Tuesday, December 27, 2011

काही प्रश्न............





वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
हसू कधी रडता रडता का आढळतं ?
मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
सारं काही नजरेतूनच  कस समजतं ?


भास होऊन तिचा तो का हसतो ?
नाही केला फोन म्हणून का रुसतो ?
रात्र भर तिच्या साठी का जागतो ?
चालता चालता रस्त्यात का वळतो ?


ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?
पण दुरावताना  पापण्या का भिजतात ?
आठवणी ने पण सहज ती का लाजते ?
लिहिता लिहिता कधी ती मागे वळते ?


फक्त पाहण्या साठी फेरया तो का मारतो ?
दिसली नाही ती तर का शोधतो ?
सर्वात आधी समोर तीच का दिसावी ?
हवीशी वाटते तेंव्हाच  ती का नसावी ?


पाहता क्षणी त्याला धडधड का होते ?
आपोआप पण नजर  का झुकते  ?
गालावरती हसू का उमलतं ?
आठवणींनी त्याच्या मन का बहरतं ?



चैताली कदम








Friday, December 23, 2011

गोष्ट एका वयाची

                                           
                   तीची नी माझी खूप जुनी ओळख . पण  भेट मात्र क्वचितच  व्हायची त्या दिवसात . ते म्हणजे कॉलेज  संपल्या नंतर चे  वधू वर  शोधण्याचे दिवस आणि एके दिवशी रस्त्यात अचानक मला ती भेटली  मैत्री वाढत  गेली . माझ्या आई वडिलांनी तिला मागणी घातली आणि आमच लग्न हि झाल  . आज आम्ही खूप खुश आहोत . एवढी वर्ष छान आणि सुखाने संसार करण्या बद्दल तिला   शब्बासकी  द्यायला हवी तशी संकटं आली  भांडणं  हि झाली पण आम्ही  दोघांनी  ती खूप छान रित्या हाताळली .
                  आमच्या हिला लिखाणाची खूप आवड त्या निमिताने  पुण  पाहायला जायचं म्हणत  होती  तसच मैत्रिणी च्या घरी तिला भेटायला हि  . पण १ आठवडा झाला मला तिची आठवणं  येत होती  . काही झाल तरी तिची सवय झाली आहे न २५ वर्ष जी झाली लग्नाला आणि आज आमच्या लग्नाचा वाढ दिवस आहे मी सकाळी सकाळी पाय मोकळे करावे म्हणून घरा जवळच्या बागेत फेरफटका मारायला म्हणून गेलो आज काल पहाटे खूप थंडी असते . अचानक ती मला दिसली  मी थोडा वेळ थांबलो . तशी ती लांबच होती पण मला अस्पष्ट दिसतं होती . कदाचित तिने मला ओळखलं असावं ती लांबूनच हसत  आली मी खर तर तिला ओळखलंच नाही म्हणजे ओळखलं पण मला विश्वास नवता ती कधी आली आणि बागेत काय करते .पण जस जशी ती जवळ येत गेली तस तशी मला स्पष्ट दिसू लागली . किती बदली होती ती या आठवडयात  . अस  होण  साहजिक होत . वयाच्या ५०  व्या  वर्षी ती कशी दिसायला हवी  होती आणखी . तरी हि ती या वयात खूप सुंदर दिसतं होती . आणि कदाचित आज लग्नाचा वाढदिवस म्हणून आणखी छान दिसत होती .ती जवळ आली मी खूप खुश झालो मी तिला विचारल कि तू कधी आलीस आणि इथे काय करतेस त्यावर ती म्हणाली अहो मला माहित होतं कि तुम्ही इथे असाल तिने चक्क एक गिफ्ट आणलं होत माझ्या हातात देत म्हणाली कि जरा लवकर लवकर उघडा हं.............मी ते उघडलं आणि त्यात एक शाल होती . तिने ती उघडून माझ्या  अंघावर  पांघरली मला म्हणाली आज काळ थंडी पडलीये नवरोबा आता आपण म्हातारे झालो जरा काळजी घ्या .मी हसलो आणि म्हणालो जरा आलो हं........................आणि तिथून निघून गेलो .गजरा घेतला चाफ्याची फुल घेतली आणि तिच्या जवळ परतलो तिने विचारल मला कुठे गेलेलात मी तिच्या हातात  गजरा  आणि फुलांची पुडी दिली ती हसली नुसती आणि लाजलिही थोडी . हे काय वय आहे हे सगळ करायचं मी एक मोठा श्वास घेत तीच्या बाजूला बसलो आणि म्हणालो आपण आपली सगळी कर्तव्य पार पडली गं........ आता वेळ आहे एकमेकाना वेळ देण्याची मग गप्पा मारत आम्ही घरी गेलो तिने मस्त चहा आणि पोह्यांचा बेत आखला खूप दिवसांनी खाल्ले तिच्या हातचे पोहे आणि अगदी मनाला शांती झाली ती येण्याची . मी म्हणालो  ए मी जरा बाहेर जाऊन येतो तू जेवनाच बघ आणि बाहेर पडलो .
                        मला तसा वेळ झाला होता घरातून निघून ती वाट बघत असेल जेवणा साठी हे मित्र भेटले ना मग वेळ कसा जातो काळत नाही . मी घरी आलो ती टीव्ही  पाहत होती तिच्या हातात एक पाकीट दिला तिने ते उघडलं त्यात संघ्याकाळच्या नाटकाची तिकीट पाहून ती हसली म्हणाली दिवसेन दिवस तुम्ही अगदी तरुण होताय . काय हो काय भानगड हं ................छे छे  काही हि काय चल उठ आता कावळे ओरडतायत पोटात माझ्या आणि हं  संध्याकाळचं  जेवण आपण बाहेरच करणार आहोत  . आणि मग आम्ही जेवायला बसलो मी  भाजी चपातीचा एक घास खात म्हणालो अरे हि आज हि तशीच झालीये जशी तू पहिल्यांदा बनवलेलं जेवण जेवलो होतो . आजही सार काही तसाच आहे ना आणि ती तेवढ्यात म्हणाली फक्त वय निघून चालय हो नं.......................
                           थोडा वेळ विश्रांती घेऊन नाटकाला जाण्याच्या तयारीला लागलो तिने आजही मला विचारलं कोणती साडी घालू जसं ती  आधी  विचारायची आणि मी म्हणालो जांभळी ती तयार झाली फक्त एक बाकी होत गजरा मी तो तिच्या केसात माळला  .मी तयारीतच  होतो आम्ही निघालो आणि नाटक आगदी छान झालं . मग थोडा वेळ बागेत गप्पा मारत फिरलो पुण्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा . मग एका छान अशा हॉटेल मध्ये जेवलोही  कुल्फी खाली आणि मग घरी गेलो .
                            आज खूप मज्या आली नं ........ ती म्हणाली हो खरच आज पहिल्यांदा मी तुझ्या  आणि तू माझ्या जवळ असण्याची खरी जाणीव झाली आपण आयुष्याचे इतके दिवस एकत्र घालवले आणि आज वेळ मिळाला  ते आठवायला . तू आलीस आणि माझा सारं जगणंच बदल्ल्स पण आज तुम्ही असं का बोलताय..........
काही नाही  गं.............तू झोप आता थकली हि अशील नं .......... तसं पण वय झालं आपलं अस तूच म्हणतेस नं....................
आम्ही दोघही हसत हसत कधी झोपलो कळलाच नाही  .                                                                        हि होती आमच्या वयातली गोष्ट आणि हो या वयात आपल्या बायकोला जरा जास्त वेळ द्यावा आणि काळजीही घ्यावी तसं  पण मी आणि ती फिरायला चालोय गोव्याला आता तिला गोवा पहायचा आहे तेही माझ्या बरोबर ..............मग काय हा म्हातारा चाला की........................... आपल्या म्हातारीला घेऊन

