Monday, November 12, 2012

दर्वळ


हंतरुणावर कोणाला तरी चाचपत ती उठली.बार्थ्रूम मध्ये बादली भरून धो......धो......वाहत होती.अंथरुणातच बसून पाठीवरचा सैल झालेला अंबाडा सोडून तिने परत घट्ट गुंडाळून बांधला.पाण्याचा आवाज ऐकून कपाळाला आट्या आणून तोंडातून "चक्क...."असा आवाज काढत ती बाजूला झोपलेल्या आपल्या मुलांकडे पाहू लागली.डाव्या बाजूला कोपऱ्यात तिची गोंडस निरागस मुलगी आणि उजव्या बाजूला ३मुलगे अशी ४ मुलं आहेत तिला.तरी सुद्धा देखणी,लांब काळ्या भोर केसांची होती. आपल्या मुलांकडे ती पाहत हसली.त्यातला सर्वात लहान मुलगा तिच्या कुशीतून गडबड लोळत तिच्या पाया पर्यंत पोहोचला होता.त्याला त्याच्या जागी निट ठेवत ती उठली.थंडीचे दिवस होते.त्यांच्या अंगावरची सरकलेली चादर तिने नीट केली.आणि सकाळची कामं आटपायला सुरवात केली.साडीच्या निऱ्या खोचत वाहून चालेली बादली सरकवून दुसरी बादली नळाला लावली.कामं आटपून अंघोळी नंतर तयार होऊन चहा घ्यावा म्हणून कंटाळलेल्या अवस्थेत ती किचन जवळ गेली.खोली तशी छोटीच होती.मुलांच्या शिक्षणा खातर मुंबईत येवून राहिलेली हि जनी. आधी कुठल्या तरी पडक्या चाळीत राहत होती.चाळ मोडीत गेल्या मुळे मुलांच्या हट्टा खातर एका ५ मजली इमारतीत दुसऱ्या माळ्यावर भाड्याने राहत आहे.जनीला स्वच्छता फार प्रिय.तिच घर नेहमी स्वच्छ आणि घरात मोगऱ्याचा एक मंद सुहास दर्वळत असे.बरीच वर्ष मुंबईत राहिल्या मुळे तुटक-मुटक इंग्रजी शब्द येत होते.पण भाषेवर काही प्रभुत्व मिळवता आल नाही अजूनही.किती झालं तरी माणूस आपली बोलण्याची पद्धत नाही बदलू शकत.हे तिच्या आणि तिच्या मुलांच्या भाषेतून बोलण्यातून जाणवत असे.पण तिची मुलं या भाषेचा उपयोग जनिशीच करत असत शाळेतील किंव्हा इतर लोकांशी व्यवस्तीत अशी मराठी शुद्ध भाषा वापरात असत.काही वर्षां आधीच तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलांना निराधार आणि पोरखं करून गेला.तेव्हा पासून जनीच मुलांची आई आणि बाबा झाली.राब राब राबून धुनी भाडी करून मुलांना वाढवू लागली.

जनी :- "हुश...!!........आई ......आई गं !......." लई पाठ दुखू लागलीया.कामाला जातानि मेडिकल मधून दवा घीन " 

ती स्वतःशीच पुटपुटली.चहा साठी ठेवलेल्या पाण्यात चहा पावडर टाकून साखरेचा डबा उघडला तर रिकामी.कमरेकडे खोचून ठेवलेली चिल्लर मोजू लागली नेमके पाचच रुपये होते.आता तिला हायसं वाटू लागलं 

"रव्या ?........ए...!...रव्या?  बघ की रं.....साखर संपलिया ! 
आंतूस का जरा दुकानातून?कामाला जायचं हाय!" 

ए ....पोर...!..ऐकतूस का रं ! 
"उठकी बाबा बग कि दिस उजाडला बी!कवा पतुर असं गडबाड लोळणार हाईस "

रवी:- "ए आय..!....नग ना गं तरास दिवूस. झोपुदे कि ग मला........."
रव्या आता जाणार नाही हे तिला कळालं.

तिने अगदी चेहेरा गरीब करून तिच्या मुलीला हाक मारली .
"मुग्धे जा कि ग माय तू तरी......."लई तलप लागलिया बग "ए! मुग्धे............."

मुग्धे :- "अं! ............."ए आय !एक दिस जा की अशीच.मला कटाळा आलाय गं !.....लई झोप आली बग "

आता मात्र जनीने तोंड वाईट केलं.कोणी उठायला तयारचं नवतं.आगीने चहा उकळून अर्धवट झालेलं पाणी तिने कस कस गिळल...........आणि निघाली कामाला.लांब सडक केस अगदी घट्ट गुंडाळून बांधलेले.बोट भर टिकली लावलेली थोडी गोरी मघ्यम बांद्याची काटकिळी.साडी एका बाजूने खोचून पदरही कमरेला खोचला होता.पायाला अपुरी पडणारी दोन ठिकाणी शिवलेली ती चप्पल रेमटवट ती चालत राहिली .मधेच तिचं लक्ष एका मेडिकल कडे गेलं.हातातली ती ५ रुपयांची चिल्लर पाहून ती म्हणाली .
"मयो..!....बर झालं साखर न्हाई आणली ते.दवा कशी घीणार व्हती म्या .!...........पण माझी लेकरं.?..ती तरी बिन साखरेचा चहा कसा पिणार हाईत. ताई कड मागते थोड पैस."
जनी मन मिळवू असल्याने ज्या घरी काम करायची त्यांना ताई म्हणून हाक मारत असे.मेडिकल जवळ जावून ती नुसतीच उभी राहिली खूप गर्दी होती.मेडिकल मधल्या मुलाने विचारलं 
"काय पाहिजे मावशी..........."

जनी:-"अंग फार दुखायल रे लेकरा कोणती तरी गोळी दि कि !.........जरा बर वाटन अशी....."

त्याने आतून एखादी पेनकिलर दिली असेल बहुतेक आणि ती हसून गोळी घेत तिथून निघाली . न थांबता चालत चालत कामात पोहोचली.शिड्या चढून दम टाकत दारावरची बेल वाजवली.एक १२/१३ वर्षाची चिमुकली दार उघडत जनीला आत घेत म्हणाली .

"काय झालं मावशी ? एवढ्या जोरात श्वास का घेताय? दम का लागला तुम्हांला  ?" 

जनी:-"काय नाय गं माय उशीर झाला म्हणून पटापटा शिड्या चढून आलेना.
"पण चिऊ घरी कशी आज तू सुट्टी हाय व्हय !"

चिऊ :- "हो......मावशी आज दसरा आहे न. विसरलात कि काय ? "
"बर थांबा तुम्ही बसा जरा.मी पाणी आणते तुमच्या साठी.फार लांबून येता न तुम्ही ? "

जनी :- (तिच्या कडे २ मिनिट बघून  विचार करू लागली चिऊ पाणी आनते म्हणली आणि मला सकाळची आठवण झाली.माई लेकरं मया साठी साखर आणून देवू नाही शकत.पण हि जिच्या घरी मी मोलकरीण आहे ती माझं दुखं जाणून पाणी आणत होती.

"नगं म्या घेती आपसूकच ........तुला नगं तरास बळे माझ्या मुळ."

कमरेचा पदर काढून तोंड पुसत म्हणाली 


पुढे जाता जाता पुटपुटली," आज दसरा हाय म्हणून आपली पोर अशी आबड धोबड लोळत व्हती आणि काल मुग्धी माझ्या ब्लाउज ला हात शिलाई मारीत व्हती.आज घालायची आसन तिला मई साडी."

डोक्याला हात लावत ती म्हणली "मयो सनसूद बी कळत न्हाई मला . अशी कशी इसरले म्या दसरा "कामाच्या आणि घरातल्या दगदगीत संन बी इसरले म्या !"

बोलता बोलता  किचन कडे वळली "ताई म्या आले बर का !" 
"आज काय बनवायचं जेवणला?"

ताई :"आज आपण पुरण पोळी बनवूया.पण त्या आधी जरा चहा नाश्ता बनवून सगळ्यांना दे आणि स्वतः पण घे कामात वेळ कसा जाईल कळणार नाही."

जनी चहा नाश्ता घेऊन चिऊच्या आजी कडे गेली "आजी ! ओ आजी! चाय आणली बगा . दार उघडतान का आज तुम्ही? " जनी हसऱ्या स्वरात म्हणाली 

"जनी !बाळा थांब गं! आलेच मी"आजीनि बेडरूमचा दरवाजा उघडला जनी ने ते ताट टेबलावर ठेवलं आणि निघाली 

