मुलं पण.कसलीही हि चिंता न करत काही लागेल याच भानच नाही राहिलं तिला. दुकाना जवळ खूप गर्दी होती.ती बाजूला सारत पाहते तर तिचा नवरा चाकूचे सपा साप वर होऊन रक्त बंबाळ होऊन पडलेला.त्याच्या जवळ जावून त्याच डोक मांडीवर घेत ती "ओ !ओ! काय झालं तुम्हांला काय झालं " डॉक्टरला बोलवणा कुणी बोलावना डॉक्टरला "म्हणत ती घाबरत ओक्साबोक्शी रडू लागली.गर्दीत उभा असलेल्या एका इसमाने त्याचा हात हातात घेतला.त्याची नाडी तपासू लागला.त्याच्या हृदयावर हात ठेवत कान ठेवत त्याचे ठोके ऐकू लागला.नंतर तिच्या कडे पाहत नकाराआर्थक मान डोलवत तो उठला.ती आणखी घाबरली "ओ !ओ !उठाना उठाना " रडणाऱ्या आपल्या मुलांकडे पाहत "रव्या !ए रव्या! बग कि उठाव कि तुया बा ला.मुग्धे ! ए मुग्धे !मार कि हाक तुया बा ला" म्हणत ति भानावर आली तर मगाशी भिंतीला टेकून बसलेली ती तशीच होती.तिच्या डोळ्यातून अपोआप पाणी ओघळू लागले.
तुया या दोस्ती खातत्यानं माय संध आयुष्याच बदलून टाकलं.मित्र मित्र करून ज्यायला जवळ किलस त्यानंच तुया पाठीत चाकू घुसावंला.म्या किती सांगत व्हते.नग जाऊ बाहीर हि अशी भाई गिरीची काम नग.जीव घाबरून मला कस कस वाटत व्हतं.पर तुया पुढ काय म्हणलं तर.....तर.....तू मला परत भांडशील आन मारशील म्हणून काय बी बोले नाय.पण इवढ काय झालं व्हतं ते तुया मित्रांनी मारकरी करून तुला मराया लावलं .फकस्त इवढ कळलं मारामारीत तुझ हे असं झालं पण न्हाई तुया वरच्या जळनुकीवरून अन तुझ्या हातात सतत नांदणाऱ्या लकशिमीन तुया जीव घेतला.त्यादिवशी तुया बद्दल सांगत आलेल्या मुलां मूळ तुला बगाया धावत आले तर तू चाकूचं सपासप वार व्हवून रक्त बंबाळ जीमिनीवर आस्था व्यस्थ पडलेला.अन माझ्या अंगातला जीवाचं निघून गेला.तुला असं बगून म्या घाबरले. किती वूठावलं तुला.तरीबी उठ्नास.तुला कशी काळजी वाटली न्हाई आमची .हि अशी ह्याची त्याची रूम विकून ,दलाली मिळवून,भाईगिरी करून ,ऊरा पोटाशी चाकू सुऱ्या मिरवून काय भलं व्हणार व्हतं तूअ.शेवटी केला ना घात तुया मित्रांनी तुआ. हातात पैसा व्हता तर तुये मित्र तुया बरोबर फिरायचे पण मनात डाग ठीऊन.तुला ते कदी बी कळलं न्हाई.तुला दारू पाजून मैत्री खात्यात उशिरा पतुर थांबून केला घात तुआ.अलगत तुआ काटा काढला आणि टाकून दिलं तुला त्या दुकाना पाशी.किती तडपडला आशीन.किती तरास झाला आसन तुला.सकाळी तू मेला समजल्यावर परत दुकाना जवळ येऊन काय म्हाहीत न्हाई असा आव आणत माझी माज्या बघत उभ अस्तीन त्या लोकांच्या गर्दीतच.तुला मेलेला बगितल असन अन खुश झाली  असतीन संधी .पण त्या गर्दीतला नक्की कोणता चेहेरा खोटा व्हता कसं कळणार व्हतं मला.तुया मरणा नंतर धुमाकुळच घातला या लोकांनी.पेपरात काय छापलं तुया खुना बद्दल .मोठमोठ्या सबा काय भरावल्या.इतकाच काय खोट्या आधारच नाटक बी केलं.अन दुसऱ्या दिवशी हजर झाले कर्जाचा मोर्चा घिऊन.अन ते बी गोड बोलून.पर तुई ती हिशेबाची वही माया कमी आली.मला ठाव व्हतं.तुआ जो बी काय यवहार हाय त्यो संधा ह्यात हाय मग काय खोल्ली वई अन धरलं एकेकाला काट्यावर.कुणाच बी कर्ज नवतं .अन व्हत ते बी तू फिडलं व्हतस त्यायंच्या सह्या बी घीतल्या व्हत्यात.म्हणून कोणाची भिशाद झाली न्हाई वर तोंड करून बोलायची.तू लिहून ठीवल्या परमाने दोन घर आन काही पैक ब्यांकित मिळालं.पर तू असतास तर यायला आणखी शोभा आली असती.पण तू गेलास अन सगळ्याचा इस्कोट झाला.
"का सोडून गेलास मला एकटीला.किती एकटं वाटू लागलं मला ठावं हाय तुला.लोक कश्या कश्या नजरेने बगतात मया कड.तू व्हतास तर मला नजर वर करून बी पाहिलं नाही.लई घान वाटते त्यांच्या नजरांची मला.आज दसरा तुया आवडीचा सन पण तू न्हाईस दर दसऱ्याला पुरण पोळ्या करून घालाया लावायचास.आपली पोर बी कशी वागतात माया बरोबर कोणीच नाही माय दुक ऐकाया कुणी बी नाय.फकस्त तुच व्हतास पण तू बी मला असं मधीच सोडून गेलास.मला मारायचास पण जवळ बी करायचास.मला काय हव नको संध बगायचास.आता मला काय झालं तर कुणाला सांगू म्या "कुणीच नाही कुणी म्हणजे कुणीच नाही मया सठी फकस्त दर्वळते ती तुझी आठवण ह्या सुगंधा वानी " आणि तोंडावर हात घेऊन रडू लागली .



                                                
चैताली कदम                

Friday, July 20, 2012

पावसाची एक वेगळी सर.......


