Thursday, June 28, 2012

येरे येरे पावसा..............

येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

पावूस पडला झिम झिम झिम.........
आंगण झाले ओले चिंब.........
पावूस पडतो मुसळधार........
रान होईल हिरवे गार........

ये........गं ........ये ..............गं ...........सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............

पावसाळा सुरु झालाच.........मग आजच्या पावसात होड्या सोडल्या कि नाही मित्रानो ........आता मज्या येणार सर्वत्र थंडगार हिरवळ होणार.रिमझिम रिमझिम पावूस ,थंड थंड हवा ,गरमागरम भजी आणि चहा ,मातीचा सुवास ,कागदाच्या होड्या ,धबधब्याची सुरवात ,सकाळच धुकं ,गवतावरच दव,हवेतील ओलावा ,नदीनाले अगदी खळखळून वाहणार , आणि मोर.....मोर तर अक्षरशा नाचणार. आज खूप पावूस पडला अगदी आजी म्हणते नं ........धो धो .......तसाच आणि विजही गडगडली. आमचीच काय तर सगळ्या आज्या आभाळातील विजेला गंमत म्हणून गडगडनारी म्हातारी म्हणतात.लहान मुलं पावसात भिजून आजारी न पडण्यासाठी हा गंमतशीर उपाय असतो.म्हणजे लहान मुलं  घाबरून बाहेर जात नाही आणि घराच्या  आडोशालाच राहतात . आजीकडून आईकडे आईकडून आपल्याकडे  आलेला हा उपाय.......बरेचसे लोक येरे येरे पावसा .....म्हणत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या  सोडण  पसंत करतात . तस लहानपणी आपल्या आई बाबांनी , शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला हस्तकला म्हणून रुमालाच्या घडी नंतर होड्या बनवायला शिकवले आणि घड्यांचा सराव म्हणून दहा वेळा तीच होडी करून घेतली  ह्या होड्या पावूस आला कि पावसाच्या पाण्यात सोडायच्या हं ........असे सांगितले .आणि आपण.........आपण अस करतो देखील हा वारसा वर्षोन वर्ष चालत आलेला आहे .के.जी मधील मुलांना रेन रेन गो अवे ..........असे जरी शिकवले तरी मुलंच नाही तर एकंदरीत सारेच जण  पावूस आला कि उड्या मारत टाळया वाजवाट ये रे.....ये रे...पावसा म्हणत होड्या बनवायला सुरवात करतात .होडी पाहिली कि पावसाची आणि पावूस पाहिलाकी होडीची आठवण येण स्वाभाविक आहे .आणि आपण हा उत्कुष्ट खेळ अगदी निरागसतेने खेळत असतो कधी आई वडिलान बरोबर तर कधी मित्र मैत्रिणीन बरोबर तर कधी हाताच बोट इवल्याश्या हातात अगदी घट्ट पकडून इवलीशी पावलं टाकत तुरु तुरु चालणाऱ्या गोड हसणाऱ्या आपल्या  बाळा बरोबर .आणि हि वेळ सगळ्यांवर येते .पावसाच्या पाण्यात होड्या सोडन हा पारंपारिक खेळ झाला पाहीजे अस नाही का वाटत तुम्हाला ? झाला पाहिजे काय..........मला तर तो आहे असाच वाटत . काही जणांना तर खिडकीत बसून पावूस पाहत हातावर पावसाचे थेंब जेलण्याची खूप हौस आणि काहीना पावूस आला कि भजी आणि चहा पिण्याची ,काहीना भिजण्याची . गावची मंडळी तर.........काही काम करत असतील आणि पावूस आला तर  पावसाच गाण देखील म्हणतात म्हणजे जशी ओवी असतेना तसाच हा प्रकार .हे मी ऐकलेलं आहे हं ..........

उब  र...............उब  र...............पावसा
तुझ्या बायका गेल्या ताका ............
तिकड लगोऱ्या ................
इकड उबोऱ्या.............

मग साक्षात चमत्कारच जणू.................चक्क पावूस जातो .पावूस हा सगळ्यांना किती आवडीचा आणि आपलासा वाटतो नं . म्हणूनच दर वर्षी  काहीही  झाल तरीही आपण नव्याने पावसासाठी उत्साही असतो . आणि दर वर्षी प्रमाणे
येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

ये........गं ........ये ..............गं ...........
सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............
म्हणत पावसाच स्वगत करतो ......................
ऋतू पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ....................
मग या वर्षी हातात होड्या घेऊन आपणही म्हणायचं नं ...................

ये रे ये रे पावसा ................





चैताली कदम

2 comments:

  1. संदीप पाटीलJuly 2, 2012 at 9:18 AM

    छान आहे लेख... पण आमच्या कडे दुष्काळ पडलाय...

    ReplyDelete
  2. मस्त लेख आहे मला खुप खुप खुप आवडला............छान आहे.

    ReplyDelete