आजी :-(आजी तिच्या कडे पाहू लागल्या )"जनी तबेत ठीक नाही का गं तुझी "  
जनी :-"न्हाही आजी म्या ठीक हाय "
आजी :- "नाही ग तोंड अगदी उतरलं आहे.बस बघू माझ्या जवळ "
जनी :- "नाही आजी काम पडल्याती. म्या जाते (नजर चोरत ती म्हणली तिला ठाऊक होतं आजी काळजाला हात घालतील आणि तसाच झालं )
जनी :- "न्हाई आजी मई पाठ अगदी भरून आल्यागत झालय बगा पण....पण म्या दवा खाल्ली हाय . तस आता जरा बर वाटू लागलं "
आजी :- "अग एवढी ३/४ कामं कशाला करतेस लागोपाठ शरीराला थोडा आराम मिळाला पाहिजे "
जनी :- "व्हय आजी आता कोण हाय करायला.संध मालच करायला लागतं.घरी बी आणि बाहेर बी कुठं कुठं लक्ष द्यायचं.तशी माई पोरगी करते घरचं काम पण तिला बी शाळेत जायचं असतना तरी बी ती जमन तीवढ काम करती "
आजी :-"किती मुलं तुला "
जनी :- "चार हाईत पण चारी बी चार परीची हाईत बगा....एक मुलगी तीन मुलगे 
"ठिवून गेलाय त्यो मया साठी माग.मला बी घेऊन गेला असता तर बर झालं असतं "
आजी :- "अगं ..!अस का बोलतेस "
जनी :- "व्हय आजी म्या खरच बोलती पार थकून गेलीया पोरात "जाउद्या म्या जाते मला काम करायची हाईत येते म्या . तुम्ही खावून घ्या पटा पटा  "
आजी :-"बर ठीक आहे पण काळजी घे "
जनी :-"व्हय! व्हय!...." म्हणत ती आजीच्या खोलीतून बाहेर पडली 
चहा नाश्ता सगळ्यांना देऊन उरले-सूरलेला स्वतः केला.आता जरा पोटाला बऱ्या पैकी आधार झाला होता.मग तिने खोचून ठेवलेली ती गोळी घेतली .
जनी ने जेवणाची सगळी कामं आटपली पण पुरणपोळी करताना तिचे डोळे भरून आले.तिच्या नवऱ्याला पुरणपोळ्या खूप आवडत.त्याच्या आठवणीने तीच मन जरा मावळालं होत. पण आपलं दुख कोणाला कळू नये म्हणून ती वरवर हसतचं होती.ते आटपून आता कपडे भांडी करण्यासाठी निघाली ते आवरे पर्यंत दुपारचे २ वाजले होते.सकाळच्या ९ चा नाश्ता होऊन बराच वेळ झाला होता. आता मात्र पोटात कावरी भरून जनी भुकेने आतुर झाली.कामं आटपली होती.पदराने हात पुसत
 "ताई !......ताई !.....निघाले म्या" 
"थांब जरा जनी...."डब्याच झाकण लावत त्या तिच्या जवळ आल्या "हे.. घे...घेवून जा तुझ्या मुलां साठी "आणि हे घे (हातात ५०० रुपयांची नोट टेकवत म्हणाल्या ) बराच वेळ झाला नं जेवणा मुळे "
जनी ने हसत तो डबा पिशवीत टाकला आणि "चला निघते "म्हणून निघाली .आज ती थेट घरी जाणार होती . बाकीच्या कामावरून सुट्टी मिळाली होती.थकलेल्या अवस्थेत ती इकडे तिकडे पाहत चालत राहिली ते घर येई पर्यंत.धापा टाकत दोन माळे चढून दार उघडून आत आली तर घरात पसारा पुढ्यात मुलगा गडबड लोळत अजून हंतरुणात पडला होता.मुलगी किचन जवळ काही तरी खटपट करत होती.आणि लहान दोघं दंगा करून.त्या झोपलेल्या भावाला अजून का नाही उठत म्हणून त्रास देत होती.
"रव्या! ए रव्या !" अजून लोळतोस व्हय " उठ की रं आता. बग की साडे तीन झाले " हातातली पिशवी पुढ्यात आलेल्या मुलांच्या हातात दिली "घी खा थोडं थोडं ताईनं पुरणपोळ्या दिल्या हाईत "लहान मुलाने हसत हातातली पिशवी उघडत एक घास तोडला.

जनी :-"माय पाणी दितीस का गं "
आपल्या मुलीला ती म्हणत भिंतीला टेकून बसली 

मुग्धा :-"ए आय घी कि काम करायले म्या "

जनी :-(रागाने)"लई चालावं लागतं.आल्यावर हातात पाण्याचा गलास पण दिऊ शकत नाही का दिस भराचा तुम्ही.फकस्त खायचं तीवढ कसं जमतंय तुम्हासनी "

मोठा मुलगा तिची बडबड ऐकून बिछान्यातून उठून बार्थरूम कडे वळला.पण पसारा तसाच ती चिडलेली पण काही न बोलता निमूट पणे हंतरुणाची घडी घालत स्वतःशीच पुटपुटली.तितक्यात लहान मुलगा येवून तिला बिलगला
"ए आय आपल्याला बी कर ना गं पुरणपोळी लई खावीशी वाटायली"
जनी:-"व्हय रं लेकरा करती म्या.तस पण आज दसरा हाय ना मग करू कि 
"रव्या ! रव्या ! जा जरा भाऊला घिऊन बाजारात आणि गूळ घिऊन ये "

रवी :-" म्या न्हाही जाणार.आताच उठलोय लगीच कुठं जाऊ "आणि लहान भावाला टपली मारत "पुरणपोळी खायची म्हनतुय ढवाळं लागल्यात का?"अस काहीस पुटपुटला 

जनी:-"अय! काय मारतूस त्याला.राहुदी कि एवढ्या आवडीन मागायल पोर "

रवी:-"मग पाठव कि त्याया  बा ला "

जनी :- (हात उगारून त्याच्या कड दोन पावल टाकत म्हणाली ) "कोणाचा बा काढतुस रं तुआ न्हाई का त्यो "

रवी :-(जनीचा हात धरत तिला हिसकावत तो म्हणाला) "अय म्हतरे का म्हुण माराया लागलीस सामान अंतू म्हणतोय नं "
जनी खाली कोसळली आणि रडू लागली तिची मुलं तिच्या भोवती गोळा झाली कोणी डोळे पुसत होतं कोणी केसांवरून हात फिरवत होतं.कोणी बिलगून नुकतच रडत होतं .

जनी :- "आपल्या बा वाणीच निघालास मुडद्या !"पण एवडं खर त्यो असता तर असं दारोदरी भटकाया नसतं लागलं मला "
(त्याच्या कडे हात दाखवत )ह्या भाडखाऊ च्या अश्या शिव्या आणि मार नसता खावा लागला मला "त्यो बी मारायचा.पण जवळ बी घ्यायचा .लई मार खालाय म्या त्याचा.भाऊच्या वेळी गरवार असतानी मला खूप मारलं व्हत त्यांन.मला चांगलच आठवतय.घरात लय भांडण झाल व्हतं तव्हा.तुया बा लई दारू पिऊन अला व्हता.कुणाशी तरी झगडे बी जाले व्हतं . इवढा उशीर का केलात म्हणले तर रागारागात दोन थोबाडीत मारून लात मारून खाली पाडलं आणि डाव्या बाजूला पोटात घपदिशी चाकू घुसवला .म्या खूप कळवले काही सुचेच ना हाताला रगत आणि डोळ्याला पाणी.संध अंग सुन्न झालं व्हतं आणि म्या बेसुध झाले डोळे उघडले ते दवाखान्यातचं.मला झाग आली तर हा माया वाजूला बसलेला जणू ह्याला माई लई काळजी.त्याच्या डोळ्यात माझ्या साठीच पिरेम मला अगदी येगळी असल्याची जाणीव करून द्यायचं.पण अस व्हतं तर मारलं कशाला.माझं नशीब म्हणून तो चाकू टीचभर आत गेला.माझ्या भाऊला काही नाही झालं. मार बी तेवडाचं आणि पिरेम बी  तेवडाचं
"भिंतीला टेकून गुढग्यावर डोक टेकत ती म्हणली.आणि मुलं एखादी गोष्ट सांगतात तशी आ करून ऐकत होती.

रव्या :-(भिंतीला टेकून उभा होता )"झालं का कीर्तन गाऊन.अय बये! दि कि पैक उगा टाइमं खोटी नग करू.दि आता लवकर "

जनी :-(रागारागात कंबरेला खोचलेले पैसे काढत फेकत म्हणाली ) "धर ऐ मुडद्या घी घी "

रवी :-(हसत)"मयो ! पगार झाला वाटतं म्हतारीचा पैक वाली झाली "दि कि ग मला बी थोड पैक
तो निर्लजा सारखा हसत म्हणाला जणू काही झालंच नाही.आपल्या आईला इतका त्रास झाला ती रडली याचा त्याच्या चेहेरऱ्यावर काहीही परिणाम दिसत नवता.

जनी :-"हाय का लाज मुडद्या.भाजून खाल्ली का लाज तव्यावर"तरी बी हसतंय कस बेन "
रागाने बाजुची चप्पल फेकून मारत ती म्हणाली "सांग त्याला डाळ आणि गुळ आणाया" 

तो हसतं टिंगल करत चपल्ल घालत निघून गेला.मग ती त्या मुलांना जवळ घेत डोळे पुसत गप्प करू लागली "जा काही तरी आन खायला भूक लागली आसन पोरांना.काई खाल्ल व्हतं का ?"

मुग्धा :- "न्हाई आय कुनी बी काय बी खाल्लं न्हाई.हे दोघ आताच थोड्या येळा आधी उठलेत. आंगोळी झाली पण खानंपाणी काय बी नाही.आज सुट्टी हाय ना "आणि त्यो गड बड लोळत पडला व्हता. कवा पासून हाका मारायले म्या.पण जरा सुधिक हल्ला न्हाई "

तिच्या गालावर हात फिरवून म्हणली "जावूदी तू जाय काही तरी आन जेवायला.मला बी भूक लागली "आता मुग्धाला हि कळाल आपल्या आईला भूक लागली.पण ती एवढी शी पोर तिला काय आणि कितपत येत असेल जेवण.कसंबसं तिने आपल्याला जमणारा डाळ भात आणि बटाट्याची भाजी तेवढी केली होती. तिघांनी हि जेवून घेतलं आणि एका जुन्या कामात बक्षीस म्हणून मिळाली खोपट्यात ठेवलेली ती टीव्ही लावली आणि जे दिसेल ते मुकाट पने पाहू लागले.तेवढ्यात खालून हाक ऐकू आली भाऊ !ऐ भाऊ! आणि भाऊ खिडकी पाशी येवून उभा राहिला खाली पाहिलं तर रवी सामान घेऊन उभा होता भाऊ वरून खिडकीतूनच ओरडला "काय दादा" 
रवी :-"खाली ई लवकर माया हातातलं समान घिवून जाय."

भाऊ :-"वर ई दादा आई बोलवती"

रवी :-"न्हाई तुचं ई मी भाईर जातुय "

तितक्यात जनी भाऊच्या मागे खिडकीत आली.
जनी :- "आरं रेड्या वरी ई कि ! "कवाचा आरडायलं लेकरु.तरी बी समजत न्हाई का?"