बाहेर मुसळधार पावूस पडत आहे ...............
सारं वातावरण अगदी थंडगार आणि गारटवणारआहे................
ऑफिस मध्ये खूप काम असल्यामुळे आजचा दिवस खूप थकवणारा होता ........
तरीही संध्याकाळी पावूस पडल्या नंतर अगदी तरतरीत ताजे तवाने वाटू लागले ..............
हो बाहेरच्या चिखल आणि टॅ्फीक मुळे चिडचिड होत होती पण पावसाची सुरवात असल्या मुळे चिडचिड आपोआप थांबतही होती .......
पावसाचा आनंद घेत आम्ही मैत्रिणीनी पाणीपुरीचा बेत देखील केला आणि मग गरमा गरम तिखटमीट आणि रसरशीत लिंबू लावलेला मक्याचा आस्वाद घेत स्टेशानच्या दिशेने निघालो...........
ट्रेन प्ल्याटफॉर्मला नुकतीच लागली होती आम्ही धावत पळत ट्रेनमध्ये चढलो आणि खिडकी जवळची जागा पकडली.............
ट्रेनचा प्रवास अगदी मजेत सुरु झाला बाहेरच्या पावसाची आणि मक्याची मज्या घेत गप्पा रंगल्या तेवढ्यात ट्रेन पुढच्या स्टाँपला थांबली..............आणि भराभर सगळे आत शिरले त्या गर्दीत काही शाळेतील मुलं आणि त्यांची आई देखील होती त्यातली एक बाई पुढच्या सीट वरील बाईला सांगून आपल्या मुलाला बसायला जागा करून देत होती जागा झाल्यावर तो मुलगा टूनकण  उडी मारून तिथे बसला...............थोड्याच वेळात जागा  झाली तशी ती बाई देखील बसली पण कुणास ठावूक ती अचानक इकडे तिकडे पाहू लागली आणि एकटीच हसू लागली बडबडू लागली तिच्या मुलाला खेळवू लागली पण तिची पद्धत खूप वेगळीच होती सगळे तिच्याकडे पाहून हसू लागले तीच अस वागण......... तिच्या मुलालाही काळत होत...........
हे सगळे आपल्या आईला हसत आहेत हे पाहून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करु लागला ...आई नको न गं असं करू ...........गप्पं बस ना  गं ............ बघ सगळे हसतात तुला...
अस म्हणून तो त्याच्या आईला समजावू लागला तिच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला...........पण त्याचा काही उपयोग होत नसलेला पाहून त्याचे डोळे काठेकाठ भरले................शेवटी सहन न झाल्या मुळे कसलाही विचार न करता त्याचे अश्रु ओघळू लागले तेंव्हा त्याच्या डोळ्यात बाहेरच्या पावसा पेक्षाही जास्त तीव्रता आणि दुख होत आणि ते बाहेरच्या पावसाला देखील मात करत होता निव्वळ सात आठ वर्षाचा तो चिमुकला काय करू शकणार होता आणखीन .............
हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आले कि ती वेडी होती आणि सगळे शांत झाले................
काही रोजच्या बायकान कडून कळले कि ........तशी ती चांगली असते पण तीला मध्ये मध्ये वेड्याचे झटके येतात ..........त्या मुलाची ती तडफड पाहून खूप वाईट वाटले सगळे जन कसे हसत होते तिला एखाद्याच दुख: समजून न घेता आपल्या कडून दुसऱ्या व्यक्तीला खूप वाईट वागणूक दिली जाते . किंव्हा नकळत आपण कोणाला दुखवत तर नाही ना .अस नाही का वाटत या प्रसंगा वरून . तो मुलगा त्यावेळी काय विचार करत होता..............त्याच्या मनाला किती वेदना झाल्या ............. हे आपणही नाही सांगू शकत पण त्याच्या आईला सगळे हसतात हे त्याला पटलं नाही आणि ते थांबवण्याचा हि त्याने प्रयत्न केला . पण तो एवढासा मुलगा आतून किती तुटला असेल हे कस कळणार त्या हसणाऱ्या व्यक्तींना  . थोड्या वेळाने स्टेशन आल आणि आमच्या सोबत तो मुलगा हि आपल्या आईला घेऊन खाली उतरला आणि समोरच्या बाका वर जावून बसला आम्हीही त्याच्या सोबत थांबलो होतो थोडा वेळ................मग तीला थोड बरं वाटलं तस त्यांना टॅक्सी पर्यंत सोडून आमच्या मार्गी लागलो पण मला काही चैनच पडेना सारखा त्या मुलाचा चेहेरा डोळ्या समोर येत होता आपण आपल्या पालकांना आणि आपले पालक आपल्याला किती पुरत असतो नं ..........
आपण सतत एकमेकाच्या सह असतो आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेत ही ...................
पण कमाल त्या इवल्याश्या मुलाची कि त्याने आपल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला.........
काही दिवसांनी संध्याकाळी आम्हाला  तो परत दिसला त्याची आई पण होती त्याच्या सोबत.... पण ती ठीक होती या वेळी..................
त्याने व तिने गप्पा हि मारल्या आमच्या सोबत आणि उपचार चालू आहेत असे ही समजले..................
अश्या प्रकारे पावसाची एक वेगळी सर......................अनुभवायला मिळाली 