या या मया या.........................
 या या मया या..........................
या या मया या...........................
या या मया या............................
                                         

चैताली  कदम                             

Wednesday, December 21, 2011

आठवण................तिच्या माझ्या काही क्षणांची

                                                                              
मोठं कॉलेज खूपपपपपप......................मोठा कॅम्पस . 
त्या कॅम्पसच्या कट्ट्या वर बसलेली ती.छान,निरागस,सोज्वळ,नाजूक .हसली नं ..........कि गालावर हळूच एक खळी उमलायची .तिच्या अलगद झुकणाऱ्या पापण्या पाहून जीव आगदी कासावीस व्हायचा .ती मला खूप आवडायची खूप म्हणजे खूप .मी तिच्या ग्रुप मधला एक मित्र .आमच्या दोघांच आगदी छान जमायचं .एकमेकाना फोन कारण ,फिरणं सार काही होत होतं .खर तर तिला मी आणि मला ती आवडायला लागलो होतो .आमच्या दोघांच्या बोलण्यात आपलेपणा,काळजी,आवडी निवडी जपणं,हट्ट पुरवणं आपोआपच येत गेलं .फोनवरच्या त्या बोलण्यात कधी शांत बसून एकमेकांचे श्वास अनुभवणं सामील झाल कळलचं नाही .पण मी त्या शांत पणाची खूप मज्या घ्यायचो.तिचा श्वास आणि तो हवा हवासा शांत पणा खूप आपलासा वाटू लागला होता .तिची खूप आठवण यायची सारख तिच्याशीच बोलावसं वाटायचं आणि मग ठरवल तिला आता विचारायचं तशी गरज नवती म्हणा पण तरी ही .मी एक चिठ्ठी तिच लक्ष नसताना तिच्या ब्यागेत ठेवली .आणि काही फुलं 

प्रिय मैत्रीण ..........

