Wednesday, April 4, 2012

चर्चा प्रश्नांची...............


आपल्याला जे हवं तेच  का मिळत नाही......................?
साठवायच असतं ते साठवता येत नाही.......................?
हवसं वाटतं ते परकं भासत.............................................?
नको असतं ते आपलसं करावं लागतं..........................?
प्रायश्चित्त म्हणून भोगावं का लागतं..............................?


हे अस का होत आहे .........आणि  होत आहे तर याची उत्तर का नाही ...........
अस म्हणतात ................उत्तर  मिळतात  आणि ती  मिळाल्यावर कळतात हि ........पण हे खर आहे का .................?आता हे सगळ बोलणारी मी कोण ..............?जाऊदे ते इतकस गरजेच नाही............पण हे सारे प्रश्न कधी तुम्हाला पडले का ............?
नाही..........नाही नाही म्हणता येणार . हे असे प्रश्न आहेत जे सर्वांना पडतात मग स्पष्ट का होत नाहीत.आणि जेंव्हा स्पष्ट होण्याच्या मार्गात असतात तेंव्हा दुसरे का  सापडतात..............कधी थांबतील हे प्रश्नाचे खेळ............हे प्रश्न म्हणजे.............शी sssssssssss...............
किती  घोळ  यांचा ............अस म्हणतात कि माणसं चुकतात आणि शिकतात.......प्रश्न सोडवता सोडवता  उत्तरं मिळतात ..................... 
पण .......दुसरे प्रश्न  का सापडतात हाच मोठा प्रश्न आहे ........डोळे भरले माझे ...........
पण.......रडू की नको हा हि  प्रश्नच  .....?आणि दुःख व्यक्त नाही केल तर त्रास होणार..............मग अश्या वेळी करायचं तरी काय .........?तो किंव्हा ती  हवी   पण हे शक्य नाही .............अस का ..........का होत आहे हे सगळ ........असे विचार डोक्यात येऊन अगदी  गोंधळ होतो ......आपण  सुन्न होऊन................आसपास  सगळ काही शांत होत ......आणि अचानक काही तरी  आठवत मग चेहेऱ्यावर एक स्मित हास्य येत ........काही तरी मिळाल्या सारख........आणि आनंदाचा झेंडा अगदी अटके पार होतो .कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच प्रश्नांची  असतात आणि ती पुरेपूर साथ हि
निभावतात  .पण प्रत्येक वेळी जे मिळालं ते खरच त्याच प्रश्नाच उत्तर असेल हे कशा वरून ........किंव्हा अस ही म्हणू शकतो .........कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच  प्रश्नांची असतात...............? हे कशावरून .......हो न ..........सतत विचार करून......थकून..........वैतागून.........डोक्यात आलेल्या  वादळा मुळे या प्रश्नान पासून  पळ  काढण्यासाठी  सुचलेला उपाय नाही कशावरून ............खर तर आपण प्रश्न निर्माण करतो आणि उत्तर हि आपल्या कडेच  असतात .......पण...........त्यांच्या कडे दुर्लक्ष करून.......नको अस नको ............तसं असत तर हे केल असत .......अस म्हणून  खऱ्या उत्तरला उत्तर रुपात  न  उतरवता  पळवून लावतो आपण......भारताला स्वातंत्र मिळाले.......पण आपण  स्वतःला  या प्रश्नांनी आणि त्यांची उत्तरे शोधण्यात अडकवून पारतंत्र्यात लोटल आहे .........अस का .............प्रश्न हे आपणच निर्माण करतो आणि मग आपणच उत्तराच्या पाठी हात धुवून लागतो .....मग एक काम करायचं विचार करून आत्मशक्ती आणि स्वतःला त्रास न देता ......प्रयत्न करत राहायचं कोणता हि प्रश्न निर्माण न करण्याचा  ............आयुष्य  हा  खूप मोठा प्रश्न आहे  आणि त्याच उत्तर म्हणजे  जीवन.............आणि  जर का  नियती ने आपल्या समोर प्रश्न म्हणून  इतक  छान  आयुष  ठेवलंच आहे 
मग..........हे छान आणि सुंदर रित्या  हसून खेळून  सुख : दुख :चढ  उतार भोगून सार्थक करावे ......... 
आयुष्य या प्रश्नाला  छान जगून आठवणी जोगे उत्तर द्यावे.............
आयुष हे खूप मोठ आहे ते जगताना खूप प्रश्न येतील पण हार न मानता त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यात ते फुकट न घालवता ते जगायला शिका आणि जगा ..................
प्रश्न हे असतातच  हो ..............
आणि जर का प्रश्न आहेत तर उत्तर हि असतील मग का घाबरायचं  ...............
मुक्त पणे जगायचं न ........................... 

आता पाहिलं तर मी हि हा विचार करायला हवा ............
मला हे कस सुचत................................?
किंव्हा का लिहावास वाटत ..............?
त्याही पेक्षा मी का लिहिते ..............?
हा हि प्रश्नच न ....................................?
हेच किती मोठे प्रश्न असू शकतात माझ्या साठी ..................
पण विचार नाही करायचं जास्त ................
सुचत तर सुचत...............
लिहित राहायचं .............




चैताली कदम

No comments:

Post a Comment