चैताली कदम 

Wednesday, July 18, 2012

पंचाक्षर

दोन व्यक्तीतील एक वेगळी .पण आपलीशी वाटणारी गोष्ट .प्रेम ..........हि भावना त्या व्यक्तीला कधी कळते काही माहित नाही पण .एक मेकांजवळचा एक असा क्षण जो आपल्याला एकमेकानकडे पाहून आपल्यात काही तरी वेगळ असल्याची जाणीव देतो .एकमेकान मध्ये काही नसताना जेंव्हा दोन क्षण एकमेकान कडे पाहत .अस का झालं .हे का होत आहे .हि भावना येन नक्की काय आहे .काही तरी चुकल्या सारखं .लाजल्या सारखं......काही तरी जाणवल्या सारखं.....गुंतल्या सारखं ......त्यावेळची ती एक नजर आपल्यातल्या वेगळ्या नात्याची जाणीव करून देत असते .एवद्या दिवसानच्या सहवासत कधी अशी वेळ आली नाही आणि आज .आज अशी हि वेगळे पणाची भावना का ............मी आज ओळखल कदाचित त्याला.......आज जाणल जवळून .......मी अगदी गोंधळून गेले .एवढ्या सगळ्यांच्या गोंधळात फक्त आम्ही आम्हाला वेगळे वाटत होतो . तसेच कोणी आसपास असण्याची जाणीव हि होत नवती आमचे डोळे एकमेकाना शोधात होते डोळ्यातून जणू बोलतच होतो एकमेकांशी . हे काय होतं अद्याप कळालेलं नाही पण काही तरी नक्कीचं स्वच्छंदि आनंदी हरवल्या सारखी जाणीव होत होती हळू हळू त्या दिवसात त्याच्या सहवासाची सवय झाली ओढ लागली त्याच्याशी तासान तास बोलत बसण्याची आवड निर्माण झाली आमची भेट माझ्या  मामेबहीनीच्या लग्नात झाली म्हणजे तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांच्या लांबच्या नात्यात आहोत पण घरातल्यांनी नाती खूप छान जपल्या मुळे चांगलीच ओळख होती सगळ्यांशी .एवढे वर्ष आम्ही भेटत आलो पण अशी ओढ कधी लागलीच नाही त्याची.............हे काहीस वेगळ होत . कदाचित हेच प्रेम असाव.............त्याच्याशी गप्पा मारणं त्याच्या सहवासात राहाण त्याला मनापासून मदत करण त्याची काळजी करण पण नाही मला त्याची शहानिशा करायची होती कदाचित हे आकर्षण हि असू शकत म्हणून मी बऱ्याच वेळा त्याला टाळलं भेटले नाही पण माझ्या मनातील त्याच्या बद्दलची भावना तशीच होती मग नंतर मी त्याला भेटण्याचं ठरवलं आणि आमच्यातील नात प्रियकर आणि प्रीयसित बद्दल माझ्या आईच नेहमीच म्हणन प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीच एकत्रीकरण म्हणजेच संसार कारण प्रेम हे एकटच जसं अपुरं आहे तसच लग्न हि...............दोन्ही शब्द अडीज अशारांचेच मग हे दोन्ही अडीज शब्द जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ती पूर्ण होतात मग कोणतही नात अपुरं राहण्याची काळजीच नाही ..........नाती अर्धवट ठेवून अमर होण्या खेरीज नाती पूर्ण करा आणि ती जागा ............जीवन पूर्ण होण्यासाठी जशी पंचमहाभूतांची गरज असते तसेच संसार पूर्ण होण्यासाठी प्रेम आणि लग्न याचे एकत्रीकरण म्हणजेच पंचाक्षर पाचअक्षरं याची गरज असते 




चैताली कदम 

Thursday, June 7, 2012

पहिला पावूस.........


आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............

अंगावर येणाऱ्या थंड  शहाऱ्यांची ............... 

श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............

रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................


आठवण................गवतावरील  दवांची................

सकाळच्या ओलसर धुक्यांची..................

दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............

गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................


आठवण................वाट पहणाऱ्या  अतुर मोराची.................

तहानलेल्या चातक पक्षाची..............

भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................


आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............

आठवण.................पहिल्या पावसाची.............



चैताली कदम 

Friday, April 20, 2012

एक दिवस..................

आज घराच्या खिडकीत बसून..........
एकटच हसत काही तरी लिहावस वाटत .गरम गरम चहाचे गोडगोड सुस्कारे घेत .मुक्त पाने डोळे मिठून तल्लीन होत .दीर्घ श्वास घेत.काही तरी अस जे खरच खूप छान असेल.वेड लावणार असेल .जे मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला एका प्रकारच समाधान आनंद देईल आणि लाजून हसायला लावेल .आज खूप छान वाटतं आहे आणि मी हसत लिहायला सुरवात केली .तो आला  दबक्या पावलांनी आणि माझे डोळे हाताने मिठून शांत उभा राहिला .मी त्याला चटकन म्हणाले "आलास तू ..."
आणि तो नेहमी प्रमाणे "शीsssssssssssss ......!"
आज पण ओळखलस .असं म्हणत तो माझ्या जवळच्या खुर्चीत बसला .म्हणाला."तुला आधीच  कळालं होत मी आल्याच .पाहिलं अशील खिडकीतून.म्हणून ओळखलस न...."
"नाही ....."म्हणत मी मान  नाकारार्थक  डोलावली "मग कस ओळखलस .हे कस जमत तुला .."
त्याच्या कडे पाहत म्हणाले ."शब्दान पेक्षा स्पर्श जास्त बोलका असतो राजे आणि आपल्या माणसाची चाहूल कशी हि लागते .तू आत आलास तशीच जाणीव झाली मला तुझी ..."
मला टपली मारत हात जोडत म्हणाला "ओ............वेडा बाई भाषण नको प्लीझ पोटात  कावळे  ओरडतात "मी त्याच्या हातांवर हात जोडत म्हणाले ."बरं ए पण आज तू लवकर कसा.."
"असंच..!" म्हणत तो .........शर्ट ची बटण खोलत बेडरूम कडे वळला .चालता चालता थांबून "मी फ्रेश होवून येतो "अस म्हणाला .
"ठीक आहे .मी जेवण वाढते "
तो आला "लवकर वाढ प्लीज मला खूप भूक लागली आहे " 
इकडे तिकडे पाहू लागला..........
"काय  झालं काही हवं का तुला ?"
"हो......मी माझा फोन बेडरूम मध्ये विसरलो घेऊन येतेस का प्लीज."
"हो आलेच हं ........"
मी आत गेले तर खोलीत काळोख होता .मी  दिवे  लावले .बेडवर काही तरी ठेवलेलं होत.........
मी थोडस हसून पुढे गेले .......गिफ्ट आणि एक चिट्टी होती  ............   
मी चिट्टी उघडली ...............
प्रिय
...............
                               आज मी खूप खुश आहे कारण आजच्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस आज मी तुला पहिल्यांदा पाहिलं होत . आणि तुझ्या वर जीव जडला .आजचा हा दिवस माझ्या दीर्घ काळ किंव्हा चिरंतर लक्षात राहील . म्हणूनच हि  छोटीशी भेट तुला नक्कीच आवडेल .
                                                                                                          तुझा
                                                                                                           ..............

