Friday, July 20, 2012

पावसाची एक वेगळी सर.......


बाहेर मुसळधार पावूस पडत आहे ...............
सारं वातावरण अगदी थंडगार आणि गारटवणारआहे................
ऑफिस मध्ये खूप काम असल्यामुळे आजचा दिवस खूप थकवणारा होता ........
तरीही संध्याकाळी पावूस पडल्या नंतर अगदी तरतरीत ताजे तवाने वाटू लागले ..............
हो बाहेरच्या चिखल आणि टॅ्फीक मुळे चिडचिड होत होती पण पावसाची सुरवात असल्या मुळे चिडचिड आपोआप थांबतही होती .......
पावसाचा आनंद घेत आम्ही मैत्रिणीनी पाणीपुरीचा बेत देखील केला आणि मग गरमा गरम तिखटमीट आणि रसरशीत लिंबू लावलेला मक्याचा आस्वाद घेत स्टेशानच्या दिशेने निघालो...........
ट्रेन प्ल्याटफॉर्मला नुकतीच लागली होती आम्ही धावत पळत ट्रेनमध्ये चढलो आणि खिडकी जवळची जागा पकडली.............
ट्रेनचा प्रवास अगदी मजेत सुरु झाला बाहेरच्या पावसाची आणि मक्याची मज्या घेत गप्पा रंगल्या तेवढ्यात ट्रेन पुढच्या स्टाँपला थांबली..............आणि भराभर सगळे आत शिरले त्या गर्दीत काही शाळेतील मुलं आणि त्यांची आई देखील होती त्यातली एक बाई पुढच्या सीट वरील बाईला सांगून आपल्या मुलाला बसायला जागा करून देत होती जागा झाल्यावर तो मुलगा टूनकण  उडी मारून तिथे बसला...............थोड्याच वेळात जागा  झाली तशी ती बाई देखील बसली पण कुणास ठावूक ती अचानक इकडे तिकडे पाहू लागली आणि एकटीच हसू लागली बडबडू लागली तिच्या मुलाला खेळवू लागली पण तिची पद्धत खूप वेगळीच होती सगळे तिच्याकडे पाहून हसू लागले तीच अस वागण......... तिच्या मुलालाही काळत होत...........
हे सगळे आपल्या आईला हसत आहेत हे पाहून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करु लागला ...आई नको न गं असं करू ...........गप्पं बस ना  गं ............ बघ सगळे हसतात तुला...
अस म्हणून तो त्याच्या आईला समजावू लागला तिच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला...........पण त्याचा काही उपयोग होत नसलेला पाहून त्याचे डोळे काठेकाठ भरले................शेवटी सहन न झाल्या मुळे कसलाही विचार न करता त्याचे अश्रु ओघळू लागले तेंव्हा त्याच्या डोळ्यात बाहेरच्या पावसा पेक्षाही जास्त तीव्रता आणि दुख होत आणि ते बाहेरच्या पावसाला देखील मात करत होता निव्वळ सात आठ वर्षाचा तो चिमुकला काय करू शकणार होता आणखीन .............
हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आले कि ती वेडी होती आणि सगळे शांत झाले................
काही रोजच्या बायकान कडून कळले कि ........तशी ती चांगली असते पण तीला मध्ये मध्ये वेड्याचे झटके येतात ..........त्या मुलाची ती तडफड पाहून खूप वाईट वाटले सगळे जन कसे हसत होते तिला एखाद्याच दुख: समजून न घेता आपल्या कडून दुसऱ्या व्यक्तीला खूप वाईट वागणूक दिली जाते . किंव्हा नकळत आपण कोणाला दुखवत तर नाही ना .अस नाही का वाटत या प्रसंगा वरून . तो मुलगा त्यावेळी काय विचार करत होता..............त्याच्या मनाला किती वेदना झाल्या ............. हे आपणही नाही सांगू शकत पण त्याच्या आईला सगळे हसतात हे त्याला पटलं नाही आणि ते थांबवण्याचा हि त्याने प्रयत्न केला . पण तो एवढासा मुलगा आतून किती तुटला असेल हे कस कळणार त्या हसणाऱ्या व्यक्तींना  . थोड्या वेळाने स्टेशन आल आणि आमच्या सोबत तो मुलगा हि आपल्या आईला घेऊन खाली उतरला आणि समोरच्या बाका वर जावून बसला आम्हीही त्याच्या सोबत थांबलो होतो थोडा वेळ................मग तीला थोड बरं वाटलं तस त्यांना टॅक्सी पर्यंत सोडून आमच्या मार्गी लागलो पण मला काही चैनच पडेना सारखा त्या मुलाचा चेहेरा डोळ्या समोर येत होता आपण आपल्या पालकांना आणि आपले पालक आपल्याला किती पुरत असतो नं ..........
आपण सतत एकमेकाच्या सह असतो आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेत ही ...................
पण कमाल त्या इवल्याश्या मुलाची कि त्याने आपल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला.........
काही दिवसांनी संध्याकाळी आम्हाला  तो परत दिसला त्याची आई पण होती त्याच्या सोबत.... पण ती ठीक होती या वेळी..................
त्याने व तिने गप्पा हि मारल्या आमच्या सोबत आणि उपचार चालू आहेत असे ही समजले..................
अश्या प्रकारे पावसाची एक वेगळी सर......................अनुभवायला मिळाली 




