Friday, April 20, 2012

एक दिवस..................

आज घराच्या खिडकीत बसून..........
एकटच हसत काही तरी लिहावस वाटत .गरम गरम चहाचे गोडगोड सुस्कारे घेत .मुक्त पाने डोळे मिठून तल्लीन होत .दीर्घ श्वास घेत.काही तरी अस जे खरच खूप छान असेल.वेड लावणार असेल .जे मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला एका प्रकारच समाधान आनंद देईल आणि लाजून हसायला लावेल .आज खूप छान वाटतं आहे आणि मी हसत लिहायला सुरवात केली .तो आला  दबक्या पावलांनी आणि माझे डोळे हाताने मिठून शांत उभा राहिला .मी त्याला चटकन म्हणाले "आलास तू ..."
आणि तो नेहमी प्रमाणे "शीsssssssssssss ......!"
आज पण ओळखलस .असं म्हणत तो माझ्या जवळच्या खुर्चीत बसला .म्हणाला."तुला आधीच  कळालं होत मी आल्याच .पाहिलं अशील खिडकीतून.म्हणून ओळखलस न...."
"नाही ....."म्हणत मी मान  नाकारार्थक  डोलावली "मग कस ओळखलस .हे कस जमत तुला .."
त्याच्या कडे पाहत म्हणाले ."शब्दान पेक्षा स्पर्श जास्त बोलका असतो राजे आणि आपल्या माणसाची चाहूल कशी हि लागते .तू आत आलास तशीच जाणीव झाली मला तुझी ..."
मला टपली मारत हात जोडत म्हणाला "ओ............वेडा बाई भाषण नको प्लीझ पोटात  कावळे  ओरडतात "मी त्याच्या हातांवर हात जोडत म्हणाले ."बरं ए पण आज तू लवकर कसा.."
"असंच..!" म्हणत तो .........शर्ट ची बटण खोलत बेडरूम कडे वळला .चालता चालता थांबून "मी फ्रेश होवून येतो "अस म्हणाला .
"ठीक आहे .मी जेवण वाढते "
तो आला "लवकर वाढ प्लीज मला खूप भूक लागली आहे " 
इकडे तिकडे पाहू लागला..........
"काय  झालं काही हवं का तुला ?"
"हो......मी माझा फोन बेडरूम मध्ये विसरलो घेऊन येतेस का प्लीज."
"हो आलेच हं ........"
मी आत गेले तर खोलीत काळोख होता .मी  दिवे  लावले .बेडवर काही तरी ठेवलेलं होत.........
मी थोडस हसून पुढे गेले .......गिफ्ट आणि एक चिट्टी होती  ............   
मी चिट्टी उघडली ...............
प्रिय
...............
                               आज मी खूप खुश आहे कारण आजच्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस आज मी तुला पहिल्यांदा पाहिलं होत . आणि तुझ्या वर जीव जडला .आजचा हा दिवस माझ्या दीर्घ काळ किंव्हा चिरंतर लक्षात राहील . म्हणूनच हि  छोटीशी भेट तुला नक्कीच आवडेल .
                                                                                                          तुझा
                                                                                                           ..............

आणि माझ्या डोळ्यात पाणी आले .....त्याला आमची पहिली भेट अजून आठवणीत आहे मी ते गिफ्ट उघडून पाहिले त्यात एक सुंदरशी साडी होती मी ती घेऊन मागे वळणार तोच तो माझ्या मागे उभा  त्याने मला मिठीत  घेतले .आपण आज बाहेर जाऊया तू पटकन तयार हो ...................
आज एक छानसा  मूवी  आणि डिनर करूया ...............
लग्ना नंतर  खूप  दिवसा नंतर  आपण कुठे तरी बाहेर जातोय ..............
चल चल.............................
पटापट तयार हो आता वेळ नको दवडू .मी हि फ्रेश होतो आणि तयारी करतो ................
आज  बार्थ्ररुम  मधून 
अभी न  .................. 
जाओ ..............छोड कर............. 
के दिल............. अभी..............भर नाही ................
अशी शीळ घालत केस पुसत तो बाहेर आला .मी तयारी करून आरशात स्वतःला निहाळतच होते कि तो माझ्या मागे येऊन उभा राहिला अरशातूनच हसून हाताच्या खुणांनी छान दिसतेस अस म्हणाला. आज स्वरींचा मूड भलताच खुश होता आमच्यावर.त्याने मला जवळ घेतले...................
माझ प्रमोशन झाल आहे .................
ओ...........हो .............म्हणजे हा आनंद प्रमोशनचा आहे तर.......म्हणून आज खुश आहे का ..............
नाही ............माझ्या खांद्यावर दोनी हात ठेवत तो हसत म्हणाला दोन्ही पण गोष्टी त्याच दिवशी झाल्या .म्हणजे ................तू माझ्या साठी खूप लक्की  आहेस ग ..................
त्या वेळी पण तू आयुष्यात आलीस आणि सगळ बदल आणि आज याच दिवशी मला प्रमोशन मिळाल ..................दारावरची बेल वाजून पोस्ट्मेम ने एक लिफाफा आत टाकला मी तो अगदी आतुरतेने उघडला ......ती चिट्ठी कवटाळली  डोळ्यातून पाणी वाहू लागले ......तो माझ्या जवळ आला घाबरून मला विचारू लागला काय झाल का रडतेस.......काही नाही ......अग बोल न ...............
माझ हि प्रमोशन झाल आणि  तुझ तर हे दुसरं प्रमोशन .................
म्हणजे ..........काही समजल नाही मला ............
दुसरं प्रमोशन कोणत ..........
बाबांच्या जागेवर बडती मिळाली सर तुम्हाला ................
आणि मी ते रिपोट त्याचा हातात दिले .....................
तो आतुरतेने वाचू लागला ..................
आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहत मला खूप घट्ट मिठी मारत म्हणाला .......
प्रमोशनच्या हार्दिक शुभेच्छा होणाऱ्या आई साहेब ................
देवासमोर गोड ठेऊन आम्ही दोघ निघालो बाहेर ...................
हा क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली............माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्या मला मुलगा झाला त्याच नाव आम्ही अंश ठेवल .आणि काही दिवसांनी त्याच दिवशी त्यावेळी मी जे लिहायला घेतल ते पुस्तक प्रकाशित झाल .......................
तोच हा एक दिवस.........