आणि माझ्या डोळ्यात पाणी आले .....त्याला आमची पहिली भेट अजून आठवणीत आहे मी ते गिफ्ट उघडून पाहिले त्यात एक सुंदरशी साडी होती मी ती घेऊन मागे वळणार तोच तो माझ्या मागे उभा  त्याने मला मिठीत  घेतले .आपण आज बाहेर जाऊया तू पटकन तयार हो ...................
आज एक छानसा  मूवी  आणि डिनर करूया ...............
लग्ना नंतर  खूप  दिवसा नंतर  आपण कुठे तरी बाहेर जातोय ..............
चल चल.............................
पटापट तयार हो आता वेळ नको दवडू .मी हि फ्रेश होतो आणि तयारी करतो ................
आज  बार्थ्ररुम  मधून 
अभी न  .................. 
जाओ ..............छोड कर............. 
के दिल............. अभी..............भर नाही ................
अशी शीळ घालत केस पुसत तो बाहेर आला .मी तयारी करून आरशात स्वतःला निहाळतच होते कि तो माझ्या मागे येऊन उभा राहिला अरशातूनच हसून हाताच्या खुणांनी छान दिसतेस अस म्हणाला. आज स्वरींचा मूड भलताच खुश होता आमच्यावर.त्याने मला जवळ घेतले...................
माझ प्रमोशन झाल आहे .................
ओ...........हो .............म्हणजे हा आनंद प्रमोशनचा आहे तर.......म्हणून आज खुश आहे का ..............
नाही ............माझ्या खांद्यावर दोनी हात ठेवत तो हसत म्हणाला दोन्ही पण गोष्टी त्याच दिवशी झाल्या .म्हणजे ................तू माझ्या साठी खूप लक्की  आहेस ग ..................
त्या वेळी पण तू आयुष्यात आलीस आणि सगळ बदल आणि आज याच दिवशी मला प्रमोशन मिळाल ..................दारावरची बेल वाजून पोस्ट्मेम ने एक लिफाफा आत टाकला मी तो अगदी आतुरतेने उघडला ......ती चिट्ठी कवटाळली  डोळ्यातून पाणी वाहू लागले ......तो माझ्या जवळ आला घाबरून मला विचारू लागला काय झाल का रडतेस.......काही नाही ......अग बोल न ...............
माझ हि प्रमोशन झाल आणि  तुझ तर हे दुसरं प्रमोशन .................
म्हणजे ..........काही समजल नाही मला ............
दुसरं प्रमोशन कोणत ..........
बाबांच्या जागेवर बडती मिळाली सर तुम्हाला ................
आणि मी ते रिपोट त्याचा हातात दिले .....................
तो आतुरतेने वाचू लागला ..................
आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहत मला खूप घट्ट मिठी मारत म्हणाला .......
प्रमोशनच्या हार्दिक शुभेच्छा होणाऱ्या आई साहेब ................
देवासमोर गोड ठेऊन आम्ही दोघ निघालो बाहेर ...................
हा क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली............माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्या मला मुलगा झाला त्याच नाव आम्ही अंश ठेवल .आणि काही दिवसांनी त्याच दिवशी त्यावेळी मी जे लिहायला घेतल ते पुस्तक प्रकाशित झाल .......................
तोच हा एक दिवस.........







चैताली कदम

Saturday, March 17, 2012

क्षण.............


रात्रीची धुंदी अजून तशीच आहे. छात वर डोके ठेवून. डोळे मिठून कुशीत ती तशीच पडून आहे.किती लाजते ती. ती विचार करत असेल, मी झोपलीच आहे अस समजून त्याने उठून दिवसाला सुरुवात करावी. मी ही तितकाच ठाम अजूनही तिच्या केसात खेळतोय. काल रात्री अंघोळी नंतरच्या तिच्या भिजलेल्या केसांनचा सुगंध अजूनही तसाच आहे.  आणि बेड वरची चादर संपूर्ण विस्कटलेली. किती नखरे केले रात्र भर तिने. तिच्याकडे पाहता पाहता माझी नजर बेडरूमच्या त्या खिडकीकडे गेली. त्यातून डोकावणारं ते पारिजातकाच झाड...त्या उगवणाऱ्या सूर्यकिरणात छान दिसत होतं आणि...आणि त्या फुलांचा सुगंध जणू लपाछपी खेळत माझ्यापर्यंत पोहचत होता.

तिनेही ठरवलं असावं, आज यानेच उठावं. आता वाटलं जाऊ दे! आपणच हार मानूया. अलगद तिला शेजारच्या उशीवर सरकवून ठेवलं..तिच्या चेहेऱ्यावर एक निरागस हास्याची लाली होती. तिच्याकडे पाहून क्षणभर भ्रमित होवून तिलाच पाहत रहावसं वाटू लागलं. मग स्वतःलाच हसलो आणि बाल्कनीमध्ये आलो. सदऱ्याचे हात वर करून हात लांबवून आळस काढत हात उंचावले. तितक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडून पाहिलं, तर वेटर कॉफी घेऊन आला होता. हे बरं आहे! न मागवता कॉफी बरी येते इथे असा विचार करत, दरवाज्यावरच कॉफी घेत मी त्याला टोलवलं तर तो चक्क हसला माझ्याकडे पाहून. थोडा वेळ मला काही कळेचना सदऱ्याकडे पाहतो, तर बटण वरखाली झाली होती. भुवया ऊंचावून काय म्हणून विचारलं, तर मान डोलवत तो निघून गेला. खरं तर तो माझ्याकडे बघून "गुड मॉर्निंग!" म्हणून हसला. पण मीच गडबडलो. चोराच्या मनात चांदणं या म्हणीचा अर्थ मला आज उमगला. स्वानुभवाने. 

हातात दोन कप घेऊन मागे वळतो, तर ती जागी झाली होती. चादर अंगावर सांभाळत बेडवर बसली होती. अंगावरची चादर तिने अजून गुंडाळून घेतली. गुडघ्यांवर कोपर टेकून तळहातावर स्वतःची हनुवटी ठेऊन माझ्याकडे पाहून छान हसली. पण कदाचित ते हसू खोडकर होतं. "शेवटी तूच उठ्लास ना आधी." असं काहीसं म्हणणार. मी ही हसत मान डोलावली .तिच्या हातात तो कप देत मी म्हणालो, "बस झाल बाबा! पाहतेस काय माझ्या कडे अशी. सध्या कॉफी पी. थंड होईल." कॉफीचा कप ओठांना लावून ती अजूनही माझ्याकडे बघते. ती कदाचित त्याच धुंदीत आहे. अजूनही तिला वाटत आहे की मी तिला जवळ घ्यावं. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. ती मागे टेकून बसली होती. त्याचा आधार घेत सरकत माझ्या खांद्यापर्यंत येऊन पोहोचली होती. खांद्यापर्यंत तिचं डोकं येताच तिने माझ्याकडे बघत एक दीर्घ श्वास घेतला. "मला जवळ घे ना!" असं लाडिक म्हणाली. मी हसत तो कप बाजूच्या टेबलावर ठेवला आणि तिला कुशीत घेतलं त्या मिठीत मला ती खूप समाधानी भासली आज. जर तिला असंच वाटत होतं, तर मग काल एवढे नखरे करायची काय गरज होती? 