"पिवळ गुलाब आपल्या मैत्रीसाठी जी अचानक .पण खूप जोरदार झाली आणि जिने सततं तुला आणि मला जवळ ठेवल."

"हे लाल गुलाब माझ्या कडून झालेल्या प्रेमा खातरजे अचानक तुझ्या वर जडल आणि ज्याने तुझी ओढ लावली."

"हे पांढरगुलाब माझ्या कडून काही चूक झाली असेल त्या साठी ."

"तुझ काही उत्तर असो पण मी वाट पाहतोय तुझी आपल्या रोजच्या ठिकाणी तूं नक्की ये एका मैत्रीच्या नात्याने तरी ये ."

                                                                                                तुझा मित्र .........

मी जाऊन त्या रोजच्या जागेवर त्या मोगऱ्याचा सडा पडलेल्या बेंच वर जाऊन बसलो हाताची घडी घालून डोळे बंद केले आणि मनात तिचाच विचार चालू होता .ती केंव्हा आली कळलचं नाही माझ्या जवळ आली आणि माझ्या खंद्यावर डोकं ठेवल मी डोळे न उघडताच हसलो आणि मी एक सुखकर श्वास घेऊन तीच्य खंद्यावर हात ठेवला .त्या वेळी माझ्या मनाला एक वेगळा आनंद झाला होता . मी काय करू आणि काय नाही मला काही सुचत नवतं .आम्ही थोडा वेळ तसेच बसून होतो मी तिचा हात माझ्या हातात घेऊन बराच वेळ बसलो एकमेकांना काहीच न बोलता .घरी जवसच वाटत नवतं घड्याळ पाहिलं तर खूप वेळ झाला होता . 
                मी तिला म्हणालो "जाऊया घरी ...." "थांब ना !थोडा वेळ "आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं . "मी खूप वाट पहिली रे या क्षणाची या एकांताची आणि आज तो दिवस आला ."मला थोडा वेळ असचं बसुदेना .प्लीज !" मी हसलो थोडा वेळ बसून नंतर आम्ही निघालो.........तिला घरी सोडून मी ही घरी गेलो आज मी झोपण्याचा खूप प्रयत्न केला पण झोप मात्र नाही आली दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या वेळेत भेटून बाहेर फीरायला गेलो होतो .ती खूप खुश होती. खूप माज्या केली फिरलो जेवलो एकत्र वेळ काढला आज पर्यंत आम्ही अस कधी फिरलोच नवतो .असेच काही दिवस सरले . आणि एके दिवशी अचानक आमच्या मित्राच्या लग्नाची पत्रिका आम्हाला मिळाली तो  आमचा खूप छान मित्र  .तोआम्हाला त्याचे प्रोब्लेम्स सांगायचा .दोन ते तीन दिवसात तो आम्हाला भेटला पण तो खूप अस्वस्त होता . मी त्याला विचारल काय झाला. ती नवती माझ्या बरोबर .मी  आणि तो एका हॉटेल मध्ये गेलो चहा घेण्याच्या बहाण्याने .गप्पा मारताना त्याने विषय काढला त्याच्या होणारया बायकोचं अस म्हणन आहे कि तिला वेगळ रहायचं आहे  त्याच्या आई वडिलां बरोबर नाही तो खूप बेचेन होता या गोष्टीला घेऊन मी त्याला समजावलं तो घरी गेला आणि मी हि परतलो .माहित नाही का मी त्याला समजावल आणि तो निश्चिंत होऊन घरी गेला पण ........... पण माझ्या  मनात तो  प्रश्न एक वेगळी पोकळी करून गेला होता मला वाटत होता कि मी ही हा प्रश्न तिला विचारावा आम्ही संध्याकाळी भेटलो मित्राच्या बहाण्याने मी तो प्रश्न तिला विचारला 