चैताली कदम

Wednesday, April 4, 2012

चर्चा प्रश्नांची...............


आपल्याला जे हवं तेच  का मिळत नाही......................?
साठवायच असतं ते साठवता येत नाही.......................?
हवसं वाटतं ते परकं भासत.............................................?
नको असतं ते आपलसं करावं लागतं..........................?
प्रायश्चित्त म्हणून भोगावं का लागतं..............................?


हे अस का होत आहे .........आणि  होत आहे तर याची उत्तर का नाही ...........
अस म्हणतात ................उत्तर  मिळतात  आणि ती  मिळाल्यावर कळतात हि ........पण हे खर आहे का .................?आता हे सगळ बोलणारी मी कोण ..............?जाऊदे ते इतकस गरजेच नाही............पण हे सारे प्रश्न कधी तुम्हाला पडले का ............?
नाही..........नाही नाही म्हणता येणार . हे असे प्रश्न आहेत जे सर्वांना पडतात मग स्पष्ट का होत नाहीत.आणि जेंव्हा स्पष्ट होण्याच्या मार्गात असतात तेंव्हा दुसरे का  सापडतात..............कधी थांबतील हे प्रश्नाचे खेळ............हे प्रश्न म्हणजे.............शी sssssssssss...............
किती  घोळ  यांचा ............अस म्हणतात कि माणसं चुकतात आणि शिकतात.......प्रश्न सोडवता सोडवता  उत्तरं मिळतात ..................... 
पण .......दुसरे प्रश्न  का सापडतात हाच मोठा प्रश्न आहे ........डोळे भरले माझे ...........
पण.......रडू की नको हा हि  प्रश्नच  .....?आणि दुःख व्यक्त नाही केल तर त्रास होणार..............मग अश्या वेळी करायचं तरी काय .........?तो किंव्हा ती  हवी   पण हे शक्य नाही .............अस का ..........का होत आहे हे सगळ ........असे विचार डोक्यात येऊन अगदी  गोंधळ होतो ......आपण  सुन्न होऊन................आसपास  सगळ काही शांत होत ......आणि अचानक काही तरी  आठवत मग चेहेऱ्यावर एक स्मित हास्य येत ........काही तरी मिळाल्या सारख........आणि आनंदाचा झेंडा अगदी अटके पार होतो .कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच प्रश्नांची  असतात आणि ती पुरेपूर साथ हि
निभावतात  .पण प्रत्येक वेळी जे मिळालं ते खरच त्याच प्रश्नाच उत्तर असेल हे कशा वरून ........किंव्हा अस ही म्हणू शकतो .........कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच  प्रश्नांची असतात...............? हे कशावरून .......हो न ..........सतत विचार करून......थकून..........वैतागून.........डोक्यात आलेल्या  वादळा मुळे या प्रश्नान पासून  पळ  काढण्यासाठी  सुचलेला उपाय नाही कशावरून ............खर तर आपण प्रश्न निर्माण करतो आणि उत्तर हि आपल्या कडेच  असतात .......पण...........त्यांच्या कडे दुर्लक्ष करून.......नको अस नको ............तसं असत तर हे केल असत .......अस म्हणून  खऱ्या उत्तरला उत्तर रुपात  न  उतरवता  पळवून लावतो आपण......भारताला स्वातंत्र मिळाले.......पण आपण  स्वतःला  या प्रश्नांनी आणि त्यांची उत्तरे शोधण्यात अडकवून पारतंत्र्यात लोटल आहे .........अस का .............प्रश्न हे आपणच निर्माण करतो आणि मग आपणच उत्तराच्या पाठी हात धुवून लागतो .....मग एक काम करायचं विचार करून आत्मशक्ती आणि स्वतःला त्रास न देता ......प्रयत्न करत राहायचं कोणता हि प्रश्न निर्माण न करण्याचा  ............आयुष्य  हा  खूप मोठा प्रश्न आहे  आणि त्याच उत्तर म्हणजे  जीवन.............आणि  जर का  नियती ने आपल्या समोर प्रश्न म्हणून  इतक  छान  आयुष  ठेवलंच आहे 
मग..........हे छान आणि सुंदर रित्या  हसून खेळून  सुख : दुख :चढ  उतार भोगून सार्थक करावे ......... 
आयुष्य या प्रश्नाला  छान जगून आठवणी जोगे उत्तर द्यावे.............
आयुष हे खूप मोठ आहे ते जगताना खूप प्रश्न येतील पण हार न मानता त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यात ते फुकट न घालवता ते जगायला शिका आणि जगा ..................
प्रश्न हे असतातच  हो ..............
आणि जर का प्रश्न आहेत तर उत्तर हि असतील मग का घाबरायचं  ...............
मुक्त पणे जगायचं न ........................... 