"आज आपण फिरायला जाऊया बाहेरच जेवूया आणि थोडी खरेदी ही होईल. मी पटकन तयार होते." असं म्हणत तिने मिठी सोडवली. मी ही डोळ्यानीच "हो" म्हणालो. तिने चार पावलं पुढे जात थांबून मागे वळून, "कोणती साडी घालू?" असं म्हणताच मी चटकन उत्तर दिलं. "जांभळी घाल." आणि ती निघून गेली अंघोळीसाठी. गंमत अशी की लग्नाची खरेदी चालू होती, तिला ती साडी खूप आवडली ही होती, पण आमच्याबरोबर लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या मंडळींच्या पसंती नापसंतीत ती साडी तशीच राहून गेली. तिला ती साडी आवडल्याची जाणीव मला झाली आणि मी त्या साडीचे पैसे चुकते करून ती दुकानदाराला बाजूला काढायला लावली. खरेदी संपल्यावर कोणाचेही लक्ष नसताना ती साडीची पिशवी तिच्या हातात सरकवली होती . 

तिची तयारी होईपर्यंत मी जाऊन बाल्कनी मध्ये उभा राहिलो. बाहेरचा अवर्णनीय निसर्ग पाहून माझे डोळे थक्क झाले. सूर्य किरणांनी सारा निसर्ग लख्खं चमकत होता. मी इतका दंग झालो पाहण्यात की, ती अंघोळ करून केस पुसत कधी माझ्या जवळ येऊन उभी राहिली कळालचं नाही. तिने माझ्या हाताला हात लाऊन म्हंटलं, "जातोस ना अंघोळीला..." मी तिच्याकडे पाहिलं, ती ही त्या कोवळ्या किरणात सुंदर दिसत होती. तिचा चेहरा त्या प्रकाशात पांढरा शुभ्र, नितळ, शांत असा दिसत होता आणि डोळे ही चमकत होते. मी तिच्याकडे पहातच राहिलो. किती वेगळी दिसत होती ती? नाजूक. गोरी पान. मोत्यासारखी. अगदी नजर काढावी अशी. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेऊन क्षणभर तिच्याकडे पाहून तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. लाजून ती थोडी दूर गेली, मी तिच्या कमरेभोवती विळखा घालून तिला जवळ ओढताच, हृदयाची धड धड वाढू लागली. तितक्यात दारावरची बेल वाजली. माझ्याकडून स्वतःला सोडवून तिने दार उघडलं. खाली रिसेप्शनवर फोन होता घरून. रूममधला फोन बंद असल्याकारणाने खाली जावं लागणार होतं. "तू जा बोल त्यांच्याशी. मी अंघोळीला जातो."

मी अंघोळ करून बाहेर आलो. आता मला खूप फ्रेश वाटतं आहे. पण ती नाही रूममध्ये. तिला बघायला म्हणून मी परत बाल्कनीमध्ये गेलो. तितक्यात ती दिसली. त्या पारिजातकाच्या झाडाखाली...


त्या झाडा खाली फुलांचा सडा पडलेला होता आणि ते माझ्या बाल्कनीतून खरंच खूप छान दिसत होतं. ते झाड भेदून सूर्य आणि झाडातला पल्ला गाठून सूर्यकिरणांसह धुक्यांचा हलकासा धूर होऊन त्या सड्या वर पडत होता आणि ती फुलं स्वच्छंदपणे सर्वत्र पसरून आपल्या सुगंधाने वातावरण सजवत होती. ती त्या सड्याजवळच्या बेंचवर बसली होती काहीतरी विचार करत. मी ही तिच्याजवळ गेलो. पण तिचं लक्ष नव्हतं. या गोष्टीचा फायदा उचलून मी ती फुलं वेचली आणि तिच्यावर उधळली. बसलो तिच्या जवळ. ती दचकली आणि मग हसली माझ्याकडे पाहून. माझ्या खांद्यावरती डोकं ठेऊन शांत बसली. मी ही डोळे बंद करून राहिलो. शांत झालं सगळं. आसपास कसलाही आवाज नाही. ते कोवळ उन, फुलांचा सुगंध, हिरवागार निसर्ग, थंड हवा, धुकं हे वातावरण मी कधीच विसरणार नाही आणि हा क्षण ही...

******************************

...अचानक जोरात हवा आली आणि झाडाची सुकलेली पानं माझ्या अंगावर पडली. मी दचकून उठलो, तर एक साठी गाठलेला वृद्ध गृहस्थ माझ्याकडे शून्यात बघत होता. मी घाबरून मागे झालो, तर आसपास असलेले काही जण माझ्याकडेच स्थिरावलेले मी पाहिले .कोणी हसत होतं. कोणी रडत होतं. कोणी स्वतःशीच बडबडत होतं. कोणी इकडे तिकडे पळत होत कोणाला तरी शोधत होतं. 

आसपास कोणी ही नव्हतं ती ही नव्हती. अंगावर शहारा जाणवला. मी एका झाडाखालच्या गोल कठड्यावर बसलो होतो. खूप किलबिलाट होता. पण हा पक्षांचा नाही. असायलममधील वेड्यांचा कर्कश किलबिलाट होता. कोणाच्या दु:खाचा, कोणाच्या सुखाचा, कोणाच्या शोधाचा, कोणाला तरी गमावल्याचा. मी तिला वेड्यासारखा शोधू लागलो. पण ती सापडलीच नाही. कंठ दाटून डोळ्यात पाणी आलं. मी कासावीस होऊन जोरात रडू लागलो. ती नाही माझ्या जवळ. मी तिला वेड्यासारखा शोधतोय. पण ती कुठेच सापडत नाही.कारण ती नाहीच आहे या जगात. मला सोडून खूप दूर गेली आहे. सारं काही आठवलं एका मागोमाग एक. त्या दिवसासारखी आज ती नव्हती माझ्या जवळ. आता माझ्या समोर काहीतरी वेगळंच होतं, ह्याची मला खात्री झाली. इथे कोणाचं कोणाकडे लक्ष नाही. जो तो आपल्या मनस्थितीत स्वतःलाच सावरण्याच्या प्रयत्नात आहे. ती खूप दूर गेली आहे. त्या रात्रीच्या लुकलुकणाऱ्या चांदण्यात. म्हणून वाट पाहतोय मी रात्रीची. जसा चातक पाहतो पावसाची...आतुरतेने....

एकदा का रात्र झाली की...ती येईल हलक्या हलक्या पावलांनी आणि आभाळात लख्खं चमकेल. मला विचारेल, "तू वाट पाहत होतास ना माझी...उशीर तर नाही केला नं?" आणि मी म्हणेन, "नाही गं! आणि झाला असला उशीर तरी चालेल मला...तुझी वाट पहाण्यात पण एक वेगळा आनंद आहे."

