Wednesday, July 18, 2012

पंचाक्षर

दोन व्यक्तीतील एक वेगळी .पण आपलीशी वाटणारी गोष्ट .प्रेम ..........हि भावना त्या व्यक्तीला कधी कळते काही माहित नाही पण .एक मेकांजवळचा एक असा क्षण जो आपल्याला एकमेकानकडे पाहून आपल्यात काही तरी वेगळ असल्याची जाणीव देतो .एकमेकान मध्ये काही नसताना जेंव्हा दोन क्षण एकमेकान कडे पाहत .अस का झालं .हे का होत आहे .हि भावना येन नक्की काय आहे .काही तरी चुकल्या सारखं .लाजल्या सारखं......काही तरी जाणवल्या सारखं.....गुंतल्या सारखं ......त्यावेळची ती एक नजर आपल्यातल्या वेगळ्या नात्याची जाणीव करून देत असते .एवद्या दिवसानच्या सहवासत कधी अशी वेळ आली नाही आणि आज .आज अशी हि वेगळे पणाची भावना का ............मी आज ओळखल कदाचित त्याला.......आज जाणल जवळून .......मी अगदी गोंधळून गेले .एवढ्या सगळ्यांच्या गोंधळात फक्त आम्ही आम्हाला वेगळे वाटत होतो . तसेच कोणी आसपास असण्याची जाणीव हि होत नवती आमचे डोळे एकमेकाना शोधात होते डोळ्यातून जणू बोलतच होतो एकमेकांशी . हे काय होतं अद्याप कळालेलं नाही पण काही तरी नक्कीचं स्वच्छंदि आनंदी हरवल्या सारखी जाणीव होत होती हळू हळू त्या दिवसात त्याच्या सहवासाची सवय झाली ओढ लागली त्याच्याशी तासान तास बोलत बसण्याची आवड निर्माण झाली आमची भेट माझ्या  मामेबहीनीच्या लग्नात झाली म्हणजे तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांच्या लांबच्या नात्यात आहोत पण घरातल्यांनी नाती खूप छान जपल्या मुळे चांगलीच ओळख होती सगळ्यांशी .एवढे वर्ष आम्ही भेटत आलो पण अशी ओढ कधी लागलीच नाही त्याची.............हे काहीस वेगळ होत . कदाचित हेच प्रेम असाव.............त्याच्याशी गप्पा मारणं त्याच्या सहवासात राहाण त्याला मनापासून मदत करण त्याची काळजी करण पण नाही मला त्याची शहानिशा करायची होती कदाचित हे आकर्षण हि असू शकत म्हणून मी बऱ्याच वेळा त्याला टाळलं भेटले नाही पण माझ्या मनातील त्याच्या बद्दलची भावना तशीच होती मग नंतर मी त्याला भेटण्याचं ठरवलं आणि आमच्यातील नात प्रियकर आणि प्रीयसित बद्दल माझ्या आईच नेहमीच म्हणन प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीच एकत्रीकरण म्हणजेच संसार कारण प्रेम हे एकटच जसं अपुरं आहे तसच लग्न हि...............दोन्ही शब्द अडीज अशारांचेच मग हे दोन्ही अडीज शब्द जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ती पूर्ण होतात मग कोणतही नात अपुरं राहण्याची काळजीच नाही ..........नाती अर्धवट ठेवून अमर होण्या खेरीज नाती पूर्ण करा आणि ती जागा ............जीवन पूर्ण होण्यासाठी जशी पंचमहाभूतांची गरज असते तसेच संसार पूर्ण होण्यासाठी प्रेम आणि लग्न याचे एकत्रीकरण म्हणजेच पंचाक्षर पाचअक्षरं याची गरज असते 




चैताली कदम 

No comments:

Post a Comment