आता पाहिलं तर मी हि हा विचार करायला हवा ............
मला हे कस सुचत................................?
किंव्हा का लिहावास वाटत ..............?
त्याही पेक्षा मी का लिहिते ..............?
हा हि प्रश्नच न ....................................?
हेच किती मोठे प्रश्न असू शकतात माझ्या साठी ..................
पण विचार नाही करायचं जास्त ................
सुचत तर सुचत...............
लिहित राहायचं .............




चैताली कदम

Monday, April 2, 2012

भावना ............

४ थी चा तो वर्ग आम्ही सगळे लहान पणा पासूनचे जिवलग मित्र मैत्रीण आज आमच प्रशस्ती पत्रक मिळणार आहे . मी घाई घाई ने तयारी करत घरातून निघाले . मनात अगदी विचारांची गर्दी झाली होती . पास  तर  होणार पण  ७०%  कि ८० % हेच विचार सतवत होते . आणि आता आपण पुढच्या वर्गात जाणार प्राथमिक शाळेतून आता आम्ही सगळेच उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेणार आभ्यास वाडूदे पण मज्या येणार
सगळे माहित नाही माझा ग्रुप पास होईल आणि सगळ्यांना एकाच वर्ग मिळावा अस मनापासून वाटत होत . आणि प्रत्येक वर्षी सारखा सगळे पास हि झाले पण त्यातले  माझे  दोन  मित्र शाळा बदलून जात होते  . आम्ही सगळे वैतागलो काय यार हे
शी ssssssss  .................... अस का कोणी शाळा बदलून जात .
पण काय करणार  त्यांच्या  बाबांची बदली झाली . मग तर त्याला जाव  लागणारच आणि आमचा ग्रुप २ व्यक्तींनी कमी झाला . पण बाकीचे सगळे कॉलेज पर्यंत सोबत होते  आम्ही सगळेच ............ सगळे जन खूप छान सेटल झालो आणि अर्ध्यांची लग्न हि झाली . काही वर्षांनी त्यातला आमचा एक मित्र आम्हाला परत हि भेटला पण  दुसऱ्या  मित्राचा काही  पत्ताच  नवता तेंव्हाच्या ४ थी तल्या  मुलां कडे  कुठे असणार फोन वैगरे . असो पण बाकीचे सगळे आहेत सोबत याचा आनंद आहेच मनात . काही जणांनी स्वतःचा बिजनेस सुरु केला तर काही जण नामवंत कंपनी मध्ये उच्च पदावर काम करत आहेत . आम्ही सगळे जण एकमेकांच्या सहवासात आहोत आणि थोड्या थोड्या दिवसांच्या कालावधी नंतर एकमेकांना भेटतोही . असा विचार मी करताच होते कि...............
फोन ची रिंग वाजली यमु चा  फोन होता मी आवडीने उचलला  आणि तिने अचानक मला विचारल......................
यमू :- अग तो आपल्या ४ थी च्या ग्रुप मध्ये होता न................
तो सदा त्याच्या बाबांच्या बदली मुले शाळा सोडून गेला ........
तो भेटला होता ........ 
मी :- अया.........हो ...............
किती  दिवसा नंतर तो भेटला न ............
यमू :- अग दिवसा काय  वर्षांनी  बोल.........
आता आपल्या  मित्र मैत्रिणीचा शोध संपला एकदाचा ..........
मी :- एकंदरीत सगळा ग्रुप पुन्हा एकत्र आला ................
पण तो तसाच असेल न  म्हणजे त्याचा स्वभाव वैगरे ............... 
यमू :- तो अगदी बद्दला आहे पण ओळखता मात्र येतो आम्ही दोघ स्टेशनला भेटलो .
थोडा वेळ एकमेकान कडे पाहतच   राहिलो कुठे तरी पाहिलं आहे अस.........
आणि जवळ येऊन यमू तूच न............. मी सदा ४  थी पर्यंत  आपण एकत्र शाळेत होतो  आणि _ _ _ _ _ _ _ .........
मी हसले हो रे............. माझ्या लक्षात आहे आणि तुला पाहिलं आणि मला सगळ आठवल हि . अस मी म्हणाले
मी :- आपण लक्षात आहोत का ग त्याच्या
यमू :- तो सगळ्यांची नाव वर्णन किंव्हा त्यांच्या  बद्दलच्या खुणा सांगून सगळ्यांची माहिती विचारू लागला त्याला हि आपण सगळे जण लक्षात आहोत हे  ऐकून खूप बर वाटल 
अग  तुलाही विचारात होता तो .
खूप वेळा तुझाच विषय काढला त्याने आणि फोन नंबर हि मागत होता पण मला काही सुचेना काहीतरी वेगळच वाटल त्याचं बोलण आणि  त्याच्या चेहेऱ्याच्या हावभावा  वरून .
मी :-  आधी नको देऊस अग आपण भेटू न तेंव्हा मी बघेन ओक .
यमू :-  अग हो  न  म्हणूनच  तस पण मला वाटल तूला विचारते   त्याला नंबर देऊ कि नको पण खर तर मला त्याच विचारण वेगळाच वाटलं ग................
म्हणून मी त्याला सहज विचारल ........
ए तू लग्न केलस की नाही............
तो नाही म्हणाला  पण त्या प्रश्ना नंतर त्याने परत तुझा  विषय काढला म्हणून मी विषय बदलत त्याला म्हणले अरे तीच लग्न झाल आणि तिला एक छानस गोंडस बाळ हि आहे  आणि  हो अरे आम्ही सगळे भेटतोय या रविवारी तू हि भेट न सगळ्यांना  सप्राइज  देऊया ओके आणि तो विषय टाळला गेला .
 मी :- हा हाहा हा हाहा ............