                 आता रवी चिडून धावत वर आला पण तो खूप चिडलेला असल्याने घरात येताच जनी कडे पाहत हातातलं तिला शिवी घातली समान आणि पैसे फेकले सामानाची पिशवी भिंतीला जावून आदळली सर्व डाळ आणि गुळ घर भर पसरलं.आता मात्र जनी खूप चिडली होती.ती धावत त्याच्या कडे गेली.त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला रागाने गदागदा हलवत विचारू लागली
"इवडा राग इयाला रेड्या तुला.लई मोठा झालास व्हय रं ! माज आलाय तुला.पैक गेलना पाण्यात आता कुठून आणू म्या.कस करून घालू मया पोरांना " आणि तिने रागात त्याच्या गालावर एक चापट ओढली.त्या मुळे तो आणखी चिडला आणि कॉलर वरचा तिचा हात झटकत तिला हिसकावलं आणि शिव्या देत तिच्या पाठीत जोरात फटका मारला  "मला मारतीस"  
जनी ला काही सुचेच ना.आपल्या मुलाने आपल्यावर हात उघरला.या झटक्याने ती कळवळत रडत तिथेच पडून राहिली.तो तावातावाने तिथून निघून गेला.आता सगळं शांत झालं.दमल्या मुळे डोळ्यातून ओघळणार पाणी सुखायच्या आतंच ती झोपून गेली होती.तोड्या वेळाने हळू हळू डोळे लुकलुकत ती उठली घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे पाच संव्हा पाच झाले होते.घर अगदी स्वच्छ लखलखीत चमकत होतं.मुलं बाहेर खेळायला गेली होती.शांतता पसरलेली तिची मुलगी मुग्धा तिच्या जवळ आली तिला माहित होतं आईच्या डोळ्यालं पाणी काठावरच आहे.मी काही बोलले तर आई खूप रडेल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली "जा तोंड धुवून घी म्या चाय दिती तुला " 

                  थोडं झोपल्यामुळे आता जनीला तसं बंर वाटत होतं भिंतीचा आधार घेत ती उठली तोंड हातपाय धुवून बाहेर येवून बसली."चहा हाय का ?"
मुग्धा :- "हाय आय" 
जनी :-"साखर आणायची आसन ना?"
मुग्धा :-न्हाई म्या माझ्या साठवलेल्या पैशान आणली कि साकार सकाळी "
चहा पिता पिताच तीने आशेने विचारलं "डाळ आन गुळ कुठंय गं " त्यावर खांद्यावर हात ठेवत मुग्धा म्हणाली "मी पसारा आवरून ठीवलाय डाळ बी साफ करून ठिवली आणि गुळ बी तसाच हाय फकस्त दोन तुकडं झाल्यात" जनीला हायसं वाटलं आणि ती मनापासून हसली चहा झाल्यावर कप उचलत ती म्हणली "चला बाई पुरणपोळ्या करायच्या हाईत डाळ शिजवायची हाय.तुया बा ला लई आवडायच्या पुरणपोळ्या.मला परतेक सनाला कराया लावायचा अन आवडीन खायचा .पुरणपोळ्या म्हनलं ना कि त्याई आठवण व्हती मला.सकाळी बी आली त्याई आठवण आन डोळ भरलं पर कामात कस बस रडू आटपलं.कुणाला सांगू म्या दुख.ह्यो लेक तर हयो असा.जावुदि उगा कशाला तरस करून घिऊ.आता कामाला लागते." तिने सगळं विसरून खुप आवडीने पुरणपोळ्या बनवायला सुरवात केली.पुरणपोळी होता होता मुलं हि घरी परतली होती. 
"मला दि ना ग पुरणपोळी "म्हणत तिच्या भोवती घोळका घालून बसली. 
"थांबा पोरानो जरा.आधी हात पाय धुवून घ्या बगु .तोवर म्या देवाला निवद दावती अन मग खायला बसा सगळे "



सगळं आवरून तिने घरातला केर-कचरा काढून हात पाय धुतले. देवाला नैवद्याच ताट पुढ्यात ठेऊन साकडं घालू लागली "देवा माझ्या घरात सुख शांती नांदू दे.का अस दारोदरी भटक्या लावतूस." 
तीतक्यात शेजारच्या मुली नट्टा-पट्टा करून दसऱ्याच सोन द्यायला आल्या 
"काकू!काकू!"सोन घ्या " करत तिच्या हातात अपट्याची पान कोंबत तिच्या पाया पडू लागल्या 
"बस ! बस ! नगा मया पाया पडू .राहुदि खूप शिका आणि मोठ्या व्हा "वाकत असलेल्या प्रत्येक पोरीला ती म्हणत होती.मुलांना हा सन खूप आवत असावा.या आपट्याच्या पानांचा सोनं म्हणून वाटप म्हणजे गंमत वाटत असावी.हातात आपट्याची पानं टेकवत पायाला हात लावत हा गंमतीशीर प्रोग्राम चालत असे सगळ्यांचे कैतुकाचे बोल ऐकून मुलं खुश होत असत आणि मुली हि "छान दिसतेस"असं म्हणतातच मुलीच्या गालावारीची कळी खुलत असे.अशा रीतीने हि मुलं मोठ्यांचा आशीर्वाद आणि मज्या करत असत. 

"मुग्धा ! तू का नाही तयार झालीस अजून"चाल लवकर तयार हो " तिच्या मैत्रिणी तिला आग्रह करू लागल्या 
"बर ! तुम्ही व्हा पुढे मी येते तयारी करून " मुग्धा ने आधीच आईची पेटीतील साडी काढून ब्लाउजला टाके मारून आपल्या मापाचा करून ठेवला होता.सगळी तयारी करून ठेवली होती पण भांडणा मुले तशीच राहून गेली. 

जनी:-"मुग्धे ! जा कि ग ! म्हणलीस न त्यांना मग व्हय कि तयर आणि जाय त्यांच्या बरोबर " काढ पेटी म्या काढून दिती साडी तुला " 

मुग्धा :-"नग आई म्या काढून ठिवली हाय पर मला न्हाई जायचं आता.राहुदी "

जनी :-(तिला पोटाशी कवटाळून म्हणाली ) "जा बाळे म्या निसवती साडी तुला तू नग मन नाराज करूस जाय बिगी बिगी " 

आणि मुग्धा तिथून निघून गेली.फ्रेश होऊन "आय मला हि साडी निसव " म्हणत आतल्या खोलीतली साडी आणून तिने जनीच्या हातात दिली.आणि काही तरी आणायला म्हणून आत गेली .हातातली ती साडी पाहून क्षणभर ती स्थिरावली आणि डोळे भरून आले.पण तिने ते पाणी डोळ्यातच सुखु दिलं . तितक्यात मुग्धा आली

"आई ! आई ! नेसवतेस ना साडी " 
"हो गं ! निसवती बाय "
तिला साडी नेसवून तिचे केस विंचरून दिले.मुग्धा नटूनथटून आईला दाखवायला आली 
आई!...बघ....
"मयो छान दिसायलीस गं !"असं म्हणत तिच्या कानामागे जनीने काळ तिठ लावलं 
"तुया बा असताना आता तर डोळ भरून पाहिलं असतं त्यानं.कशी गोजिरवाणी दिसायली माझी मुग्धा म्हणत डोळ पाणावल असतं आता पतूर त्याच "आणि जनीचे डोळे पाणावले 

तिच्या मैत्रिणीनी तिला हाक मारली "मुग्धा ! झाली का तयारी तुझी.बाहेर जायचं आहे चलं " 
आय ! म्या जाती ग! मला पैस दि ना.आम्ही फोटू काढाया जाणार हाईत"जनी कमरेला खोचलेले पैसे चाचपत म्हणाली "मगाशी राव्यान रागान फेकलेल पैस कुठ ठीवलास"
"हा त्या गलासा खालीच ठीवलत बग " जनीने फळी वरचं ग्लास उचलून पाहिलं तर ५५ रुपये होते त्यातले ५०रुपये काढत तिच्या हातावर टेकवले
 "लवकर घरी ई बाई.इथ तिथ उंडगु नगं " म्हणत ५ रुपये तिने कमरे जवळ खोचले.
मुग्धा मान डोलवत हसत साडी चाचपत तिथून निघून गेली.
आता घरी कोणी नवत सारं काही शांत चाळीतीली मुलं जिकडे तिकडे आपट्याची पान वाटायला फरार झाली होती.आता मात्र जनी शांत झाली.घरात कोणीही नवतं बाजूच्या घरातल्या गाण्याचा मंद आवाज फक्त ती आणि देवा पुढे लावलेल्या त्या उदबत्तीचा दर्वळ अगदी कोना कोनात पसरला होता जनी त्या भिंतीला टेकून शांत बसली होती.तिच्या नवऱ्याच्या फोटो कडे एकटक पाहत राहिली . आज तिला बहुतेक त्याची जास्तच आठवण येत होती.
*******************************
"जने म्या जातुय गं!जरा उशिरानच ईन.काम हाय फोन बिन नग करूस "
"आव पण आता रातीचं १० वाजल्याती.आता कंच काम हाय "
"अग नग पाटी कटकट लाउस चल म्या निगालो "म्हणत तिचा नवरा घराच्या बाहेर पडला.मुलांच आणि स्वतःच जेवण आटपून साफसफाई करून दमल्या मुळे हंतरुणावर पडताच तिला छान झोप लागली.सकाळी सकाळी धाड धाड कोणी तरी दरवाजा वाजवू लागलं तशी ती तडफडत जागी झाली मुलं हि जागी झाली आणि चिडून जनी म्हणाली "आला असन दारू पिऊन "उठून तिने दार उघडलं चाळीत बाहेच्या टोकावर दुकाना जवळ राहणारी दोन मुलं घाबरून धापा टाकत उभी होती.
जनी घाबरली काय झालं त्यावर ती मुलं फक्त "दुकाना जवळ मामा !मामा ! मामला" म्हणत अडकली जनीला वाटलं भांडण झालं तिच्या नवऱ्याच कोणाबरोबर ती मोकाट धावत सुटली थेट दुकाना जवळ तिच्या पाठी तिची मुलं पण.कसलीही हि चिंता न करत काही लागेल याच भानच नाही राहिलं तिला. दुकाना जवळ खूप गर्दी होती.ती बाजूला सारत पाहते तर तिचा नवरा चाकूचे सपा साप वर होऊन रक्त बंबाळ होऊन पडलेला.त्याच्या जवळ जावून त्याच डोक मांडीवर घेत ती "ओ !ओ! काय झालं तुम्हांला काय झालं " डॉक्टरला बोलवणा कुणी बोलावना डॉक्टरला "म्हणत ती घाबरत ओक्साबोक्शी रडू लागली.गर्दीत उभा असलेल्या एका इसमाने त्याचा हात हातात घेतला.त्याची नाडी तपासू लागला.त्याच्या हृदयावर हात ठेवत कान ठेवत त्याचे ठोके ऐकू लागला.नंतर तिच्या कडे पाहत नकाराआर्थक मान डोलवत तो उठला.ती आणखी घाबरली "ओ !ओ !उठाना उठाना " रडणाऱ्या आपल्या मुलांकडे पाहत "रव्या !ए रव्या! बग कि उठाव कि तुया बा ला.मुग्धे ! ए मुग्धे !मार कि हाक तुया बा ला" म्हणत ति भानावर आली तर मगाशी भिंतीला टेकून बसलेली ती तशीच होती.तिच्या डोळ्यातून अपोआप पाणी ओघळू लागले.
तुया या दोस्ती खातत्यानं माय संध आयुष्याच बदलून टाकलं.मित्र मित्र करून ज्यायला जवळ किलस त्यानंच तुया पाठीत चाकू घुसावंला.म्या किती सांगत व्हते.नग जाऊ बाहीर हि अशी भाई गिरीची काम नग.जीव घाबरून मला कस कस वाटत व्हतं.पर तुया पुढ काय म्हणलं तर.....तर.....तू मला परत भांडशील आन मारशील म्हणून काय बी बोले नाय.पण इवढ काय झालं व्हतं ते तुया मित्रांनी मारकरी करून तुला मराया लावलं .फकस्त इवढ कळलं मारामारीत तुझ हे असं झालं पण न्हाई तुया वरच्या जळनुकीवरून अन तुझ्या हातात सतत नांदणाऱ्या लकशिमीन तुया जीव घेतला.त्यादिवशी तुया बद्दल सांगत आलेल्या मुलां मूळ तुला बगाया धावत आले तर तू चाकूचं सपासप वार व्हवून रक्त बंबाळ जीमिनीवर आस्था व्यस्थ पडलेला.अन माझ्या अंगातला जीवाचं निघून गेला.तुला असं बगून म्या घाबरले. किती वूठावलं तुला.तरीबी उठ्नास.तुला कशी काळजी वाटली न्हाई आमची .हि अशी ह्याची त्याची रूम विकून ,दलाली मिळवून,भाईगिरी करून ,ऊरा पोटाशी चाकू सुऱ्या मिरवून काय भलं व्हणार व्हतं तूअ.शेवटी केला ना घात तुया मित्रांनी तुआ. हातात पैसा व्हता तर तुये मित्र तुया बरोबर फिरायचे पण मनात डाग ठीऊन.तुला ते कदी बी कळलं न्हाई.तुला दारू पाजून मैत्री खात्यात उशिरा पतुर थांबून केला घात तुआ.अलगत तुआ काटा काढला आणि टाकून दिलं तुला त्या दुकाना पाशी.किती तडपडला आशीन.किती तरास झाला आसन तुला.सकाळी तू मेला समजल्यावर परत दुकाना जवळ येऊन काय म्हाहीत न्हाई असा आव आणत माझी माज्या बघत उभ अस्तीन त्या लोकांच्या गर्दीतच.तुला मेलेला बगितल असन अन खुश झाली  असतीन संधी .पण त्या गर्दीतला नक्की कोणता चेहेरा खोटा व्हता कसं कळणार व्हतं मला.तुया मरणा नंतर धुमाकुळच घातला या लोकांनी.पेपरात काय छापलं तुया खुना बद्दल .मोठमोठ्या सबा काय भरावल्या.इतकाच काय खोट्या आधारच नाटक बी केलं.अन दुसऱ्या दिवशी हजर झाले कर्जाचा मोर्चा घिऊन.अन ते बी गोड बोलून.पर तुई ती हिशेबाची वही माया कमी आली.मला ठाव व्हतं.तुआ जो बी काय यवहार हाय त्यो संधा ह्यात हाय मग काय खोल्ली वई अन धरलं एकेकाला काट्यावर.कुणाच बी कर्ज नवतं .अन व्हत ते बी तू फिडलं व्हतस त्यायंच्या सह्या बी घीतल्या व्हत्यात.म्हणून कोणाची भिशाद झाली न्हाई वर तोंड करून बोलायची.तू लिहून ठीवल्या परमाने दोन घर आन काही पैक ब्यांकित मिळालं.पर तू असतास तर यायला आणखी शोभा आली असती.पण तू गेलास अन सगळ्याचा इस्कोट झाला.
"का सोडून गेलास मला एकटीला.किती एकटं वाटू लागलं मला ठावं हाय तुला.लोक कश्या कश्या नजरेने बगतात मया कड.तू व्हतास तर मला नजर वर करून बी पाहिलं नाही.लई घान वाटते त्यांच्या नजरांची मला.आज दसरा तुया आवडीचा सन पण तू न्हाईस दर दसऱ्याला पुरण पोळ्या करून घालाया लावायचास.आपली पोर बी कशी वागतात माया बरोबर कोणीच नाही माय दुक ऐकाया कुणी बी नाय.फकस्त तुच व्हतास पण तू बी मला असं मधीच सोडून गेलास.मला मारायचास पण जवळ बी करायचास.मला काय हव नको संध बगायचास.आता मला काय झालं तर कुणाला सांगू म्या "कुणीच नाही कुणी म्हणजे कुणीच नाही मया सठी फकस्त दर्वळते ती तुझी आठवण ह्या सुगंधा वानी " आणि तोंडावर हात घेऊन रडू लागली .



