Monday, April 2, 2012

भुरळ...............


हे कस स्पष्ट आहे जे मी व्यक्त नाही करू शकत .
पण...............तीव्रतेने  जाणू शकते .खूप त्रास होत आहे या जाणीवेचा .अस का होत असतं जे हवे तेच का नाही देत देव .हो पण हे हि तितकाच खर आहे कि आपल्या कडे काय आहे  हे न पाहता आपण नेहमी लोभस आणि आकर्षणा कडे वळतो आणि जेंव्हा हे होत असत तेंव्हाच आपण आपल्या कडे असलेल्या गोष्टींचा  अपमान करत असतो दुसऱ्याकडे असणाऱ्या चमकेला भुलून आपल्या कढल्या लख्खं प्रकाशाने कांती पोळते का आपली .
असच काहीस आहे केया बद्दल हि .
केया ....................
केया म्हणजे फुल.......................
जे आपल्या सुगंधाने सार वातावरण बदलून टाकते........
स्वच्छंद आणि आनंदी बनवत निसर्गाच्या एका नवीन आणि सुंदर पेहेलूची ओळख करून जाणीव करून आनुभवण्यास मदत करत ..................
केयाच हि काहीसं असच आहे................
सुंदर स्वच्छंद मनसोक्त  स्वतःच्या हक्काची आणि स्वतःची अशी..........
वेगळी दुनिया जगणारी................
केया.................
तिला हि कोणावर प्रेम होईल अस अजिबात वाटल नाही .
पण म्हणतात न प्रेम हे कस हि होत आणि काळत हि नाही ..........

"""""प्रेम म्हणजे""""" .................... 
"आईने मायेने भरवलेला घास" .............
"बाबांनी डोळे मोठे करून दिलेला खोटा खोटा दम" ...............
"ताईने खोडी मुळे पकडले ला कान "...........
"दादाने मस्करीत दिलेली टपली "............

अस तिला वाटायचं.............
पण हे काहीसं वेगळ होत...............