यमू :-  वा छान मी इथे काळजीत आहे आणि हि हसते . अग हसतेस काय बोल न
मी :-  बर झाल  बाई  नाही दिलास अग तो आपल्याला एवढ्या दिवसानंतर भेटलाय काय माहित त्याचा स्वभाव कसा आहे .वागण बोलन कस आहे . आपण भलेही मित्राच्या नात्याने बोलू पण तो कोणत नात घेऊन बोलेल हे कस कळणार आणि या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल काय माहित .
यमू :- हो न ............
मी :- चल जाऊदे या रविवारी आपण भेयू तेंव्हाच बोल ओक काळजी नको करूस मी ठेवते बाय
यमू :- बाय सोन्याला माझा कडून एक गोड गोड पा दे ओक.......... बाय.............
बघता बघता रविवार आला हि......................
माझ्या सासू बाईन मुळे मी माझ्या सोन्याला म्हणजे माझ्या मुलाला सोडून कामाला किंव्हा बाहेर जाऊ शकते . तो त्यांच्या कडे राहतो त्याला हि आजीचा  छान लळा लागला  आहे . त्यामुळे  माझ काम आणि माझ फीरण हि टळत नाही . तसं त्या खूप संजुदार आहेत आणि ह्यांना हि माहित आहे कि आम्ही सगळे फ्रेंड्स महिन्या दोन महिन्याने भेटतो . माझ्या घरातल्यांची काही हरकत नाही याला . आम्ही सगळे आज आमच्या मैत्रिणी कडे भेटणार होतो . पण मला खूप उशीर झाला होता . तितक्यात यमु चा फोन आला
यमू :-  अग कुठे आहेस कधी येणार .............
मी :-  थोडा उशीर होईल मी येते पण ........................
यमू :- ओक ...............ए  ए ए   थांब तो सदा बोलायचं म्हणतोय .
मी :- अग त्याला संग मी येतेच आहे . मग बोलूच.........
यमू :- थांब बोल जरा ...........
मी :- हॅलो .................हॅलो.............
तो :- हॅलो............. रत्ना ................रत्ना कशी आहेस तू ...............
मी :- मी ठीक आहे तू .......... तू कसा आहेस
तो :- मी हि ठीक ..........................
(तिचा आवाज ऐकला आणि मन अगदी कासावीस झाल ४ थी मध्ये असताना ती कशी दिसायची आम्ही किती छान मित्र मैत्रीण होतो  आणि मी बाकीच्या मित्र मैत्रीणी पेक्षा मी तिच्याशीच माझ्या सगळ्या गोष्टी शेर करायचो तीच माहित नाही पण मी तिला खूप जवळची मैत्रीण मानायचो आणि मी शाळा सोडून गेलो तरी तिला विसरलो नाही . तिचे ते पाणारलेले  डोळे गोरी गोरी पान हसली की गालावर खळी पडायची काळे भोर लांब सडक केस किती निरागस होती ती ते दिवस डोळ्या समोरून फटाफट गेले आणि सगळ शांत झाल मी हि )
मी :- बोल न.............का शांत झालास बोल...........
तो :- काही नाही ग .............तू....................तू ये लवकर मी वाट पाहतोय तुझी ...............
मी :- अरे हो पण काय झाल तुला..................... तुझा आवाज का .................
तितक्यात यमुने फोन घेतला .......
यमू :-  ए.........तू ये लवकर काय करतेस . थांब ..............थांब जरा..................मी बाजूला येते . अग काय तो इथे कोपऱ्यात येऊन तुझ्याशी बोलत होता सगळे विचारत होते कोणाशी बोलतोय हा . एक तर तो उमेश मागत होता आणि अनू पण मागतेय  फोन तू लवकर ये बगू .सगळे गोंधळ घालतायत इथे  बोलायला पण देत नाही सरळ ...............फोन खेचतायत  सारखा .... 
मी :-  अग तो खूप शांत झाला बोलता बोलता ........
यमू :-  काय............... काय............. बोलीस तू
मी :-  जाऊदे नंतर सांगते......बर बाय मी निघते चल
यमू :-   बाय
                                  तो खरच शांत झाला बोलता बोलता अस का केल त्याने . तो काय विचर करत असेल काय चालय त्याच्या मनात . मला खूप भीती वाटतेय .
सगळ काम  आटपून मी तयारी करून निघाले आणि तिच्या घरी पोहोचले . सगळे मला विचारू लागले का ग का एवढा उशीर केलास कशी आहेस . आणि तो..............तो अजून लांबच उभा फक्त हसत . मी आत गेले . बसले आजून हि तो पाहतच होता माझ्या कडे .
आता तो जवळ आला कशी आहेस अस म्हणून शांत झाला आणि थोड्या वेळाने .........
एवढ्या दिवसा नंतर माझी सर्वात आवडती मैत्रीण मला भेटली  . शाळा सोडून गेल्यावर  तुला खूप मिस केला ग .
ण आता आता खूप बर वाटतय तुला समोर पाहून . किती उशीर केलास .
मला खूप कस तरी वाटल .तसं हि त्या यमुने माझ्या मनात नकोते भरल्याने मी खूप घाबरले होते आता त्याला कळायलाच  हव माझ लग्न झालाय मला एक मुलगा माझा संसार आहे . माझ माझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे मला त्यांचा विश्वास नाही  गमवायचा आणि तुझ्या मुळे तर नाहीच नाही मला माझ्या  आयुष्यात  काही संकट नको  हे अस का वागतोय हा .या हेतूने मी फटा फट म्हणले 