                                                
चैताली कदम                

Friday, October 12, 2012

अपूर्णतेची उमग

गेले काही दिवस माझं एका विषयावर लिखाण चालू आहे .पण या साठी खूप कष्ट करावे लागले.कोणा न कोणा व्यक्तीशी संवाद साधून त्याच्या मनातून अपूर्णतेच्या भावना काढणं हे खूप कठीण आहे .कारण कोणीही त्यांची भावना व्यवस्तीत अशी स्पष्ट केली नाही .किंबहुना करू शकत नाही .कारण सगळ्याच गोष्टी अपूर्ण असतात आणि आपण त्या पुर्ण असल्याचा फक्त आव आणत असतो .पूर्णतेची जाणीव करून आपल्या मनाची समजूत घालत असतो .खूप अडथळे आले हा विषय हाताळताना आणि हे हि कळलं कि व्यक्तीच्या मनात अपूर्णतेची एक तुच्छ बाजू सुधा असते .आई न होण किंव्हा शारीरिक सुखांन पासून वंचित असणं सुधा व्यक्तीला अपूर्ण करू शकतं हे आज कळलं .पण या सगळ्या संवादातून ,भाष्यातून इच्छापूर्ती हे अपूर्णतेच सर्वात मोठं कारण आहे अस मला आढळलं .एकदाचं माझ लिखाण पूर्ण झालं .पण मला एक कोड उमगलं आहे .जर आपल्या लिखाणाला मोज मापं म्हणजेच लिमीटेशन असतात मग सगळे लेखक जे लिहितात ते पूर्ण कसं म्हणता येईल .प्रत्येक लिखाण पूर्ण असून त्यातल्या त्यात अपूर्णच राहीलं नाही का ?जशी विचारांना खूप मोठी वाव असते तशीच लिखाणाला हि असते .सगळ्याच पूर्ण गोष्टी पूर्ण असतात हा आपला निवळ गैर समज असतों.कारण नाण्याच्या जश्या दोन बाजू तश्याच अपूर्णतेच्या सुधा .प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून गोष्ट पूर्ण कि अपूर्ण हे ठरते .
"मग नक्की अपूर्णता म्हणजे काय आहे ?"
"पूर्ण न होणारी एक अशी पोकळी जी आपण कधी हि भरून काढू शकत नाही ."
खर तर लेखक जितक्या वेळा आपलंच लिखाण वाचतो तेंव्हा तेंव्हा त्यात बदल करतो किंव्हा त्याला बदल करावासा वाटतो मग वाचणाऱ्यांच काय होत असेल .माझ लिखाण जरी मी पूर्ण झालं अस मी म्हणत असले तरी हे लिखाण जितके लोक वाचतील तितकं हे अपूर्ण होत जाईल अस मला वाटतं .आणि ते कोणा न कोणाच्या दृष्टीकोनातून अपूर्ण नसेल हे कशा वरून. लेखकाला वय नसतं हे जितकं खरं.तितकच त्याला अनुभव,जाणीव ,कल्पनाशक्ती आणि सुख दुःखा ची देवाणघेवाण असते .तरीही अपूर्णता टाळता येत नाही .हे तितकच खरं आहे .



चैताली कदम 

Friday, July 20, 2012

पावसाची एक वेगळी सर.......


बाहेर मुसळधार पावूस पडत आहे ...............
सारं वातावरण अगदी थंडगार आणि गारटवणारआहे................
ऑफिस मध्ये खूप काम असल्यामुळे आजचा दिवस खूप थकवणारा होता ........
तरीही संध्याकाळी पावूस पडल्या नंतर अगदी तरतरीत ताजे तवाने वाटू लागले ..............
हो बाहेरच्या चिखल आणि टॅ्फीक मुळे चिडचिड होत होती पण पावसाची सुरवात असल्या मुळे चिडचिड आपोआप थांबतही होती .......
पावसाचा आनंद घेत आम्ही मैत्रिणीनी पाणीपुरीचा बेत देखील केला आणि मग गरमा गरम तिखटमीट आणि रसरशीत लिंबू लावलेला मक्याचा आस्वाद घेत स्टेशानच्या दिशेने निघालो...........
ट्रेन प्ल्याटफॉर्मला नुकतीच लागली होती आम्ही धावत पळत ट्रेनमध्ये चढलो आणि खिडकी जवळची जागा पकडली.............
ट्रेनचा प्रवास अगदी मजेत सुरु झाला बाहेरच्या पावसाची आणि मक्याची मज्या घेत गप्पा रंगल्या तेवढ्यात ट्रेन पुढच्या स्टाँपला थांबली..............आणि भराभर सगळे आत शिरले त्या गर्दीत काही शाळेतील मुलं आणि त्यांची आई देखील होती त्यातली एक बाई पुढच्या सीट वरील बाईला सांगून आपल्या मुलाला बसायला जागा करून देत होती जागा झाल्यावर तो मुलगा टूनकण  उडी मारून तिथे बसला...............थोड्याच वेळात जागा  झाली तशी ती बाई देखील बसली पण कुणास ठावूक ती अचानक इकडे तिकडे पाहू लागली आणि एकटीच हसू लागली बडबडू लागली तिच्या मुलाला खेळवू लागली पण तिची पद्धत खूप वेगळीच होती सगळे तिच्याकडे पाहून हसू लागले तीच अस वागण......... तिच्या मुलालाही काळत होत...........
हे सगळे आपल्या आईला हसत आहेत हे पाहून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करु लागला ...आई नको न गं असं करू ...........गप्पं बस ना  गं ............ बघ सगळे हसतात तुला...
अस म्हणून तो त्याच्या आईला समजावू लागला तिच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला...........पण त्याचा काही उपयोग होत नसलेला पाहून त्याचे डोळे काठेकाठ भरले................शेवटी सहन न झाल्या मुळे कसलाही विचार न करता त्याचे अश्रु ओघळू लागले तेंव्हा त्याच्या डोळ्यात बाहेरच्या पावसा पेक्षाही जास्त तीव्रता आणि दुख होत आणि ते बाहेरच्या पावसाला देखील मात करत होता निव्वळ सात आठ वर्षाचा तो चिमुकला काय करू शकणार होता आणखीन .............
हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आले कि ती वेडी होती आणि सगळे शांत झाले................
काही रोजच्या बायकान कडून कळले कि ........तशी ती चांगली असते पण तीला मध्ये मध्ये वेड्याचे झटके येतात ..........त्या मुलाची ती तडफड पाहून खूप वाईट वाटले सगळे जन कसे हसत होते तिला एखाद्याच दुख: समजून न घेता आपल्या कडून दुसऱ्या व्यक्तीला खूप वाईट वागणूक दिली जाते . किंव्हा नकळत आपण कोणाला दुखवत तर नाही ना .अस नाही का वाटत या प्रसंगा वरून . तो मुलगा त्यावेळी काय विचार करत होता..............त्याच्या मनाला किती वेदना झाल्या ............. हे आपणही नाही सांगू शकत पण त्याच्या आईला सगळे हसतात हे त्याला पटलं नाही आणि ते थांबवण्याचा हि त्याने प्रयत्न केला . पण तो एवढासा मुलगा आतून किती तुटला असेल हे कस कळणार त्या हसणाऱ्या व्यक्तींना  . थोड्या वेळाने स्टेशन आल आणि आमच्या सोबत तो मुलगा हि आपल्या आईला घेऊन खाली उतरला आणि समोरच्या बाका वर जावून बसला आम्हीही त्याच्या सोबत थांबलो होतो थोडा वेळ................मग तीला थोड बरं वाटलं तस त्यांना टॅक्सी पर्यंत सोडून आमच्या मार्गी लागलो पण मला काही चैनच पडेना सारखा त्या मुलाचा चेहेरा डोळ्या समोर येत होता आपण आपल्या पालकांना आणि आपले पालक आपल्याला किती पुरत असतो नं ..........
आपण सतत एकमेकाच्या सह असतो आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेत ही ...................
पण कमाल त्या इवल्याश्या मुलाची कि त्याने आपल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला.........
काही दिवसांनी संध्याकाळी आम्हाला  तो परत दिसला त्याची आई पण होती त्याच्या सोबत.... पण ती ठीक होती या वेळी..................
त्याने व तिने गप्पा हि मारल्या आमच्या सोबत आणि उपचार चालू आहेत असे ही समजले..................
अश्या प्रकारे पावसाची एक वेगळी सर......................अनुभवायला मिळाली 




