Thursday, June 28, 2012

येरे येरे पावसा..............

येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

पावूस पडला झिम झिम झिम.........
आंगण झाले ओले चिंब.........
पावूस पडतो मुसळधार........
रान होईल हिरवे गार........

ये........गं ........ये ..............गं ...........सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............

पावसाळा सुरु झालाच.........मग आजच्या पावसात होड्या सोडल्या कि नाही मित्रानो ........आता मज्या येणार सर्वत्र थंडगार हिरवळ होणार.रिमझिम रिमझिम पावूस ,थंड थंड हवा ,गरमागरम भजी आणि चहा ,मातीचा सुवास ,कागदाच्या होड्या ,धबधब्याची सुरवात ,सकाळच धुकं ,गवतावरच दव,हवेतील ओलावा ,नदीनाले अगदी खळखळून वाहणार , आणि मोर.....मोर तर अक्षरशा नाचणार. आज खूप पावूस पडला अगदी आजी म्हणते नं ........धो धो .......तसाच आणि विजही गडगडली. आमचीच काय तर सगळ्या आज्या आभाळातील विजेला गंमत म्हणून गडगडनारी म्हातारी म्हणतात.लहान मुलं पावसात भिजून आजारी न पडण्यासाठी हा गंमतशीर उपाय असतो.म्हणजे लहान मुलं  घाबरून बाहेर जात नाही आणि घराच्या  आडोशालाच राहतात . आजीकडून आईकडे आईकडून आपल्याकडे  आलेला हा उपाय.......बरेचसे लोक येरे येरे पावसा .....म्हणत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या  सोडण  पसंत करतात . तस लहानपणी आपल्या आई बाबांनी , शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला हस्तकला म्हणून रुमालाच्या घडी नंतर होड्या बनवायला शिकवले आणि घड्यांचा सराव म्हणून दहा वेळा तीच होडी करून घेतली  ह्या होड्या पावूस आला कि पावसाच्या पाण्यात सोडायच्या हं ........असे सांगितले .आणि आपण.........आपण अस करतो देखील हा वारसा वर्षोन वर्ष चालत आलेला आहे .के.जी मधील मुलांना रेन रेन गो अवे ..........असे जरी शिकवले तरी मुलंच नाही तर एकंदरीत सारेच जण  पावूस आला कि उड्या मारत टाळया वाजवाट ये रे.....ये रे...पावसा म्हणत होड्या बनवायला सुरवात करतात .होडी पाहिली कि पावसाची आणि पावूस पाहिलाकी होडीची आठवण येण स्वाभाविक आहे .आणि आपण हा उत्कुष्ट खेळ अगदी निरागसतेने खेळत असतो कधी आई वडिलान बरोबर तर कधी मित्र मैत्रिणीन बरोबर तर कधी हाताच बोट इवल्याश्या हातात अगदी घट्ट पकडून इवलीशी पावलं टाकत तुरु तुरु चालणाऱ्या गोड हसणाऱ्या आपल्या  बाळा बरोबर .आणि हि वेळ सगळ्यांवर येते .पावसाच्या पाण्यात होड्या सोडन हा पारंपारिक खेळ झाला पाहीजे अस नाही का वाटत तुम्हाला ? झाला पाहिजे काय..........मला तर तो आहे असाच वाटत . काही जणांना तर खिडकीत बसून पावूस पाहत हातावर पावसाचे थेंब जेलण्याची खूप हौस आणि काहीना पावूस आला कि भजी आणि चहा पिण्याची ,काहीना भिजण्याची . गावची मंडळी तर.........काही काम करत असतील आणि पावूस आला तर  पावसाच गाण देखील म्हणतात म्हणजे जशी ओवी असतेना तसाच हा प्रकार .हे मी ऐकलेलं आहे हं ..........

उब  र...............उब  र...............पावसा
तुझ्या बायका गेल्या ताका ............
तिकड लगोऱ्या ................
इकड उबोऱ्या.............

मग साक्षात चमत्कारच जणू.................चक्क पावूस जातो .पावूस हा सगळ्यांना किती आवडीचा आणि आपलासा वाटतो नं . म्हणूनच दर वर्षी  काहीही  झाल तरीही आपण नव्याने पावसासाठी उत्साही असतो . आणि दर वर्षी प्रमाणे
येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

ये........गं ........ये ..............गं ...........
सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............
म्हणत पावसाच स्वगत करतो ......................
ऋतू पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ....................
मग या वर्षी हातात होड्या घेऊन आपणही म्हणायचं नं ...................