अरे नाही........... बाबू खेळत होता न.............. आणि पाहुणे पण आले होते .
हे पण नको जाऊ म्हणत होते आधी एकच तर सुट्टी असते त्यात पण तूं बाहेर जातेस .
हे माझ्यावर खूप प्रेम करतात मला समजून घेतात ...................
मलाच वेळ नसतो त्यांच्या साठी ..............
पण त्यांनीच नंतर मला इथे सोडल .
 मी म्हणाले आत चला............. सगळ्यांना भेटा....... मग जा............
नको नको परत कधी तरी.............. इंजोय .............
म्हणून  गेले निघून ....................... 
अस म्हणत मी श्वास सोडला .............गप्प झाले थोडा वेळ
तो हसला आणि म्हणाला एक विचारू........................
हो विचार न सदा
माझ्या वागण्यातून काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस.............
तू माझी मैत्रीण आहेस सर्वात आवडती आणि ती ही बाल पणाची म्हणून तुला पाहण्याची तुझ्याशी बोलण्याची हूर हूर लागली होती . म्हणून मी तुझ्याशी बोलायला तुला भेटायला तड फड करत  होतो . आपले लहान पाणीचे मित्र मैत्रीण भेटणार हा विचार करून मी भारावून गेलो . माझ्या वागण्या मुळे तुला इतका त्रास होईल वाटल नाही चुकल असेल तर माफ कर मी विचित्र पणा केला ओवररीयाक्ट  झालो सॉरी जास्त विचार नको करूस अग......... मी इथे तुम्हा सगळ्यांना  माझ्या लग्नच आमंत्रण द्यायला आलोय .
तुझ्या  या  सगळ काही  एवढ्या   धडाधड  समजून सांगण्या  वरून  तु माझ्या एकंदरीत वागण्याने  माझ्या बदल स्वतः चा गैर समाज  करून गेतलास  अस वाटल  म्हणून हा विषय बोलो 
कारण तुझ्या मनात माझ्या बदल चुकीची  भावना  नको निर्माण व्हायला माझी मैत्रीण मला गमवायची नाही . मला माहित आहे तुझ्या मनात माझ्या बदल काही नाही आणि काही आहे ती फक्त मैत्री आणि माझ्या हि मनात काही नाही तुझ्या बदल .
शांत हो आणि आधी तो घाणेरडा विचार काढून  टाक  मनातून मंद कशी आहेस तू ........
किती वेगळी दिसतेस ग आणि सुंदर हि तितकीच निरागस ............ पण अजून हि तू तशीच आहेस बारीक जाडी हो जाडी ........... 
हो.......तसं ssssss  .... तुझ  लग्न नसत झाल तर मी विचारल असत तुला  लग्ना साठी  पण ठीक आहे  . मी उशीर केला आणि मी तेंव्हाच विषय सोडला जेंव्हा यमु मला म्हणाली तुझ लग्न झालाय छानसं  बाळ हि आहे . आणि तसं पण तुझ तुझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे  .कस धड धड  म्हणत  गेलीस  अजूनही ४ थी  त  असल्या सारख 
भारत माझा देश आहे............  म्हणाल्या  सारख .
आणि तो हसू लागला ...............त्याच्या त्या हसण्याने मला हि हसू आले .
मी किती चुकीचा विचार केला . माझा बावळट पणा वर मला हसू  येत आहे . 
नाती आधीच जुळलेली असतात  . आणि जोतो आपल नशीब सोबत घेऊन आल असतो .आता बघ न देवाने तुला माझी मैत्रीण बनवल .  हे हि नात्यातच मोडत न ..................
आणि माझा गैर समाज दूर झाला आम्ही सगळे जुन्या आठवनीन मध्ये रमलो
घरी आले रात्रीच्या जेवण नंतर झोताना मी यांना हे सांगू कि नको अस वाटल पण मी त्यांना ते सांगितल आणि तेही हसू लागले मला कुशीत घेउन  समजू लागले ................
कधी कधी  काही माणस आपल्या भावना लपवू नाही शकत आणि ते  समोरच्या व्यक्तीला  नाही खपत या  मुळेच समोरची व्यक्ती त्या व्यक्ती बद्दल चुकीचे अंदाज  बांधू लागते  पण हे चुकीचे अंदाज बदलू हि शकतात फक्त हे अंदाज एकमेकांशी स्पष्ट करायचे . दोन माणसां मध्ये स्पष्ट बोलण्याच नात किंव्हा पद्धत असते .त्या नात्यात विश्वास आणि सत्यता असते .प्रोब्लेम्स बोलून सुटतात गप्प राहून नाही . आणि बघ ते त्याने केल म्हणून हा गैर समाज दूर झाला नाही तर तू असच चुकीच समजत राहिली  असतीस आणि एक प्रामाणिक मित्र गमावला असतास .यमुच्या काही हि  भरळण्या  मुळे तू घाबरून गेलीस ती काळजी पोटी बोलली पण तू त्याला न पडताळता त्याच्या बदल चुकीचा अंदाज बांधलास . त्याने ते स्पष्ट केल हे ठीक केल . आणि मी हि स्पष्ट करण्यात विश्वास ठेवतो त्यामुळे तुझ्या हि बदल काही गैर समज माझ्या मनात नाही होऊ शकत नाही .  हे छोटे छोटे प्रोब्लेम्स तू तुझ्या पद्धतीने हाताळ आणि नाही जमल तर मला सांग ओक
तू न ......................माणसाना ओळखायला शिका बाईसाहेब
ह्यांच्या कुशीत  गप्पा मारता मारता कधी झोपले कळालच  नाही  . आणि परत एकदा शाळेच्या त्या आठवणींच्या स्वप्नात रमून गेले .