चैताली कदम 

Wednesday, July 18, 2012

पंचाक्षर

दोन व्यक्तीतील एक वेगळी .पण आपलीशी वाटणारी गोष्ट .प्रेम ..........हि भावना त्या व्यक्तीला कधी कळते काही माहित नाही पण .एक मेकांजवळचा एक असा क्षण जो आपल्याला एकमेकानकडे पाहून आपल्यात काही तरी वेगळ असल्याची जाणीव देतो .एकमेकान मध्ये काही नसताना जेंव्हा दोन क्षण एकमेकान कडे पाहत .अस का झालं .हे का होत आहे .हि भावना येन नक्की काय आहे .काही तरी चुकल्या सारखं .लाजल्या सारखं......काही तरी जाणवल्या सारखं.....गुंतल्या सारखं ......त्यावेळची ती एक नजर आपल्यातल्या वेगळ्या नात्याची जाणीव करून देत असते .एवद्या दिवसानच्या सहवासत कधी अशी वेळ आली नाही आणि आज .आज अशी हि वेगळे पणाची भावना का ............मी आज ओळखल कदाचित त्याला.......आज जाणल जवळून .......मी अगदी गोंधळून गेले .एवढ्या सगळ्यांच्या गोंधळात फक्त आम्ही आम्हाला वेगळे वाटत होतो . तसेच कोणी आसपास असण्याची जाणीव हि होत नवती आमचे डोळे एकमेकाना शोधात होते डोळ्यातून जणू बोलतच होतो एकमेकांशी . हे काय होतं अद्याप कळालेलं नाही पण काही तरी नक्कीचं स्वच्छंदि आनंदी हरवल्या सारखी जाणीव होत होती हळू हळू त्या दिवसात त्याच्या सहवासाची सवय झाली ओढ लागली त्याच्याशी तासान तास बोलत बसण्याची आवड निर्माण झाली आमची भेट माझ्या  मामेबहीनीच्या लग्नात झाली म्हणजे तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांच्या लांबच्या नात्यात आहोत पण घरातल्यांनी नाती खूप छान जपल्या मुळे चांगलीच ओळख होती सगळ्यांशी .एवढे वर्ष आम्ही भेटत आलो पण अशी ओढ कधी लागलीच नाही त्याची.............हे काहीस वेगळ होत . कदाचित हेच प्रेम असाव.............त्याच्याशी गप्पा मारणं त्याच्या सहवासात राहाण त्याला मनापासून मदत करण त्याची काळजी करण पण नाही मला त्याची शहानिशा करायची होती कदाचित हे आकर्षण हि असू शकत म्हणून मी बऱ्याच वेळा त्याला टाळलं भेटले नाही पण माझ्या मनातील त्याच्या बद्दलची भावना तशीच होती मग नंतर मी त्याला भेटण्याचं ठरवलं आणि आमच्यातील नात प्रियकर आणि प्रीयसित बद्दल माझ्या आईच नेहमीच म्हणन प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीच एकत्रीकरण म्हणजेच संसार कारण प्रेम हे एकटच जसं अपुरं आहे तसच लग्न हि...............दोन्ही शब्द अडीज अशारांचेच मग हे दोन्ही अडीज शब्द जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ती पूर्ण होतात मग कोणतही नात अपुरं राहण्याची काळजीच नाही ..........नाती अर्धवट ठेवून अमर होण्या खेरीज नाती पूर्ण करा आणि ती जागा ............जीवन पूर्ण होण्यासाठी जशी पंचमहाभूतांची गरज असते तसेच संसार पूर्ण होण्यासाठी प्रेम आणि लग्न याचे एकत्रीकरण म्हणजेच पंचाक्षर पाचअक्षरं याची गरज असते 




चैताली कदम 

Thursday, June 28, 2012

येरे येरे पावसा..............

येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

पावूस पडला झिम झिम झिम.........
आंगण झाले ओले चिंब.........
पावूस पडतो मुसळधार........
रान होईल हिरवे गार........

ये........गं ........ये ..............गं ...........सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............

पावसाळा सुरु झालाच.........मग आजच्या पावसात होड्या सोडल्या कि नाही मित्रानो ........आता मज्या येणार सर्वत्र थंडगार हिरवळ होणार.रिमझिम रिमझिम पावूस ,थंड थंड हवा ,गरमागरम भजी आणि चहा ,मातीचा सुवास ,कागदाच्या होड्या ,धबधब्याची सुरवात ,सकाळच धुकं ,गवतावरच दव,हवेतील ओलावा ,नदीनाले अगदी खळखळून वाहणार , आणि मोर.....मोर तर अक्षरशा नाचणार. आज खूप पावूस पडला अगदी आजी म्हणते नं ........धो धो .......तसाच आणि विजही गडगडली. आमचीच काय तर सगळ्या आज्या आभाळातील विजेला गंमत म्हणून गडगडनारी म्हातारी म्हणतात.लहान मुलं पावसात भिजून आजारी न पडण्यासाठी हा गंमतशीर उपाय असतो.म्हणजे लहान मुलं  घाबरून बाहेर जात नाही आणि घराच्या  आडोशालाच राहतात . आजीकडून आईकडे आईकडून आपल्याकडे  आलेला हा उपाय.......बरेचसे लोक येरे येरे पावसा .....म्हणत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या  सोडण  पसंत करतात . तस लहानपणी आपल्या आई बाबांनी , शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला हस्तकला म्हणून रुमालाच्या घडी नंतर होड्या बनवायला शिकवले आणि घड्यांचा सराव म्हणून दहा वेळा तीच होडी करून घेतली  ह्या होड्या पावूस आला कि पावसाच्या पाण्यात सोडायच्या हं ........असे सांगितले .आणि आपण.........आपण अस करतो देखील हा वारसा वर्षोन वर्ष चालत आलेला आहे .के.जी मधील मुलांना रेन रेन गो अवे ..........असे जरी शिकवले तरी मुलंच नाही तर एकंदरीत सारेच जण  पावूस आला कि उड्या मारत टाळया वाजवाट ये रे.....ये रे...पावसा म्हणत होड्या बनवायला सुरवात करतात .होडी पाहिली कि पावसाची आणि पावूस पाहिलाकी होडीची आठवण येण स्वाभाविक आहे .आणि आपण हा उत्कुष्ट खेळ अगदी निरागसतेने खेळत असतो कधी आई वडिलान बरोबर तर कधी मित्र मैत्रिणीन बरोबर तर कधी हाताच बोट इवल्याश्या हातात अगदी घट्ट पकडून इवलीशी पावलं टाकत तुरु तुरु चालणाऱ्या गोड हसणाऱ्या आपल्या  बाळा बरोबर .आणि हि वेळ सगळ्यांवर येते .पावसाच्या पाण्यात होड्या सोडन हा पारंपारिक खेळ झाला पाहीजे अस नाही का वाटत तुम्हाला ? झाला पाहिजे काय..........मला तर तो आहे असाच वाटत . काही जणांना तर खिडकीत बसून पावूस पाहत हातावर पावसाचे थेंब जेलण्याची खूप हौस आणि काहीना पावूस आला कि भजी आणि चहा पिण्याची ,काहीना भिजण्याची . गावची मंडळी तर.........काही काम करत असतील आणि पावूस आला तर  पावसाच गाण देखील म्हणतात म्हणजे जशी ओवी असतेना तसाच हा प्रकार .हे मी ऐकलेलं आहे हं ..........

उब  र...............उब  र...............पावसा
तुझ्या बायका गेल्या ताका ............
तिकड लगोऱ्या ................
इकड उबोऱ्या.............

मग साक्षात चमत्कारच जणू.................चक्क पावूस जातो .पावूस हा सगळ्यांना किती आवडीचा आणि आपलासा वाटतो नं . म्हणूनच दर वर्षी  काहीही  झाल तरीही आपण नव्याने पावसासाठी उत्साही असतो . आणि दर वर्षी प्रमाणे
येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

ये........गं ........ये ..............गं ...........
सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............
म्हणत पावसाच स्वगत करतो ......................
ऋतू पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ....................
मग या वर्षी हातात होड्या घेऊन आपणही म्हणायचं नं ...................

ये रे ये रे पावसा ................





चैताली कदम

Tuesday, June 26, 2012

पुन्हा एकदा शाळे मध्ये.........