याच्या व्यतिरिक्त हि प्रेम असतं जे ............भुरळ घालणार........या सगळ्यातून बोट धरून दूर कुठे तरी हिरवळीत आणून सोडणार.........अश्या हिरवळीत जिथे सार काही छान आहे मोकळ आहे...........जे प्रत्येकाला जगावंसं वाटत ...........पण तिला काय माहित कधी कधी हि हवी हवी शी वाटणारी हिरवळ ..........शुद्ध खोटी हि असू शकते .......खरा तर प्रेम म्हणजे जितक मिळवन तितक गमावण..............
पण जर.............
प्रेम स्वतःच अपूर्ण आहे .
म्हणजेच..................
  प्रे या अक्षराला पूर्ण होण्या साठी  ची गरज लागते आणि सोबत म्हणून अर्थ पूर्ण व्हायला ची गरज लागते तेंव्हा कुठे जाऊन प्रेम हा शब्ध पूर्ण  होतो ............
तरी हि तो तीन अक्षरांवर न संपता अडीज अक्षरांवरच संपतो .  
मग त्यात असलेल्या भावना पूर्ण व्हाव्यात अस का वाटत सगळ्यांना.................
                      एक व्यक्ती असच काहीसं आला तिच्या आयुष्यात  आणि बोट धरून कुठे तरी हिरवळीत आणून सोडल त्याने हि तिला  आणि  ती भाळली त्या हिरवळीला जिने तिला भुलवल .
खूप कमी दिवसात त्याने तिला आपलास करून घेतल ............एकटच काही विचार करून हसायला शिकवलं....प्रसन राहायला शिकवल.........खर तर ...........खर तर.........खोट जगायला शिकवलं...........
तिचं त्याच्या वर अफाट प्रेम त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी करायला लागली होती ती .प्रत्येक वेळी त्याचाच विचार .आणि एके दिवशी तिचा कॉलेजचा मित्र तिला भेटला ती खूप खुश झाली इतक्या दिवसान  नंतर तो तिला भेटला . त्याने तिला जवळच्या  हॉटेल  मध्ये  चहा साठी आग्रह केला  आणि नाही नाही म्हणता  शेवटी होच म्हणव लागल आणि  ते दोघ हॉटेल मध्ये बसले चहा बरोबर गप्पा  अगदी रंगल्या तितक्यात त्याने तिला विचारल .
अग लग्न कधी करतेस...................
ती लाजली आणि म्हणाली हो करेन न ............लवकरच
म्हणजे .......कोणी तरी आहे कि काय.............
हो................
त्याच नाव काय ...........काय करतो तो ............
पण एवढ्या दिवसान नंतर भेटल्या मुळे गप्पांची घाई झाली होती तिच्या बद्दल विचारता विचारता  त्याने सांगितल  माझी बहिण तीच लग्न ठरल आहे  या २५ तारखेला आहे .त्याला घेऊन ये अरे नाही तो गावी गेलाय त्याच्या  भवाच लग्न आहे न म्हणून ..............ओके  ठीक आहे पण तू यायचस हा ........प्लीज .आपले सगळे फ्रेंड्स पण येणार आहेत.तू हि ये .........त्या मुळे बाकीच्यांशी हि भेट होईल .
अरे हो रे येणार न मित्राच्या बहिणीच लग्न आहे .......नक्की येणार.
                  लग्नचा  दिवस आला तीने तयारी करून तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि ती तिच्या दारात .दोघी हि निघाल्या थट्टा मस्करी करत कधी हॉल आला कळलच  नाही आत शिरताच तिचे  शाळेतले  कॉलेज  मधले फ्रेंड  तिला भेटले . आणि गप्पा मारता  मारता  ती  इकडे  तिकडे  पाहू लागली  लागली   आस पास नजर फिरवता   फिरवता  अचानक तिची नजर  एके  ठिकाणी  थांबली   .तिला काही सुचेना विश्वासच होईना  तीची धड धड वाढली घाम सुटला आणि खाली कोसळणार तितक्यात तिच्या मित्राने तिला पकडल .आणि बाजूच्या खुर्चीत बसवलं पाणी शिंपडल तिच्या तोंडावर ती धडकून जागी झाली .  सगळे तिला विचारू लागले काय झाल .पण तिला काही सुचेना
कारण च्चक तोच तिच्या समोर उभा . त्याच लक्ष नवत तसं पण म्हणा विधी चालू असताना नवऱ्या मुलाच लक्ष कस दुसरी कडे असणार हो ज्या मुला बरोबर  तिच्या मित्राच्या बहिणीच  लग्न  होत  होत  तो तोच होता पण ती कशी सांगणार हे सगळ .
ती म्हणाली काही नाही................ मी ठीक आहे .............
जरा अशक्त पण वाटतो आहे पण ठीक होईल थोडावेळ बसते ..................
तिची घुसमट झाली पण तिने ठरवलं कि त्याच्या समोर जायचं . नवरा नवरी आता  विधी संपून सगळ्या  मंडळीचे आशीर्वाद आणि त्यांनी आणलेल्या भेट वस्तू स्वीकारायला सुरवात केली . तो इतका खुश कसा असू शकतो आपण कोणाला तरी फसवत आहोत हे त्याच्या चेहेऱ्यावर कुठेच नवत . ती आणि तिचे सगळे फ्रेंड आता नवरा नवरीचा निरोप घ्यायला त्यांच्या जवळ गेले आणि त्याची नजर तिच्या वर पडली तो घाबरला . हि काही बोलणार नाही न ...........
आता काय होईल हा विचार करून तो घाम घूम झाला पण केया काही बोलीच नाही ती नवरी ला भेटून अभिनंदन  करून निघाली  आणि जाता जाता फक्त त्याच्या कडे पाहिलं तिच्या डोळ्यात फक्त हेच होत....................
तू अस का केलास ....................
आणि ती कोणाला हि आपल दुख न सांगता न समजू देता हसून गप्पा मारून सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली ................
पुन्हा काही दिवसांनी ती हे सगळ आठवत त्याच्या भेटण्याच्या जागी बसली होती खूप खचली होती मनातून आणि तो तिला भेटला ..............
त्याला पाहून ती तिथून निघणारच तितक्यात त्याने हक मारली
मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे प्लीज ...............मला जाऊदे ..............
केया थांब ........
काय करू थांबून .......सांग न .............तू हे का केलास........ का................मी किती विश्वास केला तुझ्या वर किती प्रेम केल आणि तू माझा विश्वास घात केलास .....आता तरी सुधार आणि नीट वाग  .................आणि परत माझ्याशी बोलण्याचाच नाही  तर  भेटण्याचा हि प्रयत्न करू  नकोस ..............आणि कश्या साठी आलास इथे माझा तमाशा पाहायला............. 
वाटलं असेल  दुभळी आहे . रडत बसली असेल आपण त्याचा हि फायदा गेऊया .........
पण नाही मी दुसरया मुलीं सारखी रडत बसणारी नाही . आणि तुझ्या साठी तर नाहीच नाही आणि का........... कश्या साठी रडू................तुझ्या  साठी रडून मी तुझ  महत्व वाढवत बसणार नाही .
पण हो आयुषभर हि खंत  असेल ती फक्त याचीच कि मी एका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल ........आणि हि खंत सतत  माझ्या मनात सलत राहील ............... मी मना पासून तुझी माफी मागतो ......
नाही मी तुला कधीच माफ नाही करू शकत ...........आणि हे सगळ  बोलले  म्हणून खोटी माफी नको मागुस ..................
शी ...........एवढं सगळ होवूनही .............तुझी हिमंतच  कशी झाली माझ्याशी बोलण्याची .........माझ्या समोर येण्याची ..............
मी .... मी .....नाही माफ करू शकत तुला ...........पण ......... तू तिचं आयुष उद्वस्त नको करूस .........जस मला फसवलस तसं तिला फसवू नकोस.आणि केया तिथून निघून गेली ...........किती मूर्ख होता तो कि त्याला कधी  कळलंच नाही  केयाच  महत्व .............
केया हि आता ठीक आहे . आज तिचा मित्र येणार आहे  लंडन वरून . ती खूप खुश आहे .ती त्याला पिकअप करायला एरपोट गेली .खर तर तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा तो राहतो पुण्याला पण इथे मुंबईत १० वी नंतरच्या शिक्षणा साठी होता . तिला पहाताच तो तिच्या जवळ आला आणि त्याला पाहून ती खूप खुश झाली तब्बल ५ वर्षांच्या कालावधी नंतर तो आला आहे त्याने येताच तिला घट्ट मिठी मारली
आय  मिस यु .......आय  मिस यु.......आय  मिस यु सो मच केया............
मी  टु........कसा आहेस तु ......चल ...........चल लवकर घरी जाऊया ..........आई बाबा वाट पाहतायत .....केया मला तुला काही तरी विचारायचं आहे ..............आता नको प्लीज घरी जाऊन ......आई बाबा लग्नासाठी बाहेर चालले  आहेत  आधी त्यांना भेट त्यांच्याशी  बोल ........मग आपण बोलू .................
तो तोंडातल्या  तोंडात काही तरी पुट पुट ला .................
ते दोघ घरी आले ..............
आई बाबा लग्नाला निघालेच होते ...........तो आई बाबांना भेटला ...........आणि ते लग्नाला निघून गेले...........चल मी ही आता फ्रेश होतो ............... 
ओक ............
ती चहा नाष्टा तयार करून  त्याची वाट पाहू लागली तो आला .................
खूप छान वाटत आहे परत मुंबईत येवून ............
ए पण घरी न जाता आधी तु इथे आलास ..............
काही तरी काम आहे..............म्हणून आलो..........का नको यायला ................
नाही .....तसं ..........नाही काही ................
चल आपण बाहेर बागेत बसुया ..............