चैताली  कदम 

भुरळ...............


हे कस स्पष्ट आहे जे मी व्यक्त नाही करू शकत .
पण...............तीव्रतेने  जाणू शकते .खूप त्रास होत आहे या जाणीवेचा .अस का होत असतं जे हवे तेच का नाही देत देव .हो पण हे हि तितकाच खर आहे कि आपल्या कडे काय आहे  हे न पाहता आपण नेहमी लोभस आणि आकर्षणा कडे वळतो आणि जेंव्हा हे होत असत तेंव्हाच आपण आपल्या कडे असलेल्या गोष्टींचा  अपमान करत असतो दुसऱ्याकडे असणाऱ्या चमकेला भुलून आपल्या कढल्या लख्खं प्रकाशाने कांती पोळते का आपली .
असच काहीस आहे केया बद्दल हि .
केया ....................
केया म्हणजे फुल.......................
जे आपल्या सुगंधाने सार वातावरण बदलून टाकते........
स्वच्छंद आणि आनंदी बनवत निसर्गाच्या एका नवीन आणि सुंदर पेहेलूची ओळख करून जाणीव करून आनुभवण्यास मदत करत ..................
केयाच हि काहीसं असच आहे................
सुंदर स्वच्छंद मनसोक्त  स्वतःच्या हक्काची आणि स्वतःची अशी..........
वेगळी दुनिया जगणारी................
केया.................
तिला हि कोणावर प्रेम होईल अस अजिबात वाटल नाही .
पण म्हणतात न प्रेम हे कस हि होत आणि काळत हि नाही ..........

"""""प्रेम म्हणजे""""" .................... 
"आईने मायेने भरवलेला घास" .............
"बाबांनी डोळे मोठे करून दिलेला खोटा खोटा दम" ...............
"ताईने खोडी मुळे पकडले ला कान "...........
"दादाने मस्करीत दिलेली टपली "............

अस तिला वाटायचं.............
पण हे काहीसं वेगळ होत...............