 उन्हाळ्याची सुट्टी संपवून..........................
फिरून गाव पालत घालून .आंबे ,काजू , फणसाने  तृप्त होऊन . आणि कडाक्याच उन सोसून , घामाच्या  झळा झेलून ,सारेजण शाळेच्या खरेदीस लागले ,नवीन नवीन वस्तू जसे  कपडे , चकचकीत शूज , नवीन बॅग , नवी कोरी पुस्तक ,  पावसाळी कपडे छत्र्या अगदी विविध आणि निरनिराळ्या रंगाच्या  तसेच पट्टी ,पेन्सील पासून वह्या पुस्तकांच्या कवर पर्यंत.सगळ्या गोष्टींची खरेदी एकदम मजेत आणि उत्साहाने सुरु  झालीये ..............बाजारात अगदी नवीन नवीन प्रकारच्या वस्तुकी  देखील आल्यात  तशीच  पावसाची हि उत्सुक्ता अवर्णनीय आहे .
शाळेत असताना..............सुट्टीची........विविध ठिकाणी फिरण्याची..................
मज्या करण्याची.गावाला जाण्याची.नातेवाइक मित्र मंडळीना भेटण्याची.आंबे ,काजू ,फणस खाण्याची.जंगलात फिरण्याची.झाडावर चढण्याची.आणि सुट्टी असताना.शाळेची.शाळेतील मित्र मैत्रिणींची.मधल्या सुट्टीची.डब्याची.डब्यातील खाउची.ऑफ तासाची.आवडत्या शिक्षकांची.ग्रुप मधल्या  गप्पांची .खिशातल्या चण्याची.गेट बाहेरील चिंचांची.कँटींनच्या सामोस्याची.शाळे बाहेच्या कट्ट्याची.अलारामच्या  बेलची  ओढ् लागते.आणि कधी एकदा शाळेत जातो असे वाटू लागते.
एवढ्या.......दिवसांच्या सुट्टी नंतर मज्या करून भटकंती करून एकदाची शाळा सुरु होणार.......सगळे मित्र मैत्रीण आपल्याला परत भेटणार खूप धमाल मस्ती मज्या पावूस............. आणि तो दिवस जवळ आला..मी खूप उत्साहाने उठून तयारी केली .झाल नेमका पाउस आला..! 
अरे बापरे..........आजचं  जाण बोंबलत  कि काय ? हा प्रश्न पडला पण लक्षात आल मग केलेल्या खरेदीच काय.चढवला रेनकोट आणि घर सोडल .मस्त पावूस पडत आहे .मध्ये मध्ये काही मित्रमैत्रिणी भेटत होत्या.....उत्साह हि वाढत होता शेवटी पावसाचा  आनंद लुटत शाळा गाटली शाळेच्या आवारात पोहोचताच मन अगदी प्रसन्न वाटू लागले असे वाटत होते कि शाळा हि खूप खुष आहे . आम्ही परत आल्या बद्दल आणि आमच स्वागत करत आहे . खर म्हणायच तर शाळा म्हणजे आपली आईच म्हणायला हवे कारण सगळा अभ्यास , संस्कार , नाती , खेळ , स्पर्धा , जेवण आपण तिच्याच देखरेखी खाली आणि तिच्या आवारातच करत असतो मुळात . आयुष्यातील अर्ध्याहून  जास्त वेळ आपण आणि शाळा एकत्र काढतो . म्हणून आपण शाळेला कधीच विसरू शकत नाही ..................... आम्ही सगळे शाळेच्या आवारातच उभे होतो .प्रार्थना सुरु झाली  आणि  मनाला वाटल चला.............पुन्हा एकदा शाळे मध्ये ..............
.............पुन्हा एकदा शाळे मध्ये ..............


चैताली कदम

Thursday, June 7, 2012

पहिला पावूस.........


आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............

अंगावर येणाऱ्या थंड  शहाऱ्यांची ............... 

श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............

रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................


आठवण................गवतावरील  दवांची................

सकाळच्या ओलसर धुक्यांची..................

दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............

गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................


आठवण................वाट पहणाऱ्या  अतुर मोराची.................

तहानलेल्या चातक पक्षाची..............

भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................


आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............

आठवण.................पहिल्या पावसाची.............



चैताली कदम 

Friday, April 20, 2012

एक दिवस..................

आज घराच्या खिडकीत बसून..........
एकटच हसत काही तरी लिहावस वाटत .गरम गरम चहाचे गोडगोड सुस्कारे घेत .मुक्त पाने डोळे मिठून तल्लीन होत .दीर्घ श्वास घेत.काही तरी अस जे खरच खूप छान असेल.वेड लावणार असेल .जे मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला एका प्रकारच समाधान आनंद देईल आणि लाजून हसायला लावेल .आज खूप छान वाटतं आहे आणि मी हसत लिहायला सुरवात केली .तो आला  दबक्या पावलांनी आणि माझे डोळे हाताने मिठून शांत उभा राहिला .मी त्याला चटकन म्हणाले "आलास तू ..."
आणि तो नेहमी प्रमाणे "शीsssssssssssss ......!"
आज पण ओळखलस .असं म्हणत तो माझ्या जवळच्या खुर्चीत बसला .म्हणाला."तुला आधीच  कळालं होत मी आल्याच .पाहिलं अशील खिडकीतून.म्हणून ओळखलस न...."
"नाही ....."म्हणत मी मान  नाकारार्थक  डोलावली "मग कस ओळखलस .हे कस जमत तुला .."
त्याच्या कडे पाहत म्हणाले ."शब्दान पेक्षा स्पर्श जास्त बोलका असतो राजे आणि आपल्या माणसाची चाहूल कशी हि लागते .तू आत आलास तशीच जाणीव झाली मला तुझी ..."
मला टपली मारत हात जोडत म्हणाला "ओ............वेडा बाई भाषण नको प्लीझ पोटात  कावळे  ओरडतात "मी त्याच्या हातांवर हात जोडत म्हणाले ."बरं ए पण आज तू लवकर कसा.."
"असंच..!" म्हणत तो .........शर्ट ची बटण खोलत बेडरूम कडे वळला .चालता चालता थांबून "मी फ्रेश होवून येतो "अस म्हणाला .
"ठीक आहे .मी जेवण वाढते "
तो आला "लवकर वाढ प्लीज मला खूप भूक लागली आहे " 
इकडे तिकडे पाहू लागला..........
"काय  झालं काही हवं का तुला ?"
"हो......मी माझा फोन बेडरूम मध्ये विसरलो घेऊन येतेस का प्लीज."
"हो आलेच हं ........"
मी आत गेले तर खोलीत काळोख होता .मी  दिवे  लावले .बेडवर काही तरी ठेवलेलं होत.........
मी थोडस हसून पुढे गेले .......गिफ्ट आणि एक चिट्टी होती  ............   
मी चिट्टी उघडली ...............
प्रिय
...............
                               आज मी खूप खुश आहे कारण आजच्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस आज मी तुला पहिल्यांदा पाहिलं होत . आणि तुझ्या वर जीव जडला .आजचा हा दिवस माझ्या दीर्घ काळ किंव्हा चिरंतर लक्षात राहील . म्हणूनच हि  छोटीशी भेट तुला नक्कीच आवडेल .
                                                                                                          तुझा
                                                                                                           ..............

आणि माझ्या डोळ्यात पाणी आले .....त्याला आमची पहिली भेट अजून आठवणीत आहे मी ते गिफ्ट उघडून पाहिले त्यात एक सुंदरशी साडी होती मी ती घेऊन मागे वळणार तोच तो माझ्या मागे उभा  त्याने मला मिठीत  घेतले .आपण आज बाहेर जाऊया तू पटकन तयार हो ...................
आज एक छानसा  मूवी  आणि डिनर करूया ...............
लग्ना नंतर  खूप  दिवसा नंतर  आपण कुठे तरी बाहेर जातोय ..............
चल चल.............................
पटापट तयार हो आता वेळ नको दवडू .मी हि फ्रेश होतो आणि तयारी करतो ................
आज  बार्थ्ररुम  मधून 
अभी न  .................. 
जाओ ..............छोड कर............. 
के दिल............. अभी..............भर नाही ................
अशी शीळ घालत केस पुसत तो बाहेर आला .मी तयारी करून आरशात स्वतःला निहाळतच होते कि तो माझ्या मागे येऊन उभा राहिला अरशातूनच हसून हाताच्या खुणांनी छान दिसतेस अस म्हणाला. आज स्वरींचा मूड भलताच खुश होता आमच्यावर.त्याने मला जवळ घेतले...................
माझ प्रमोशन झाल आहे .................
ओ...........हो .............म्हणजे हा आनंद प्रमोशनचा आहे तर.......म्हणून आज खुश आहे का ..............
नाही ............माझ्या खांद्यावर दोनी हात ठेवत तो हसत म्हणाला दोन्ही पण गोष्टी त्याच दिवशी झाल्या .म्हणजे ................तू माझ्या साठी खूप लक्की  आहेस ग ..................
त्या वेळी पण तू आयुष्यात आलीस आणि सगळ बदल आणि आज याच दिवशी मला प्रमोशन मिळाल ..................दारावरची बेल वाजून पोस्ट्मेम ने एक लिफाफा आत टाकला मी तो अगदी आतुरतेने उघडला ......ती चिट्ठी कवटाळली  डोळ्यातून पाणी वाहू लागले ......तो माझ्या जवळ आला घाबरून मला विचारू लागला काय झाल का रडतेस.......काही नाही ......अग बोल न ...............
माझ हि प्रमोशन झाल आणि  तुझ तर हे दुसरं प्रमोशन .................
म्हणजे ..........काही समजल नाही मला ............
दुसरं प्रमोशन कोणत ..........
बाबांच्या जागेवर बडती मिळाली सर तुम्हाला ................
आणि मी ते रिपोट त्याचा हातात दिले .....................
तो आतुरतेने वाचू लागला ..................
आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहत मला खूप घट्ट मिठी मारत म्हणाला .......
प्रमोशनच्या हार्दिक शुभेच्छा होणाऱ्या आई साहेब ................
देवासमोर गोड ठेऊन आम्ही दोघ निघालो बाहेर ...................
हा क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली............माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्या मला मुलगा झाला त्याच नाव आम्ही अंश ठेवल .आणि काही दिवसांनी त्याच दिवशी त्यावेळी मी जे लिहायला घेतल ते पुस्तक प्रकाशित झाल .......................
तोच हा एक दिवस.........







चैताली कदम

Wednesday, April 4, 2012

चर्चा प्रश्नांची...............


आपल्याला जे हवं तेच  का मिळत नाही......................?
साठवायच असतं ते साठवता येत नाही.......................?
हवसं वाटतं ते परकं भासत.............................................?
नको असतं ते आपलसं करावं लागतं..........................?
प्रायश्चित्त म्हणून भोगावं का लागतं..............................?