चैताली कदम 

Wednesday, July 18, 2012

पंचाक्षर

दोन व्यक्तीतील एक वेगळी .पण आपलीशी वाटणारी गोष्ट .प्रेम ..........हि भावना त्या व्यक्तीला कधी कळते काही माहित नाही पण .एक मेकांजवळचा एक असा क्षण जो आपल्याला एकमेकानकडे पाहून आपल्यात काही तरी वेगळ असल्याची जाणीव देतो .एकमेकान मध्ये काही नसताना जेंव्हा दोन क्षण एकमेकान कडे पाहत .अस का झालं .हे का होत आहे .हि भावना येन नक्की काय आहे .काही तरी चुकल्या सारखं .लाजल्या सारखं......काही तरी जाणवल्या सारखं.....गुंतल्या सारखं ......त्यावेळची ती एक नजर आपल्यातल्या वेगळ्या नात्याची जाणीव करून देत असते .एवद्या दिवसानच्या सहवासत कधी अशी वेळ आली नाही आणि आज .आज अशी हि वेगळे पणाची भावना का ............मी आज ओळखल कदाचित त्याला.......आज जाणल जवळून .......मी अगदी गोंधळून गेले .एवढ्या सगळ्यांच्या गोंधळात फक्त आम्ही आम्हाला वेगळे वाटत होतो . तसेच कोणी आसपास असण्याची जाणीव हि होत नवती आमचे डोळे एकमेकाना शोधात होते डोळ्यातून जणू बोलतच होतो एकमेकांशी . हे काय होतं अद्याप कळालेलं नाही पण काही तरी नक्कीचं स्वच्छंदि आनंदी हरवल्या सारखी जाणीव होत होती हळू हळू त्या दिवसात त्याच्या सहवासाची सवय झाली ओढ लागली त्याच्याशी तासान तास बोलत बसण्याची आवड निर्माण झाली आमची भेट माझ्या  मामेबहीनीच्या लग्नात झाली म्हणजे तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांच्या लांबच्या नात्यात आहोत पण घरातल्यांनी नाती खूप छान जपल्या मुळे चांगलीच ओळख होती सगळ्यांशी .एवढे वर्ष आम्ही भेटत आलो पण अशी ओढ कधी लागलीच नाही त्याची.............हे काहीस वेगळ होत . कदाचित हेच प्रेम असाव.............त्याच्याशी गप्पा मारणं त्याच्या सहवासात राहाण त्याला मनापासून मदत करण त्याची काळजी करण पण नाही मला त्याची शहानिशा करायची होती कदाचित हे आकर्षण हि असू शकत म्हणून मी बऱ्याच वेळा त्याला टाळलं भेटले नाही पण माझ्या मनातील त्याच्या बद्दलची भावना तशीच होती मग नंतर मी त्याला भेटण्याचं ठरवलं आणि आमच्यातील नात प्रियकर आणि प्रीयसित बद्दल माझ्या आईच नेहमीच म्हणन प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीच एकत्रीकरण म्हणजेच संसार कारण प्रेम हे एकटच जसं अपुरं आहे तसच लग्न हि...............दोन्ही शब्द अडीज अशारांचेच मग हे दोन्ही अडीज शब्द जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ती पूर्ण होतात मग कोणतही नात अपुरं राहण्याची काळजीच नाही ..........नाती अर्धवट ठेवून अमर होण्या खेरीज नाती पूर्ण करा आणि ती जागा ............जीवन पूर्ण होण्यासाठी जशी पंचमहाभूतांची गरज असते तसेच संसार पूर्ण होण्यासाठी प्रेम आणि लग्न याचे एकत्रीकरण म्हणजेच पंचाक्षर पाचअक्षरं याची गरज असते 




चैताली कदम