याच्या व्यतिरिक्त हि प्रेम असतं जे ............भुरळ घालणार........या सगळ्यातून बोट धरून दूर कुठे तरी हिरवळीत आणून सोडणार.........अश्या हिरवळीत जिथे सार काही छान आहे मोकळ आहे...........जे प्रत्येकाला जगावंसं वाटत ...........पण तिला काय माहित कधी कधी हि हवी हवी शी वाटणारी हिरवळ ..........शुद्ध खोटी हि असू शकते .......खरा तर प्रेम म्हणजे जितक मिळवन तितक गमावण..............
पण जर.............
प्रेम स्वतःच अपूर्ण आहे .
म्हणजेच..................
  प्रे या अक्षराला पूर्ण होण्या साठी  ची गरज लागते आणि सोबत म्हणून अर्थ पूर्ण व्हायला ची गरज लागते तेंव्हा कुठे जाऊन प्रेम हा शब्ध पूर्ण  होतो ............
तरी हि तो तीन अक्षरांवर न संपता अडीज अक्षरांवरच संपतो .  
मग त्यात असलेल्या भावना पूर्ण व्हाव्यात अस का वाटत सगळ्यांना.................
                      एक व्यक्ती असच काहीसं आला तिच्या आयुष्यात  आणि बोट धरून कुठे तरी हिरवळीत आणून सोडल त्याने हि तिला  आणि  ती भाळली त्या हिरवळीला जिने तिला भुलवल .
खूप कमी दिवसात त्याने तिला आपलास करून घेतल ............एकटच काही विचार करून हसायला शिकवलं....प्रसन राहायला शिकवल.........खर तर ...........खर तर.........खोट जगायला शिकवलं...........
तिचं त्याच्या वर अफाट प्रेम त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी करायला लागली होती ती .प्रत्येक वेळी त्याचाच विचार .आणि एके दिवशी तिचा कॉलेजचा मित्र तिला भेटला ती खूप खुश झाली इतक्या दिवसान  नंतर तो तिला भेटला . त्याने तिला जवळच्या  हॉटेल  मध्ये  चहा साठी आग्रह केला  आणि नाही नाही म्हणता  शेवटी होच म्हणव लागल आणि  ते दोघ हॉटेल मध्ये बसले चहा बरोबर गप्पा  अगदी रंगल्या तितक्यात त्याने तिला विचारल .
अग लग्न कधी करतेस...................
ती लाजली आणि म्हणाली हो करेन न ............लवकरच
म्हणजे .......कोणी तरी आहे कि काय.............
हो................
त्याच नाव काय ...........काय करतो तो ............
पण एवढ्या दिवसान नंतर भेटल्या मुळे गप्पांची घाई झाली होती तिच्या बद्दल विचारता विचारता  त्याने सांगितल  माझी बहिण तीच लग्न ठरल आहे  या २५ तारखेला आहे .त्याला घेऊन ये अरे नाही तो गावी गेलाय त्याच्या  भवाच लग्न आहे न म्हणून ..............ओके  ठीक आहे पण तू यायचस हा ........प्लीज .आपले सगळे फ्रेंड्स पण येणार आहेत.तू हि ये .........त्या मुळे बाकीच्यांशी हि भेट होईल .
अरे हो रे येणार न मित्राच्या बहिणीच लग्न आहे .......नक्की येणार.
                  लग्नचा  दिवस आला तीने तयारी करून तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि ती तिच्या दारात .दोघी हि निघाल्या थट्टा मस्करी करत कधी हॉल आला कळलच  नाही आत शिरताच तिचे  शाळेतले  कॉलेज  मधले फ्रेंड  तिला भेटले . आणि गप्पा मारता  मारता  ती  इकडे  तिकडे  पाहू लागली  लागली   आस पास नजर फिरवता   फिरवता  अचानक तिची नजर  एके  ठिकाणी  थांबली   .तिला काही सुचेना विश्वासच होईना  तीची धड धड वाढली घाम सुटला आणि खाली कोसळणार तितक्यात तिच्या मित्राने तिला पकडल .आणि बाजूच्या खुर्चीत बसवलं पाणी शिंपडल तिच्या तोंडावर ती धडकून जागी झाली .  सगळे तिला विचारू लागले काय झाल .पण तिला काही सुचेना
कारण च्चक तोच तिच्या समोर उभा . त्याच लक्ष नवत तसं पण म्हणा विधी चालू असताना नवऱ्या मुलाच लक्ष कस दुसरी कडे असणार हो ज्या मुला बरोबर  तिच्या मित्राच्या बहिणीच  लग्न  होत  होत  तो तोच होता पण ती कशी सांगणार हे सगळ .
ती म्हणाली काही नाही................ मी ठीक आहे .............
जरा अशक्त पण वाटतो आहे पण ठीक होईल थोडावेळ बसते ..................
तिची घुसमट झाली पण तिने ठरवलं कि त्याच्या समोर जायचं . नवरा नवरी आता  विधी संपून सगळ्या  मंडळीचे आशीर्वाद आणि त्यांनी आणलेल्या भेट वस्तू स्वीकारायला सुरवात केली . तो इतका खुश कसा असू शकतो आपण कोणाला तरी फसवत आहोत हे त्याच्या चेहेऱ्यावर कुठेच नवत . ती आणि तिचे सगळे फ्रेंड आता नवरा नवरीचा निरोप घ्यायला त्यांच्या जवळ गेले आणि त्याची नजर तिच्या वर पडली तो घाबरला . हि काही बोलणार नाही न ...........
आता काय होईल हा विचार करून तो घाम घूम झाला पण केया काही बोलीच नाही ती नवरी ला भेटून अभिनंदन  करून निघाली  आणि जाता जाता फक्त त्याच्या कडे पाहिलं तिच्या डोळ्यात फक्त हेच होत....................
तू अस का केलास ....................
आणि ती कोणाला हि आपल दुख न सांगता न समजू देता हसून गप्पा मारून सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली ................
पुन्हा काही दिवसांनी ती हे सगळ आठवत त्याच्या भेटण्याच्या जागी बसली होती खूप खचली होती मनातून आणि तो तिला भेटला ..............
त्याला पाहून ती तिथून निघणारच तितक्यात त्याने हक मारली
मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे प्लीज ...............मला जाऊदे ..............
केया थांब ........
काय करू थांबून .......सांग न .............तू हे का केलास........ का................मी किती विश्वास केला तुझ्या वर किती प्रेम केल आणि तू माझा विश्वास घात केलास .....आता तरी सुधार आणि नीट वाग  .................आणि परत माझ्याशी बोलण्याचाच नाही  तर  भेटण्याचा हि प्रयत्न करू  नकोस ..............आणि कश्या साठी आलास इथे माझा तमाशा पाहायला............. 
वाटलं असेल  दुभळी आहे . रडत बसली असेल आपण त्याचा हि फायदा गेऊया .........
पण नाही मी दुसरया मुलीं सारखी रडत बसणारी नाही . आणि तुझ्या साठी तर नाहीच नाही आणि का........... कश्या साठी रडू................तुझ्या  साठी रडून मी तुझ  महत्व वाढवत बसणार नाही .
पण हो आयुषभर हि खंत  असेल ती फक्त याचीच कि मी एका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल ........आणि हि खंत सतत  माझ्या मनात सलत राहील ............... मी मना पासून तुझी माफी मागतो ......
नाही मी तुला कधीच माफ नाही करू शकत ...........आणि हे सगळ  बोलले  म्हणून खोटी माफी नको मागुस ..................
शी ...........एवढं सगळ होवूनही .............तुझी हिमंतच  कशी झाली माझ्याशी बोलण्याची .........माझ्या समोर येण्याची ..............
मी .... मी .....नाही माफ करू शकत तुला ...........पण ......... तू तिचं आयुष उद्वस्त नको करूस .........जस मला फसवलस तसं तिला फसवू नकोस.आणि केया तिथून निघून गेली ...........किती मूर्ख होता तो कि त्याला कधी  कळलंच नाही  केयाच  महत्व .............
केया हि आता ठीक आहे . आज तिचा मित्र येणार आहे  लंडन वरून . ती खूप खुश आहे .ती त्याला पिकअप करायला एरपोट गेली .खर तर तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा तो राहतो पुण्याला पण इथे मुंबईत १० वी नंतरच्या शिक्षणा साठी होता . तिला पहाताच तो तिच्या जवळ आला आणि त्याला पाहून ती खूप खुश झाली तब्बल ५ वर्षांच्या कालावधी नंतर तो आला आहे त्याने येताच तिला घट्ट मिठी मारली
आय  मिस यु .......आय  मिस यु.......आय  मिस यु सो मच केया............
मी  टु........कसा आहेस तु ......चल ...........चल लवकर घरी जाऊया ..........आई बाबा वाट पाहतायत .....केया मला तुला काही तरी विचारायचं आहे ..............आता नको प्लीज घरी जाऊन ......आई बाबा लग्नासाठी बाहेर चालले  आहेत  आधी त्यांना भेट त्यांच्याशी  बोल ........मग आपण बोलू .................
तो तोंडातल्या  तोंडात काही तरी पुट पुट ला .................
ते दोघ घरी आले ..............
आई बाबा लग्नाला निघालेच होते ...........तो आई बाबांना भेटला ...........आणि ते लग्नाला निघून गेले...........चल मी ही आता फ्रेश होतो ............... 
ओक ............
ती चहा नाष्टा तयार करून  त्याची वाट पाहू लागली तो आला .................
खूप छान वाटत आहे परत मुंबईत येवून ............
ए पण घरी न जाता आधी तु इथे आलास ..............
काही तरी काम आहे..............म्हणून आलो..........का नको यायला ................
नाही .....तसं ..........नाही काही ................
चल आपण बाहेर बागेत बसुया ..............