ते दोघं जावून बागेतल्या झोपाळ्यावर बसून  गप्पा मारू लागले  ..............
त्याने तिला विचारल ..............
मला काही तरी विचारायचं आहे तुला केया ............खरा तर मी तुझ्या साठी आलोय ..........
आता सगळं काही शांत  झाल होतं.........
मला .............मला ..............तु खूप आवडतेस .........
माझ्याशी लग्न करशील  का  ...............?
तु .............हे काय बोलतोयस .....गेले काही दिवस माझ्या आयुष्यात खूप काही घडल........असं ती म्हणतच होती कि .............
शु ssssssssssss.........तो  तिच्या ओठांवर बोठ ठेवत म्हणाला ..................
ला तुझं  पास्ट नाही  ऐकायच..............प्लीज .........फक्त हो कि नाही ते सांग.......
ती शांत झाली ..............आणि तिच्या डोक्यात विचार चालू झाले .........आपल्याला हवी असलेली व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जवळच होती .......आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही..........ती हसून.......नाही .......लाजूनच हो म्हणली ..........तो तिला जवळ घेत म्हणाला मी फक्त वाट पाहत होतो या वेळेची ........आता मी घरी जाऊन हे सागतो आणि ............मग ..........मग लग्न ..........
हे काम होत का ...........
दोघे हि हसत समोरच्या मावळणाऱ्या सूर्या  कडे पाहत   त्यांच्या भावी आयुष्याच्या गप्पान मध्ये गुंग झाले .................

कधी कधी आपल्याकडे सर्व गोष्टी असतात फक्त त्या आपण दुर्लक्ष करतो ...........
किंव्हा  चुकल्या नंतरच काही गोष्टी कळतात आणि त्याचं महत्व हि ...............
त्याही पेक्षा अस म्हणता येईल कि देव देतो पण जरा  उशीर करतो ...............





चैताली कदम

No comments:

Post a Comment