हे अस का होत आहे .........आणि  होत आहे तर याची उत्तर का नाही ...........
अस म्हणतात ................उत्तर  मिळतात  आणि ती  मिळाल्यावर कळतात हि ........पण हे खर आहे का .................?आता हे सगळ बोलणारी मी कोण ..............?जाऊदे ते इतकस गरजेच नाही............पण हे सारे प्रश्न कधी तुम्हाला पडले का ............?
नाही..........नाही नाही म्हणता येणार . हे असे प्रश्न आहेत जे सर्वांना पडतात मग स्पष्ट का होत नाहीत.आणि जेंव्हा स्पष्ट होण्याच्या मार्गात असतात तेंव्हा दुसरे का  सापडतात..............कधी थांबतील हे प्रश्नाचे खेळ............हे प्रश्न म्हणजे.............शी sssssssssss...............
किती  घोळ  यांचा ............अस म्हणतात कि माणसं चुकतात आणि शिकतात.......प्रश्न सोडवता सोडवता  उत्तरं मिळतात ..................... 
पण .......दुसरे प्रश्न  का सापडतात हाच मोठा प्रश्न आहे ........डोळे भरले माझे ...........
पण.......रडू की नको हा हि  प्रश्नच  .....?आणि दुःख व्यक्त नाही केल तर त्रास होणार..............मग अश्या वेळी करायचं तरी काय .........?तो किंव्हा ती  हवी   पण हे शक्य नाही .............अस का ..........का होत आहे हे सगळ ........असे विचार डोक्यात येऊन अगदी  गोंधळ होतो ......आपण  सुन्न होऊन................आसपास  सगळ काही शांत होत ......आणि अचानक काही तरी  आठवत मग चेहेऱ्यावर एक स्मित हास्य येत ........काही तरी मिळाल्या सारख........आणि आनंदाचा झेंडा अगदी अटके पार होतो .कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच प्रश्नांची  असतात आणि ती पुरेपूर साथ हि
निभावतात  .पण प्रत्येक वेळी जे मिळालं ते खरच त्याच प्रश्नाच उत्तर असेल हे कशा वरून ........किंव्हा अस ही म्हणू शकतो .........कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच  प्रश्नांची असतात...............? हे कशावरून .......हो न ..........सतत विचार करून......थकून..........वैतागून.........डोक्यात आलेल्या  वादळा मुळे या प्रश्नान पासून  पळ  काढण्यासाठी  सुचलेला उपाय नाही कशावरून ............खर तर आपण प्रश्न निर्माण करतो आणि उत्तर हि आपल्या कडेच  असतात .......पण...........त्यांच्या कडे दुर्लक्ष करून.......नको अस नको ............तसं असत तर हे केल असत .......अस म्हणून  खऱ्या उत्तरला उत्तर रुपात  न  उतरवता  पळवून लावतो आपण......भारताला स्वातंत्र मिळाले.......पण आपण  स्वतःला  या प्रश्नांनी आणि त्यांची उत्तरे शोधण्यात अडकवून पारतंत्र्यात लोटल आहे .........अस का .............प्रश्न हे आपणच निर्माण करतो आणि मग आपणच उत्तराच्या पाठी हात धुवून लागतो .....मग एक काम करायचं विचार करून आत्मशक्ती आणि स्वतःला त्रास न देता ......प्रयत्न करत राहायचं कोणता हि प्रश्न निर्माण न करण्याचा  ............आयुष्य  हा  खूप मोठा प्रश्न आहे  आणि त्याच उत्तर म्हणजे  जीवन.............आणि  जर का  नियती ने आपल्या समोर प्रश्न म्हणून  इतक  छान  आयुष  ठेवलंच आहे 
मग..........हे छान आणि सुंदर रित्या  हसून खेळून  सुख : दुख :चढ  उतार भोगून सार्थक करावे ......... 
आयुष्य या प्रश्नाला  छान जगून आठवणी जोगे उत्तर द्यावे.............
आयुष हे खूप मोठ आहे ते जगताना खूप प्रश्न येतील पण हार न मानता त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यात ते फुकट न घालवता ते जगायला शिका आणि जगा ..................
प्रश्न हे असतातच  हो ..............
आणि जर का प्रश्न आहेत तर उत्तर हि असतील मग का घाबरायचं  ...............
मुक्त पणे जगायचं न ........................... 

आता पाहिलं तर मी हि हा विचार करायला हवा ............
मला हे कस सुचत................................?
किंव्हा का लिहावास वाटत ..............?
त्याही पेक्षा मी का लिहिते ..............?
हा हि प्रश्नच न ....................................?
हेच किती मोठे प्रश्न असू शकतात माझ्या साठी ..................
पण विचार नाही करायचं जास्त ................
सुचत तर सुचत...............
लिहित राहायचं .............




चैताली कदम

Monday, April 2, 2012

भावना ............