**************************

त्या...त्या हनिमूनच्या दिवसांनंतर आम्ही मुंबईतच शिफ्ट झालो आणि आमची रोजनिशी सुरू झाली. माझं आणि तिचं ऑफिसही. अलार्म बंद करून बेड वर कूस बदलत मी विचार करत होतो गेले काही दिवस. आई बाबा गावी गेले आहेत. आपण पण कुठेतरी बाहेर जावूया आणि परत अलार्म वाजला. हा तिच्या फोनचा अलार्म होता. तिला माहित आहे, घड्याळाचा अलार्म वाजला की मी तो बंद करून नुसतीच कूस बदलत लोळत राहतो. मी तिचा फोन अलार्म बंद करण्यासाठी घेतच होतो, तितक्यात ती उठली. "अगं! तू झोप. आज मी सुट्टी घेतली आहे ऑफिसमधून." तरी ती उठून बसली. सवयीने. केस विखुरलेले, लहान मुलांसारखी डोळे चोळत होती. कदाचित कामामुळे झोप अपूर्ण राहते तिची. पण आज जरा थकलेली दिसत होती. डोळे अगदी खोलावलेले. काळवंडलेली आणि थोडी अशक्त. 

"पण मी आज पाहतोय का हिला? की माझं लक्ष नाही तिच्याकडे?" मी स्वतःशीच पुटपुटलो. पण ती मस्त रोजसारखी दिवसाची सुरवात करण्यास निघाली. बेडवरून खाली उतरली. 

"आज तुला काय हवं नाश्त्याला?" तिने हसून विचारलं. मी ही हसत हसत "पोहे!" म्हणालो. पण तिच्या चेहेऱ्यावरचं हसू आजारी वाटलं आज मला. "बरं ठीक आहे. तू अंघोळ करून ये. मी जरा कामं आटपते." आणि ती निघून गेली. मी अंघोळ घेऊन बाहेर आलो. बघतो तर तिने माझा सदरा काढून बेडवर ठेवला होता. मी तयारी करून तिला हाक मारली, पण तिने काही उत्तर दिलं नाही. मी दुर्लक्ष करून बाहेर हॉलमध्ये येवून टीव्ही लावला. गाण्यांचा चॅनेल लावून तिला परत हाक मारली. "झाले का पोहे?" 

पण आतून आवाज नाही. 

"दिव्या! ए दिव्या! मी तुझ्याशी बोलतोय. अगं! झाले का पोहे?" पण तीचा आवाजच नाही. नेहमी हाक मारली की कुड कुड करत का होईना, पण "ओ" देणारी माझी दिव्या आज "ओ" का नाही देत? म्हणून किचनकडे गेलो, तर सगळं अस्ताव्यस्त आणि ती खाली कोसळून पडलेली. मी घाबरून तिच्याजवळ गेलो. तिला कुशीत घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, तरी तिला शुद्ध येईना. मी तिला उचलून बेडवर ठेवलं. डॉक्टरला फोन केला. .आता मी खरंच घाबरलो. तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे आशेने पाहत होतो की, ती कधी उठते.

 ती खरंच वेगळीच दिसत होती. खूप अशक्त, थकलेली, आजारी. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी चेकअप करून काही औषध लिहून दिली आणि संकोच करत काही टेस्ट पण सांगितल्या. पण अजूनही तिला जाग आली नव्हती. मी तिच्या जवळ तसाच बसून राहिलो...बेडवर डोक ठेवून. पाच एक मिनिटांनी माझ्या हातातला हात निसटला असं जाणवून मी उठलो, तर ती बसली होती...अशक्त अवस्थेत. मी तिला हळव्या नजरेने पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या बद्दलची भावना माझ्या डोळ्यातून असहाय्य   रीत्या बाहेर पडली. तिने माझ्या पाठीवर हात फिरवून मिठी सोडवली. माझ्या गालावर हात ठेवून थकव्याने जड झालेल्या पापण्या लुकलुकवून कापऱ्या स्वरात म्हणाली. 

"मी ठीक आहे रे! नको काळजी करूस. चल! तुला पोहे हवेत न? मी बनवते.. आणि आधी शांत हो बघू." तिच्या डोळ्यात माझी काढलेली फसवी समजूत स्पष्ट दिसत होती. तिचा त्रास असहय्य होता. हे तिला आणि मला चांगलंच कळून चुकलं होतं. मी तिला म्हटलं, "आज तू नको, आज मी बनवतो. काय ते आज माझ्या हातचं निमूटपणे खायचं."

ती हसली माझ्याकडे पाहून. तिचं ते आजारी हसू पाहून का होईना, पण मला हायसं वाटलं आणि मी किचनकडे गेलो. तसं मला थोडे पदार्थ बऱ्यापैकी जमायचे. कारण आई बाहेर गेली असताना किमान पोहे आणि चहा कसा बनवायचा हे माहित होतं मला. माझे पोहे बनवून झाले होते. चहासाठी कप घ्यायला वळलो, तर दारात ती बाजूच्या कठड्याला टेकून उभी माझ्याकडे पाहत होती. आणि थोडं चालून पुढे येणार, तोच ती कोसळली. मी तिला सावरलं, तर माझ्या कुशीत माझ्याकडे पाहून हसली. तिला दिलेल्या इंजेक्शन मुळे असेल कदाचित. 

"अगं! अगं! कोणी सांगितलं तुला उठायला बेड वरून?"

"रोज शर्ट पॅंट टाय घालून हँडसम दिसणारा माझा नवरा आज किचनमध्ये कसा दिसतो...'' तिचं वाक्य अर्ध्यातच राहिलं.

आम्ही दोघही हसू लागलो. मी तिला सावरत बेडपर्यंत सोडलं आणि नाश्ता ही आणला. 


"आज माझं कायमचं पोट भरणार वाटतं!..." 

हे ऐकून मी हसता हसता शांत झालो आणि तिला रागावलो.

"अरे वेड्या! काय माहित तू परत कधी बनवशील माझ्यासाठी असं काही. त्यासाठी तर मला असं आजारीच पडावं लागेल ना? कौतुकाने म्हंटल रे!" 

आणि गप्पा मारत पोहे आणि चहा कधी झाला कळलचं नाही. मी तिच्या बाजूला गप्पा मारत बसलो, तर ती गप्पा मारत झोपली. मी तिला उशीवर ठेवणार तितक्यात जागी झाली. "चल आता जाग आलीच तुला, तर तयार हो! डॉक्टरकडे जावून थोड्या टेस्ट करून घेवूया." 