ती :- "त्यात काय चुकलं तिच भांडत बसण्या परीस लांब राहून नाती जपलेली काय वाईट आहे. आणि तस पण येणजाण चालू असणारच न ."
मी :- "पण माझ्या आई वडिलांच  काय त्यांना सोडून कस राहायच ." 
ती :- "मी नाही का राहणार.आरे एकत्र  राहून नंतर भांडणं ही होणारच .मग आधी पासून तयारी करायची आपल घर सावरण्याची ."
मी :-  "घर तोडून.........घर कस सावरतात गं .........!"
ती :- "अरे वेड्या हे आता तुझ्या वर निर्भर आहे . कि तूं या गोष्टी ला  कशा द्र्ष्टीने घेतोयस ."
मी :- "भांडण हि सर्वच घरात होतात तर मग म्हणून वेगळ होण हा एकमेव उपाय का वाटतो तुला ."
ती :- "एकत्र राहून एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टीनची चीड चीड करून मनातल्या मनात एकमेकांच्या बदल घुसमट होऊन  द्वेष करत राहण्या पेक्षा हे बर ."
"पण आपण का हा विषय बोलतोय ."
मी :- "कारण जर अस असेल तर मग मी पण तुझ्याशी लग्न नाही करू शकत ."
सारकाही शांत झाल ती हि शांत झाली .तो आणि ती म्हणता म्हणता मी आणि तू आणि आपण यावर हा विषय जावून थांबला होता .
ती :- "पण अस का म्हणतोस मी तयार आहे तुझ्या आई वडिलां  बरोबर राहायला ."
मी :- "नही.........नको............"
"मला कोणत्याही दबावात किंव्हा जबरदस्तीने तुझ्याशी लग्न नाही करायचं .तुझ्या मनाला न पटता तू स्वतःची घुसमट करत माझ्या आई वडिलां बरोबर राहणार हे मला नाही पटत म्हणून ."
ती :- "प्लीज !अस बोलू नकोस ."
                       
                       तिने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मला काही ऐकायचं नवतं मुळात मी काही हि न बोलता न ऐकता तीथुन निघून आलो तरी हि तिने मला फोन करून मला रस्त्यात भेटून थांबून समजावण्याचा प्रयत्न केला .पण माझ मन मला तिच काही ऐकून घेण्याची परवानगीच देत नवतं .नंतर काही दिवस ती भेटलीच नाही .मग कळालं कि ती खूप आजारी आहे .पण मी तिला बघायला गेलो नाही .आणि काही दिवसातच आम्ही पुण्याला शिफ्ट झालो .
                        आज सार.......... काही ठीक माझ लग्न हि झालं .तीच हि झालं असेल .आशा करतो कि ती जिथे पण असेल तिथे खुश असेल किंबहुना असुदेत .पण एक गोष्ट नक्की जर मी तिच ऐकल  असतं तर............मी आता पुण्यात राहतो खुश पण आहे . बायको पण खुश आहे .पण सोबत आई बाबा नाहीत .वेगळे राहतो याची खंत वाटते . तेंव्हा हि वेगळ असतो आता हि आहोत पण..............कदाचित खूप खुश असतो .सारं काही समजुदार पणे असतं आणि कदाचित माझ्या मनात जी पोकळी निर्माण झाली ती ही नसती .पण जाऊदे जे आहे ते जगायच नाती जपण्याचा आणि तुटलेली नाती जोडण्याचा प्रयत्न करायचा जे झाल ते परत येणार नाही मग जसं उन पडेल तशी पाठ  फिरवायची .
तरी हि आठवण येतेच ...................
आठवण तिची ............तिच्या माझ्या काही क्षणाची.................
पण मी अजूनही अपूर्ण भासतो स्वतः ला .
कधी हि न पूर्ण होणारा  अपूर्ण 


                                                                                                          

चैताली कदम
                                          

Tuesday, December 20, 2011

कधी कधी शब्द.......

कधी कधी शब्द डोळ्यात पाणी देऊन जातात  ……
मुके पनी  डोळे खूप काही सांगून जातात  ……. 
पानारलेल्या  डोळ्यांना कोणी कधी समजेल का ………
कधी न बोललेल्या मनाला कोणी तरी उमजेल का ………..



                                                                                       चैताली कदम

दिव्याची वात..........

दिव्याची वात  मनाच्या आत ……
डोळे मीठून  हृदयात झाक ……….
त्या  जळत्या दिव्याची जोत तुलाही दिसेल ………
मन माझा तुलाही कळेल ……….




                                                             चैताली कदम

डोळ्या मध्ये पाणी का बर यावे..........



जगताना मी जीवनातला
आनंद जगुन घ्यावे
हसतं जगावे जीवन सारे
दुःख  न समजु यावे




खंत नसावी कशाची मज
रहीले काय असावे
निभावली सारी नाती गोती
उरले काय असावे




मरताना मज चेहे-यावरचे
दुःख  न कोणा दिसावे
त्रुप्त दिसावे जातान आन
कोनास न काही उमजावे




घडविले ज्यांनी जगण्या करता
उपकार कसे फेडावे 
 हसतं जगावे आयुष्य आन
दुःख न वाटी यावे




संपले सारे जीवन आता
सुखात मी निजावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.


                                       चैतली कदम