४ थी चा तो वर्ग आम्ही सगळे लहान पणा पासूनचे जिवलग मित्र मैत्रीण आज आमच प्रशस्ती पत्रक मिळणार आहे . मी घाई घाई ने तयारी करत घरातून निघाले . मनात अगदी विचारांची गर्दी झाली होती . पास  तर  होणार पण  ७०%  कि ८० % हेच विचार सतवत होते . आणि आता आपण पुढच्या वर्गात जाणार प्राथमिक शाळेतून आता आम्ही सगळेच उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेणार आभ्यास वाडूदे पण मज्या येणार
सगळे माहित नाही माझा ग्रुप पास होईल आणि सगळ्यांना एकाच वर्ग मिळावा अस मनापासून वाटत होत . आणि प्रत्येक वर्षी सारखा सगळे पास हि झाले पण त्यातले  माझे  दोन  मित्र शाळा बदलून जात होते  . आम्ही सगळे वैतागलो काय यार हे
शी ssssssss  .................... अस का कोणी शाळा बदलून जात .
पण काय करणार  त्यांच्या  बाबांची बदली झाली . मग तर त्याला जाव  लागणारच आणि आमचा ग्रुप २ व्यक्तींनी कमी झाला . पण बाकीचे सगळे कॉलेज पर्यंत सोबत होते  आम्ही सगळेच ............ सगळे जन खूप छान सेटल झालो आणि अर्ध्यांची लग्न हि झाली . काही वर्षांनी त्यातला आमचा एक मित्र आम्हाला परत हि भेटला पण  दुसऱ्या  मित्राचा काही  पत्ताच  नवता तेंव्हाच्या ४ थी तल्या  मुलां कडे  कुठे असणार फोन वैगरे . असो पण बाकीचे सगळे आहेत सोबत याचा आनंद आहेच मनात . काही जणांनी स्वतःचा बिजनेस सुरु केला तर काही जण नामवंत कंपनी मध्ये उच्च पदावर काम करत आहेत . आम्ही सगळे जण एकमेकांच्या सहवासात आहोत आणि थोड्या थोड्या दिवसांच्या कालावधी नंतर एकमेकांना भेटतोही . असा विचार मी करताच होते कि...............
फोन ची रिंग वाजली यमु चा  फोन होता मी आवडीने उचलला  आणि तिने अचानक मला विचारल......................
यमू :- अग तो आपल्या ४ थी च्या ग्रुप मध्ये होता न................
तो सदा त्याच्या बाबांच्या बदली मुले शाळा सोडून गेला ........
तो भेटला होता ........ 
मी :- अया.........हो ...............
किती  दिवसा नंतर तो भेटला न ............
यमू :- अग दिवसा काय  वर्षांनी  बोल.........
आता आपल्या  मित्र मैत्रिणीचा शोध संपला एकदाचा ..........
मी :- एकंदरीत सगळा ग्रुप पुन्हा एकत्र आला ................
पण तो तसाच असेल न  म्हणजे त्याचा स्वभाव वैगरे ............... 
यमू :- तो अगदी बद्दला आहे पण ओळखता मात्र येतो आम्ही दोघ स्टेशनला भेटलो .
थोडा वेळ एकमेकान कडे पाहतच   राहिलो कुठे तरी पाहिलं आहे अस.........
आणि जवळ येऊन यमू तूच न............. मी सदा ४  थी पर्यंत  आपण एकत्र शाळेत होतो  आणि _ _ _ _ _ _ _ .........
मी हसले हो रे............. माझ्या लक्षात आहे आणि तुला पाहिलं आणि मला सगळ आठवल हि . अस मी म्हणाले
मी :- आपण लक्षात आहोत का ग त्याच्या
यमू :- तो सगळ्यांची नाव वर्णन किंव्हा त्यांच्या  बद्दलच्या खुणा सांगून सगळ्यांची माहिती विचारू लागला त्याला हि आपण सगळे जण लक्षात आहोत हे  ऐकून खूप बर वाटल 
अग  तुलाही विचारात होता तो .
खूप वेळा तुझाच विषय काढला त्याने आणि फोन नंबर हि मागत होता पण मला काही सुचेना काहीतरी वेगळच वाटल त्याचं बोलण आणि  त्याच्या चेहेऱ्याच्या हावभावा  वरून .
मी :-  आधी नको देऊस अग आपण भेटू न तेंव्हा मी बघेन ओक .
यमू :-  अग हो  न  म्हणूनच  तस पण मला वाटल तूला विचारते   त्याला नंबर देऊ कि नको पण खर तर मला त्याच विचारण वेगळाच वाटलं ग................
म्हणून मी त्याला सहज विचारल ........
ए तू लग्न केलस की नाही............
तो नाही म्हणाला  पण त्या प्रश्ना नंतर त्याने परत तुझा  विषय काढला म्हणून मी विषय बदलत त्याला म्हणले अरे तीच लग्न झाल आणि तिला एक छानस गोंडस बाळ हि आहे  आणि  हो अरे आम्ही सगळे भेटतोय या रविवारी तू हि भेट न सगळ्यांना  सप्राइज  देऊया ओके आणि तो विषय टाळला गेला .
 मी :- हा हाहा हा हाहा ............
यमू :-  वा छान मी इथे काळजीत आहे आणि हि हसते . अग हसतेस काय बोल न
मी :-  बर झाल  बाई  नाही दिलास अग तो आपल्याला एवढ्या दिवसानंतर भेटलाय काय माहित त्याचा स्वभाव कसा आहे .वागण बोलन कस आहे . आपण भलेही मित्राच्या नात्याने बोलू पण तो कोणत नात घेऊन बोलेल हे कस कळणार आणि या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल काय माहित .
यमू :- हो न ............
मी :- चल जाऊदे या रविवारी आपण भेयू तेंव्हाच बोल ओक काळजी नको करूस मी ठेवते बाय
यमू :- बाय सोन्याला माझा कडून एक गोड गोड पा दे ओक.......... बाय.............
बघता बघता रविवार आला हि......................
माझ्या सासू बाईन मुळे मी माझ्या सोन्याला म्हणजे माझ्या मुलाला सोडून कामाला किंव्हा बाहेर जाऊ शकते . तो त्यांच्या कडे राहतो त्याला हि आजीचा  छान लळा लागला  आहे . त्यामुळे  माझ काम आणि माझ फीरण हि टळत नाही . तसं त्या खूप संजुदार आहेत आणि ह्यांना हि माहित आहे कि आम्ही सगळे फ्रेंड्स महिन्या दोन महिन्याने भेटतो . माझ्या घरातल्यांची काही हरकत नाही याला . आम्ही सगळे आज आमच्या मैत्रिणी कडे भेटणार होतो . पण मला खूप उशीर झाला होता . तितक्यात यमु चा फोन आला
यमू :-  अग कुठे आहेस कधी येणार .............
मी :-  थोडा उशीर होईल मी येते पण ........................
यमू :- ओक ...............ए  ए ए   थांब तो सदा बोलायचं म्हणतोय .
मी :- अग त्याला संग मी येतेच आहे . मग बोलूच.........
यमू :- थांब बोल जरा ...........
मी :- हॅलो .................हॅलो.............
तो :- हॅलो............. रत्ना ................रत्ना कशी आहेस तू ...............
मी :- मी ठीक आहे तू .......... तू कसा आहेस
तो :- मी हि ठीक ..........................
(तिचा आवाज ऐकला आणि मन अगदी कासावीस झाल ४ थी मध्ये असताना ती कशी दिसायची आम्ही किती छान मित्र मैत्रीण होतो  आणि मी बाकीच्या मित्र मैत्रीणी पेक्षा मी तिच्याशीच माझ्या सगळ्या गोष्टी शेर करायचो तीच माहित नाही पण मी तिला खूप जवळची मैत्रीण मानायचो आणि मी शाळा सोडून गेलो तरी तिला विसरलो नाही . तिचे ते पाणारलेले  डोळे गोरी गोरी पान हसली की गालावर खळी पडायची काळे भोर लांब सडक केस किती निरागस होती ती ते दिवस डोळ्या समोरून फटाफट गेले आणि सगळ शांत झाल मी हि )
मी :- बोल न.............का शांत झालास बोल...........
तो :- काही नाही ग .............तू....................तू ये लवकर मी वाट पाहतोय तुझी ...............
मी :- अरे हो पण काय झाल तुला..................... तुझा आवाज का .................
तितक्यात यमुने फोन घेतला .......
यमू :-  ए.........तू ये लवकर काय करतेस . थांब ..............थांब जरा..................मी बाजूला येते . अग काय तो इथे कोपऱ्यात येऊन तुझ्याशी बोलत होता सगळे विचारत होते कोणाशी बोलतोय हा . एक तर तो उमेश मागत होता आणि अनू पण मागतेय  फोन तू लवकर ये बगू .सगळे गोंधळ घालतायत इथे  बोलायला पण देत नाही सरळ ...............फोन खेचतायत  सारखा .... 
मी :-  अग तो खूप शांत झाला बोलता बोलता ........
यमू :-  काय............... काय............. बोलीस तू
मी :-  जाऊदे नंतर सांगते......बर बाय मी निघते चल
यमू :-   बाय
                                  तो खरच शांत झाला बोलता बोलता अस का केल त्याने . तो काय विचर करत असेल काय चालय त्याच्या मनात . मला खूप भीती वाटतेय .
सगळ काम  आटपून मी तयारी करून निघाले आणि तिच्या घरी पोहोचले . सगळे मला विचारू लागले का ग का एवढा उशीर केलास कशी आहेस . आणि तो..............तो अजून लांबच उभा फक्त हसत . मी आत गेले . बसले आजून हि तो पाहतच होता माझ्या कडे .
आता तो जवळ आला कशी आहेस अस म्हणून शांत झाला आणि थोड्या वेळाने .........
एवढ्या दिवसा नंतर माझी सर्वात आवडती मैत्रीण मला भेटली  . शाळा सोडून गेल्यावर  तुला खूप मिस केला ग .
ण आता आता खूप बर वाटतय तुला समोर पाहून . किती उशीर केलास .
मला खूप कस तरी वाटल .तसं हि त्या यमुने माझ्या मनात नकोते भरल्याने मी खूप घाबरले होते आता त्याला कळायलाच  हव माझ लग्न झालाय मला एक मुलगा माझा संसार आहे . माझ माझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे मला त्यांचा विश्वास नाही  गमवायचा आणि तुझ्या मुळे तर नाहीच नाही मला माझ्या  आयुष्यात  काही संकट नको  हे अस का वागतोय हा .या हेतूने मी फटा फट म्हणले 
अरे नाही........... बाबू खेळत होता न.............. आणि पाहुणे पण आले होते .
हे पण नको जाऊ म्हणत होते आधी एकच तर सुट्टी असते त्यात पण तूं बाहेर जातेस .
हे माझ्यावर खूप प्रेम करतात मला समजून घेतात ...................
मलाच वेळ नसतो त्यांच्या साठी ..............
पण त्यांनीच नंतर मला इथे सोडल .
 मी म्हणाले आत चला............. सगळ्यांना भेटा....... मग जा............
नको नको परत कधी तरी.............. इंजोय .............
म्हणून  गेले निघून ....................... 
अस म्हणत मी श्वास सोडला .............गप्प झाले थोडा वेळ
तो हसला आणि म्हणाला एक विचारू........................
हो विचार न सदा
माझ्या वागण्यातून काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस.............
तू माझी मैत्रीण आहेस सर्वात आवडती आणि ती ही बाल पणाची म्हणून तुला पाहण्याची तुझ्याशी बोलण्याची हूर हूर लागली होती . म्हणून मी तुझ्याशी बोलायला तुला भेटायला तड फड करत  होतो . आपले लहान पाणीचे मित्र मैत्रीण भेटणार हा विचार करून मी भारावून गेलो . माझ्या वागण्या मुळे तुला इतका त्रास होईल वाटल नाही चुकल असेल तर माफ कर मी विचित्र पणा केला ओवररीयाक्ट  झालो सॉरी जास्त विचार नको करूस अग......... मी इथे तुम्हा सगळ्यांना  माझ्या लग्नच आमंत्रण द्यायला आलोय .
तुझ्या  या  सगळ काही  एवढ्या   धडाधड  समजून सांगण्या  वरून  तु माझ्या एकंदरीत वागण्याने  माझ्या बदल स्वतः चा गैर समाज  करून गेतलास  अस वाटल  म्हणून हा विषय बोलो 
कारण तुझ्या मनात माझ्या बदल चुकीची  भावना  नको निर्माण व्हायला माझी मैत्रीण मला गमवायची नाही . मला माहित आहे तुझ्या मनात माझ्या बदल काही नाही आणि काही आहे ती फक्त मैत्री आणि माझ्या हि मनात काही नाही तुझ्या बदल .
शांत हो आणि आधी तो घाणेरडा विचार काढून  टाक  मनातून मंद कशी आहेस तू ........
किती वेगळी दिसतेस ग आणि सुंदर हि तितकीच निरागस ............ पण अजून हि तू तशीच आहेस बारीक जाडी हो जाडी ........... 
हो.......तसं ssssss  .... तुझ  लग्न नसत झाल तर मी विचारल असत तुला  लग्ना साठी  पण ठीक आहे  . मी उशीर केला आणि मी तेंव्हाच विषय सोडला जेंव्हा यमु मला म्हणाली तुझ लग्न झालाय छानसं  बाळ हि आहे . आणि तसं पण तुझ तुझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे  .कस धड धड  म्हणत  गेलीस  अजूनही ४ थी  त  असल्या सारख 
भारत माझा देश आहे............  म्हणाल्या  सारख .
आणि तो हसू लागला ...............त्याच्या त्या हसण्याने मला हि हसू आले .
मी किती चुकीचा विचार केला . माझा बावळट पणा वर मला हसू  येत आहे . 
नाती आधीच जुळलेली असतात  . आणि जोतो आपल नशीब सोबत घेऊन आल असतो .आता बघ न देवाने तुला माझी मैत्रीण बनवल .  हे हि नात्यातच मोडत न ..................
आणि माझा गैर समाज दूर झाला आम्ही सगळे जुन्या आठवनीन मध्ये रमलो
घरी आले रात्रीच्या जेवण नंतर झोताना मी यांना हे सांगू कि नको अस वाटल पण मी त्यांना ते सांगितल आणि तेही हसू लागले मला कुशीत घेउन  समजू लागले ................
कधी कधी  काही माणस आपल्या भावना लपवू नाही शकत आणि ते  समोरच्या व्यक्तीला  नाही खपत या  मुळेच समोरची व्यक्ती त्या व्यक्ती बद्दल चुकीचे अंदाज  बांधू लागते  पण हे चुकीचे अंदाज बदलू हि शकतात फक्त हे अंदाज एकमेकांशी स्पष्ट करायचे . दोन माणसां मध्ये स्पष्ट बोलण्याच नात किंव्हा पद्धत असते .त्या नात्यात विश्वास आणि सत्यता असते .प्रोब्लेम्स बोलून सुटतात गप्प राहून नाही . आणि बघ ते त्याने केल म्हणून हा गैर समाज दूर झाला नाही तर तू असच चुकीच समजत राहिली  असतीस आणि एक प्रामाणिक मित्र गमावला असतास .यमुच्या काही हि  भरळण्या  मुळे तू घाबरून गेलीस ती काळजी पोटी बोलली पण तू त्याला न पडताळता त्याच्या बदल चुकीचा अंदाज बांधलास . त्याने ते स्पष्ट केल हे ठीक केल . आणि मी हि स्पष्ट करण्यात विश्वास ठेवतो त्यामुळे तुझ्या हि बदल काही गैर समज माझ्या मनात नाही होऊ शकत नाही .  हे छोटे छोटे प्रोब्लेम्स तू तुझ्या पद्धतीने हाताळ आणि नाही जमल तर मला सांग ओक
तू न ......................माणसाना ओळखायला शिका बाईसाहेब
ह्यांच्या कुशीत  गप्पा मारता मारता कधी झोपले कळालच  नाही  . आणि परत एकदा शाळेच्या त्या आठवणींच्या स्वप्नात रमून गेले .



चैताली  कदम