कंटाळा करत टेस्ट करून आम्ही घरी आलो. संध्याकाळी रिपोर्ट घ्यायला गेलो. तिला बाहेरच्या खुर्चीत बसवून मी आत डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी दबक्या आवाजात मला "बसा! बसा!" म्हणत फाईलचं पान उलटलं.

डॉक्टर :- "आता तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. त्या सध्या खूप अशक्त आहेत शरीराने आणि मनाने देखील."
दक्ष :- "हो ठीक आहे डॉक्टर. मी काळजी घेईन तिची." 
डॉक्टर :- "ठीक नाही मिस्टर दक्ष! त्या खूप पोखरल्या गेल्यात. त्यांना जे जे आवडतं ते सगळं करा मिस्टर दक्ष." (ते उठून माझ्या जवळ आले माझ्या खांद्यावर हात ठेवला )
दक्ष :- "..."
डॉक्टर :- "मिस्टर दक्ष त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे."
दक्ष:- "हे....हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर?" (माझा श्वास खूप वाढू लागला हृदयाची धड धड असहाय झाली. डोळे काठोकाठ भरले.)
डॉक्टर :- "हो मिस्टर त्यांना कॅन्सर आहे. कर्क रोग...आणि त्या आधीच खूप नाजूक असल्यामुळे आतून पोखरून गेल्यात. त्यांच्यावर काही उपाय शक्य नाही आणि त्यांचा शरीराला ते पेलवेल याची शक्यता नाही. त्या फक्त ठीक असण्याचा आव आणत आहेत. त्यांना तुमची खूप गरज आहे. जास्तीत जास्त वेळ काढा त्यांच्या सोबत."

तिला कर्करोग असल्याचं कळालं. ती कायमची दुरावणार...मी कसं काढणार आहे माझ आख्खं आयुष्य? कशी भरणार आहे ही अपूर्णतेची पोकळी? असे विचार डोक्यात येवून मी संपूर्ण संपलो होतो. माझ्या डोक्यात विचारांचं खूप मोठ वादळ आलं होतं, जे सगळं उध्वस्त करून जाणार होतं. माझ्या पायाखालची जमीनच निसटली. मला काही सुचेच ना. माझे डोळे आपोआप मिटले. आता मात्र डोळ्यातल्या पाण्याला वाट दाखवायची गरज नव्हती. मी कस सहन करणार होतो हे सगळं? माझ्या उधळलेल्या आयुषाचा पसारा आवरत मनाला सावरत मी शांत झालो. डॉक्टरांनी मला समजावलं. पण ही गोष्ट पचवणं खूप कठीण होतं. त्यात काहीच दिवस राहिले होते तिच्या जवळ. माझ्या सुखाच्या संसाराला आता चांगलंच ग्रहण लागलं होतं. कसा बसा सावरून बाहेर आलो. तिच्याकडे पाहिलं. मला आता राहवतंच नव्हतं. पण तिच्यासमोर हे नको. तिने भुवया उंचावून "काय?" म्हणून विचारलं आणि खोटं हसून मी काहीबाही ओठात येईल ते बोललो. 

"काही नाही गं! असंच जरा अशक्तपणा आहे न तुला? काळजी घ्यायला सांगितली आहे. बरं का मॅडम! मी आता काही दिवस घरीच राहणार आहे. बघूया तरी माझ्या बायकोला काय झालं ते." तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो. "चल घरी जाऊया!" माझ्या जड मनाला सहानुभूतीची फुंकर घालत मी हे कसं म्हटलं? माझं मलाच ठावूक. 

"नको. आपण फिरुयात न जरा मोकळ्या हवेत. समुद्र किनारी जावूया." तिने अशक्त आणि कापऱ्या आवाजात म्हटलं आणि मी तिच्या इच्छापूर्तीसाठी हसून "हो" म्हटलं. 

"आज किती दिवसांनी कारच्या फ्रंट सीटवर बसणार आहे न मी? थोडा वळसे घालूनच जावूया लाँग ड्राईव्ह पण होईल." 


कार मध्ये स्लो सॉँग लावून आम्ही थेट समुद्र किनारी गेलो. तिथे छान गप्पा मारल्या. भेळ खाली. "हा क्षण इथेच थांबू देत. ती अशीच माझ्या जवळ राहू देत." मला मनोमन हेच वाटत होतं. संध्याकाळच्या अंधारात तो भला मोठा विशाल समुद्र खळखळून हसत होता माझ्या दु:खावर असं मला वाटलं काही क्षण. पण ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसलेली. 

"किती छान आहे न ते आभाळ? आख्खं विश्व उराशी घेऊन निर्धास्तपणे त्या विशाल समुद्रात स्वतःला झोकून देत आहे. आणि हा समुद्र...शांत, नितळ चांदणं पांघरून त्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे आकर्षित होवून पाहत आहे. हे रम्य दृष्य किती सुखकारक वाटत आहे न डोळ्यांना! पण त्याची दुसरी बाजू पण आहे. तो एखाद्या व्यक्ती सारखा भासतो मला कधी कधी. माणसाला हा गुणधर्म समुद्राकडूनच मिळाला असावा बहुतेक. बघ न समुद्र सगळ दुख वूराशी बाळगून खळखळून हसतोय...अगदी तुझ्यासारखा..." 


मी चकित होवून तिच्याकडे पाहिलं. माझा हात हातात घेवून ती म्हणाली.

"मला खूप पोखरलं आहे रे या आजारपणाने. खूप कमी दिवस आहेत न माझ्याकडे? .मला त्याची जाणीव आहे..." ती बिलगली मला अगदी उन्मळून. आणि मग अचानकच तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. मी तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागलो. त्या मुसळधार पावसासारखा. "मलाही खूप जगायचं आहे रे तुझ्या बरोबर. तू बनवलेले कांदे-पोहे आयुष्यभर खायचे होते. पण मी हरले या जीवन-मृत्यूच्या लढाईत. मला सोडू नकोस. प्लीज! प्लीज! मला सोडू नकोस. मी...मला...मला इथेच राहायचं आहे. कुठे नाही जायचं." 

घाबरत काहीतरी बडबडत राहिली. मी फक्त ऐकत होतो. मनाला झालेल्या वेदनांनी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना सहन करत होतो. थोडा वेळ ती तशीच शांत बसून रडू लागली. खूप रडली माझ्या मिठीत. नंतर काहीसा विचार करून तिने स्वत:ला सावरलं. 