ये रे ये रे पावसा ................





चैताली कदम

Tuesday, June 26, 2012

पुन्हा एकदा शाळे मध्ये.........

 उन्हाळ्याची सुट्टी संपवून..........................
फिरून गाव पालत घालून .आंबे ,काजू , फणसाने  तृप्त होऊन . आणि कडाक्याच उन सोसून , घामाच्या  झळा झेलून ,सारेजण शाळेच्या खरेदीस लागले ,नवीन नवीन वस्तू जसे  कपडे , चकचकीत शूज , नवीन बॅग , नवी कोरी पुस्तक ,  पावसाळी कपडे छत्र्या अगदी विविध आणि निरनिराळ्या रंगाच्या  तसेच पट्टी ,पेन्सील पासून वह्या पुस्तकांच्या कवर पर्यंत.सगळ्या गोष्टींची खरेदी एकदम मजेत आणि उत्साहाने सुरु  झालीये ..............बाजारात अगदी नवीन नवीन प्रकारच्या वस्तुकी  देखील आल्यात  तशीच  पावसाची हि उत्सुक्ता अवर्णनीय आहे .
शाळेत असताना..............सुट्टीची........विविध ठिकाणी फिरण्याची..................
मज्या करण्याची.गावाला जाण्याची.नातेवाइक मित्र मंडळीना भेटण्याची.आंबे ,काजू ,फणस खाण्याची.जंगलात फिरण्याची.झाडावर चढण्याची.आणि सुट्टी असताना.शाळेची.शाळेतील मित्र मैत्रिणींची.मधल्या सुट्टीची.डब्याची.डब्यातील खाउची.ऑफ तासाची.आवडत्या शिक्षकांची.ग्रुप मधल्या  गप्पांची .खिशातल्या चण्याची.गेट बाहेरील चिंचांची.कँटींनच्या सामोस्याची.शाळे बाहेच्या कट्ट्याची.अलारामच्या  बेलची  ओढ् लागते.आणि कधी एकदा शाळेत जातो असे वाटू लागते.
एवढ्या.......दिवसांच्या सुट्टी नंतर मज्या करून भटकंती करून एकदाची शाळा सुरु होणार.......सगळे मित्र मैत्रीण आपल्याला परत भेटणार खूप धमाल मस्ती मज्या पावूस............. आणि तो दिवस जवळ आला..मी खूप उत्साहाने उठून तयारी केली .झाल नेमका पाउस आला..! 
अरे बापरे..........आजचं  जाण बोंबलत  कि काय ? हा प्रश्न पडला पण लक्षात आल मग केलेल्या खरेदीच काय.चढवला रेनकोट आणि घर सोडल .मस्त पावूस पडत आहे .मध्ये मध्ये काही मित्रमैत्रिणी भेटत होत्या.....उत्साह हि वाढत होता शेवटी पावसाचा  आनंद लुटत शाळा गाटली शाळेच्या आवारात पोहोचताच मन अगदी प्रसन्न वाटू लागले असे वाटत होते कि शाळा हि खूप खुष आहे . आम्ही परत आल्या बद्दल आणि आमच स्वागत करत आहे . खर म्हणायच तर शाळा म्हणजे आपली आईच म्हणायला हवे कारण सगळा अभ्यास , संस्कार , नाती , खेळ , स्पर्धा , जेवण आपण तिच्याच देखरेखी खाली आणि तिच्या आवारातच करत असतो मुळात . आयुष्यातील अर्ध्याहून  जास्त वेळ आपण आणि शाळा एकत्र काढतो . म्हणून आपण शाळेला कधीच विसरू शकत नाही ..................... आम्ही सगळे शाळेच्या आवारातच उभे होतो .प्रार्थना सुरु झाली  आणि  मनाला वाटल चला.............पुन्हा एकदा शाळे मध्ये ..............
.............पुन्हा एकदा शाळे मध्ये ..............


चैताली कदम

Thursday, June 7, 2012

पहिला पावूस.........


आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............

अंगावर येणाऱ्या थंड  शहाऱ्यांची ............... 

श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............

रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................


आठवण................गवतावरील  दवांची................

सकाळच्या ओलसर धुक्यांची..................

दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............

गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................


आठवण................वाट पहणाऱ्या  अतुर मोराची.................

तहानलेल्या चातक पक्षाची..............

भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................


आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............

आठवण.................पहिल्या पावसाची.............



चैताली कदम