ते दोघं जावून बागेतल्या झोपाळ्यावर बसून  गप्पा मारू लागले  ..............
त्याने तिला विचारल ..............
मला काही तरी विचारायचं आहे तुला केया ............खरा तर मी तुझ्या साठी आलोय ..........
आता सगळं काही शांत  झाल होतं.........
मला .............मला ..............तु खूप आवडतेस .........
माझ्याशी लग्न करशील  का  ...............?
तु .............हे काय बोलतोयस .....गेले काही दिवस माझ्या आयुष्यात खूप काही घडल........असं ती म्हणतच होती कि .............
शु ssssssssssss.........तो  तिच्या ओठांवर बोठ ठेवत म्हणाला ..................
ला तुझं  पास्ट नाही  ऐकायच..............प्लीज .........फक्त हो कि नाही ते सांग.......
ती शांत झाली ..............आणि तिच्या डोक्यात विचार चालू झाले .........आपल्याला हवी असलेली व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जवळच होती .......आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही..........ती हसून.......नाही .......लाजूनच हो म्हणली ..........तो तिला जवळ घेत म्हणाला मी फक्त वाट पाहत होतो या वेळेची ........आता मी घरी जाऊन हे सागतो आणि ............मग ..........मग लग्न ..........
हे काम होत का ...........
दोघे हि हसत समोरच्या मावळणाऱ्या सूर्या  कडे पाहत   त्यांच्या भावी आयुष्याच्या गप्पान मध्ये गुंग झाले .................

कधी कधी आपल्याकडे सर्व गोष्टी असतात फक्त त्या आपण दुर्लक्ष करतो ...........
किंव्हा  चुकल्या नंतरच काही गोष्टी कळतात आणि त्याचं महत्व हि ...............
त्याही पेक्षा अस म्हणता येईल कि देव देतो पण जरा  उशीर करतो ...............





चैताली कदम