"मी तुझ्यासमोर असं रडत नाही बसणार. कारण त्यामुळे तू पोखरला जाशील आणि मला ते नको..." ती कापऱ्या आवाजात स्वतःला सावरत म्हणाली. 

पण तिच्या मनाची घालमेल कळत होती. ती गेल्यानंतर माझा काय होईल? या विचारांनी ती अजूनच विखुरली...घाबरली. माझा चेहरा हातात घेवून थरथरत माझ्या डोळ्यात पाहून बोलू लागली. 

"मी आहे न? नको...नको रडूस तू. मी...मी आहे तुझ्या बरोबर आणि मी नसेन, तर त्या चांदण्यात शोध मला. मी नेहमी असेन तुझ्या सोबत आणि हा तुझ्या आयुष्याची नवीन सुरवात कर. मी नाही बघू शकत तुला असं..." 

ती विखुरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत घाबरून मला चाचपू लागली. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. मी तिला शांत करत तिच्या ओठांवर बोट ठेवून नकारार्थक मान डोलवली. माझ्या डोळ्यातलं ते दुख पाहून ती शांत झाली ती माझ्या कुशीत. थोडा वेळ बसून समाधानाने घरी जावूय म्हणाली. मग बाहेर थोडं जेवून आम्ही घरी गेलो. तिने माझ्या आणि तिच्या आई बाबांना फोन करून गप्पा मारल्या आणि औषध घेऊन माझ्या कुशीत झोपी गेली. तिला शांत पाहून मी ही झोपलो आणि उठलो ते थेट दारावरची बेल वाजली. माझे आई बाबा गावावरून परतले होते आणि त्यांच्या मागोमाग तिचे आईवडील पण तिच्या कापऱ्या आवाजाचा विचार करून तिला भेटायला आले होते. 

"कुठे आहे दिव्या? काल रात्री वेड्यासारखी बडबडत होती. आम्हाला रहावेचना म्हणून आलो." 

"नाही...तिची तब्येत ठीक नाही..." मी त्यांना तिच्या जवळ घेवून गेलो 

आईने तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मी तिच्यासमोर बसलो होतो. माझ्याकडे हसत ती स्थिरावली होती ती. कायमची. मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. ती उठलीच नाही. 

"दिव्या? ए दिव्या? उठ ना!...उठ ना! अगं बघ! आई बाबा पण आहेत न बरोबर. तुला काही नाही होणार दिव्या! उठ ना अगं!"

**************************

"सर? सर..."

एक वॉडबॉय माझ्या जवळ आला. "सर चला...जेवायला चला...जेवणाची वेळ झाली. औषध पण घ्यायची आहेत न?"

हो! मी गेले काही दिवस इथेच आहे...असायलममध्ये...

"दिव्या? ए दिव्या? उठ ना!...उठ ना! अगं बघ! आई बाबा पण आहेत न बरोबर. तुला काही नाही होणार दिव्या! उठ ना अगं!" असं म्हणत मी बेशुद्ध झालो, ते इथेच शुद्ध आल्यासारखं भासलं मला. कारण त्या धुंदीत किती दिवस इथे आहे आणि या दिवसात काय झालं मला काही आठवत नाही. आयुषातली पाच वर्ष गायब आहेत माझ्या जीवनातून इतकं माहित आहे मला. त्यात थोडी सुधारणा होत आहे म्हणून इथे असल्याची जाणीवही होत आहे. आणि या आठवणी...त्या नाही पाठ सोडत माझी. अगदी रितं रितं करून जातात. आयुष अपूर्ण होऊन जातं पण आता मी ठीक आहे. काही दिवसातच माझी सुटका होणार आहे इथून...मी माझ्या आयुष्याला नवीन सुरवात करणार आहे.

तसं या फुलांनीच मला शिकवलं आहे की झाड सुकतं...पण...प्रत्येक पानगळी नंतर ते पुन्हा बहरत ही. काही दिवसात ते झाड पुन्हा बहरेल आणि स्वतःच्या सुगंधाने सगळा निसर्ग सजवेल. एक नवीन पालवी फुटायला वेळ लागतो, म्हणून आस सोडून किंवा हरून जमणार नाही. आपणच खंबीर राहिलं पाहिजे. तरच या प्रत्येक ऋतूची मजा कळेल. आयुष्याच्या सुकलेल्या झाडाला नवीन पालवी फुटेल. जर मी खंबीर राहून माझ आयुष्य धीटपणे जगलो, तरच मी तिची आठवण कायम माझ्या मनात जपू शकेन. जशी प्रत्येक रात्र नवीन सकाळ होण्याची, आयुष्यात नवीन किरणं भरून एक नवीन दिशा दाखवण्याची वाट पाहते आणि जशी एक सकाळ शांत शीतल नितळ लखलखीत चांदण्यांनी भरलेल्या, काळ्याभोर आभाळात टिमटिमणाऱ्या, कसली ही चिंता न करता लुकलुकून नवीन प्रकाशाने आभाळाचे सौंदर्य वाढवून, एक नवीन अनुभव देणाऱ्या त्या रात्रीची वाट पाहते... 

पण या सगळ्या म्हणण्या पुरत्या गोष्टी. खरं तर माझं आयुष्य ती नसताना अपूर्णच आहे. कारण तिने एक वेगळी पोकळी निर्माण केली आहे माझ्या मनात. आज मला कळला अपूर्ण शब्दाचा अर्थ. तो कितीही सहज लिहिता बोलता आला...तरी तो खूप मोठी पोकळी निर्माण करून जातो. पूर्ण न होणारी एक अशी पोकळी, जी आपण कधीही भरून काढू शकत नाही ती म्हणजे अपूर्णता. कारण अपूर्ण या गोष्टीला काही पर्यायच नाही आणि नसतो. त्या कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या अपूर्णच राहतात.

मी तिची आठवण जपेन...पण त्या प्रत्येक रात्रीची वाट तितक्याच आतुरतेने पाहीन, जी मला तिच्या सहवासाने पूर्णतेची जाणीव देईल. पण त्याच प्रत्येक रात्री नंतर एक सकाळ होईल. मला परत रिक्त करेल....आणि परत तिच्या आठवणींपासून वंचित होवून मी अपूर्ण होईन. मी आयुष्यभर अपूर्णच राहीन. तिच्याविना. कारण अपुर्णतेला काही पर्याय नाही आणि नसतो...अपूर्ण, अपूर्ण आणि फक्त अपूर्ण...

...पण मी त्या रात्रीच्या चांदण्यात तिच्या सहवासाने पूर्णतेची जाणीव करून माझ्या मनाची समजूत घातली आहे.




चैताली कदम